शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

योग्य लोकांच्या हाती नगरपंचायतची सत्ता द्या

By admin | Updated: August 30, 2015 22:56 IST

वैभव नाईक : व्यापारी, नागरिकांशी नगरविकासाबाबत संवाद

वैभववाडी : नगरपंचायतीचा दर्जा देऊन युती शासनाने वाभवे - वैभववाडीला विकासाची संधी निर्माण केली आहे. शहराच्या विकासाला भरीव निधी येण्यासाठी केंद्र आणि राज्यात सत्ता असावी लागते. त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या शहराचा झपाट्याने कायापालट करण्यासाठी योग्य लोकांच्या हाती नगरपंचायती सत्ता द्या, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांनी रविवारी येथे केले.येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या सभागृहात आमदार नाईक यांनी शहरातील व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तालुका प्रमुख अशोक रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज सावंत, माजी अध्यक्ष टी. एस. घोणे आदी उपस्थित होते.नगरपंचायतीला दरवर्षी सुमारे तीन कोटी रुपये विकास निधी शासन देते. तसेच प्रशासनही चांगले असते. त्यामुळे विकासाचे नियोजन चांगल्या प्रकारे करता येते. ते नियोजन करण्यासाठी चांगली माणसं नगरसेवक म्हणून निवडून देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. गेल्या निवडणुकीत अपवाद वगळता कोकणच्या जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. त्यामुळे युती शासनाच्या माध्यमातून कोकणात विकासाचे नवनवीन प्रकल्प येत आहेत. त्यामुळे वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीतर्फे लढविली जाणार आहे. अशी ग्वाही देत आमदार नाईक यांनी या शहराचा कायापालट करण्यासाठी जनतेने युतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.जयेंद्र रावराणे म्हणाले, एवढ्या कमी लोकसंख्येच्या शहराला नगरपंचायतीचा दर्जा युती सरकारमुळेच मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विचारधारेची सत्ता येथे असणे आवश्यक आहे. एक शौचालय बांधले म्हणजे विकास होत नाही. वस्ती तेथे सुलभ शौचालय, शहरात स्वतंत्र मासळी बाजार, पुरेसा नियमित पाणीपुरवठा बगिचा, तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याशिवाय वैभववाडी सुंदर बनवता येणार नाही. यावेळी वैभववाडी तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंकर स्वामी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी संजय लोके यांनी शहरातील समस्या मांडून नगरपंचायत निवडणूकीत सद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)