शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सिंधुदुर्गचा दिल्लीत गौरव

By admin | Updated: October 1, 2016 00:21 IST

‘स्वच्छ जिल्हा’ पुरस्कार : संग्राम प्रभूगावकर, शेखर सिंह यांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शुक्रवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला ‘देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा’ पुरस्कार बहाल करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल बागल उपस्थित होते. मुळातच सिंधुदुर्ग जिल्हा संस्कारी जिल्हा असल्याने स्वच्छतेबाबतचे बीज प्रत्येक नागरिकाच्या अंगी रोवले गेले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, शाहू-फुले-आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियान, साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धा, राजमाता जिजाऊ, साने गुरुजी स्वच्छ अंगणवाडी पुुरस्कार, निर्मल ग्राम अभियान अशा प्रकारच्या अभियानांमध्ये सिंधुदुर्गने जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ असल्याचे अधोरेखित झाले होते. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री व्यंंकय्या नायडू यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सिंधुदुर्गला १०० पैकी ९६.८ टक्के गुणदेशात स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या ७५ जिल्ह्यांचा केंद्राच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या संस्थेमार्फत सर्व्हे केला होता. त्यामध्ये ५३ पठारी व २२ डोंगराळ जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने १०० पैकी ९६.८ टक्के गुण मिळवत स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावला होता. पर्यटनवाढीसाठी फायदा होणारसिंधुदुर्ग पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे. १०० टक्के साक्षर जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. त्यातच स्वच्छ जिल्हा अशी आणखी एक ओळख निर्माण झाल्याने याचा फायदा जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी होणार आहे. नवी दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ‘देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा’ हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्वीकारला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते.