शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्याना न्याय द्या, कणकवलीतील संघर्ष समितीची मागणी

By admin | Updated: June 22, 2017 22:26 IST

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कणकवली शहरातील पाचशेहून अधिक व्यापारी विस्थापित होणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

कणकवली(सिंधुदुर्ग), दि. 22 - मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कणकवली शहरातील पाचशेहून अधिक व्यापारी विस्थापित होणार आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना शासनाकडून काहीही मोबदला मिळणार नाही.हा त्यांच्यावर अन्याय आहे. महामार्ग चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यास कुडाळ येथे येणाऱ्या मंत्र्यानी तसेच राजकीय व्यक्तींनी या व्यापाऱ्यांचा विचार करुन त्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी आपली मागणी असल्याचे कणकवली शहर महामार्ग संघर्ष समितीच्यावतीने सांगण्यात आले .

 महामार्ग चौपदरिकरणाचा विषय सुरु झाल्या पासून या संघर्ष समितीने अनेक वेळा आपल्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गुरुवारी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यानी आपली भूमिका मांडली. यावेळी उदय वरवडेकर, अनिल शेट्ये, सुहास हर्णे, राजू आजगावकर, पराग जोशी, चंदू कांबळी, सुभाष काकडे, राजेंद्र सावंत, महेश लाड, रूपेश रेडकर, नितिन पटेल आदी उपस्थित होते.
 उदय वरवडेकर म्हणाले, महामार्ग चौपदरिकरण करताना पूर्वी कणकवली शहरातून बॉक्सेल उभारण्यात येणार होता. त्यामुळे येथील व्यापारी विस्थापित होऊ नये यासाठी आम्ही फ्लायओव्हरची मागणी केली. ही मागणी मान्य करण्यात आली असली तरी आम्हाला विस्थापित व्हावेच लागणार आहे. मग फ्लायओव्हर करून त्याचा आम्हाला काहीच उपयोग होणार नाही.  त्यापेक्षा पूर्वीप्रमाणे बॉक्सेल ठेवून इमारतींमधील भाडेकरुंसकट विस्थापित होणाऱ्या सर्वाना चांगला मोबदला देण्यात यावा. भाडेकरु असलेले व्यापारी मोबदला न मिळाल्याने देशोधडीला लागणार आहेत.
त्यांना कोणीच वाली राहिलेला नाही.येथील भूमिपुत्रांवर हा अन्याय आहे. याचा शासनाने तसेच लोकप्रतिनिधिनी विचार करणे गरजेचे आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढ़ाओढ़ लागली आहे. त्यामुळे या विस्थापित होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे श्रेयहि त्या राजकीय पक्षांनी घ्यावे. कणकवली शहरातील एक ते दीड किलोमीटर अंतरातील व्यापाऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न या महामार्ग चौपदरीकरणामुळे निर्माण झाला आहे. तो सोडवून आम्हाला शासनाने न्याय द्यावा.अशी मागणिहि यावेळी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.