शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सिंधुदुर्गचा दिल्लीत गौरव

By admin | Updated: October 1, 2016 00:21 IST

‘स्वच्छ जिल्हा’ पुरस्कार : संग्राम प्रभूगावकर, शेखर सिंह यांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शुक्रवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला ‘देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा’ पुरस्कार बहाल करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल बागल उपस्थित होते. मुळातच सिंधुदुर्ग जिल्हा संस्कारी जिल्हा असल्याने स्वच्छतेबाबतचे बीज प्रत्येक नागरिकाच्या अंगी रोवले गेले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, शाहू-फुले-आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियान, साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धा, राजमाता जिजाऊ, साने गुरुजी स्वच्छ अंगणवाडी पुुरस्कार, निर्मल ग्राम अभियान अशा प्रकारच्या अभियानांमध्ये सिंधुदुर्गने जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ असल्याचे अधोरेखित झाले होते. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री व्यंंकय्या नायडू यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सिंधुदुर्गला १०० पैकी ९६.८ टक्के गुणदेशात स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या ७५ जिल्ह्यांचा केंद्राच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या संस्थेमार्फत सर्व्हे केला होता. त्यामध्ये ५३ पठारी व २२ डोंगराळ जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने १०० पैकी ९६.८ टक्के गुण मिळवत स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावला होता. पर्यटनवाढीसाठी फायदा होणारसिंधुदुर्ग पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे. १०० टक्के साक्षर जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. त्यातच स्वच्छ जिल्हा अशी आणखी एक ओळख निर्माण झाल्याने याचा फायदा जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी होणार आहे. नवी दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ‘देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा’ हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्वीकारला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते.