शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ द्या

By admin | Updated: July 2, 2015 00:30 IST

राधाकृष्णन बी. : बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची रत्नागिरीत आढावा बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील अधिकाधिक अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून देण्याकडे बँकांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना केले. रत्नागिरी जिल्ह्यातील बँकांची जिल्हास्तरीय सल्लागार समिती तसेच जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक व्ही. व्ही. बुचे, रिझर्व्ह बँकेचे सहायक सरव्यवस्थापक आर. डब्ल्यू. साळुंखे, नाबार्डचे जिल्हा उपव्यवस्थापक व्ही. एस. पाटील, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. बांदिवडेकर, जिल्हा उपनिबंधक राजेंद्र महाजन आदींसह विविध बँकांचे जिल्हा समन्वयक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नैसर्गिक आपत्तीत यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, यापैकी यंदा पीककर्ज घेतलेल्या जवळपास ३५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे तीन ते पाच वर्षांच्या मुदत कर्जात रुपांतर करण्यात यावे तसेच या सर्व शेतकऱ्यांचे नवीन कर्ज विनाविलंब मंजूर करावे, अशी सूचना त्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली. गेल्या आर्थिक वर्षात कर्ज घेतलेले ३५ हजार शेतकरी हा लाभ मिळण्यास पात्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना नवीन कर्ज देताना लवचिक धोरण अवलंबण्यात यावे, आपत्तीग्रस्तांच्या यादीत एखाद्या शेतकऱ्याचे नाव नाही. परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्याचे नाव आहे आणि त्यांच्या सामाईक सातबारा उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याचे नाव असेल, तर त्या शेतकऱ्यालाही नवीन कर्जासाठी पात्र समजण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली. यासाठी महसूल व शासन यंत्रणा संपूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी दिला. गेली दोन वर्षे कर्जाचे उद्दिष्ट साध्य करण्यात रत्नागिरी जिल्हा पहिला क्रमांक मिळवत आहे. यावर्षीही जिल्ह्याने ३५ हजार शेतकऱ्यांना ३१२ कोटींचे पीककर्ज वाटप करुन १२१ टक्के उद्दिष्ट गाठले व राज्यात पहिला क्रमांक मिळविला, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, तसेच भविष्यात कर्जाची रक्कम ७०० कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन केले. जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर आंब्याची, ९० हजार हेक्टरवर काजूची, तर सुमारे १ लाख हेक्टरवर इतर धान्याची लागवड होते. ही आकडेवारी लक्षात घेतली तर जिल्ह्यात कृषीकर्ज वाटपासाठी मोठी संधी आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या २८४ शाखा या संधीचं निश्चितच सोनं करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बुचे, साळुंखे, पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. बांदिवडेकर यांनी बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती मांडली. (प्रतिनिधी)