शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

मुलींच्या वसतीगृहाप्रश्नी जनहित याचिका दाखल

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

महेश परूळेकर यांची माहिती

कणकवली : वेंगुर्ले येथे साडेतीन कोटी रूपये खर्च करून मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचा वापर होत नसल्याने दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती समितीचे जिल्हा निमंत्रक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वसतीगृहाची इमारत गेली तीन वर्षे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. तांत्रिक कारणे देत जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडून याबाबत निर्णय घेण्यास चालढकल करण्यात येत आहे. दरवर्षी १०० मुलींना या वसतीगृहात प्रवेश देण्यात आला असता तर आतापर्यंत ४०० मुलींना या वसतीगृहाचा लाभ झाला असता. मात्र या मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. २६ जूनला या इमारतीचे प्रतिकात्मक उद्घाटन संघर्ष समितीच्या पुढाकाराने करण्यात आले. मात्र वसतीगृह प्रत्यक्षात सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनाही याबाबत काहीच देणेघेणे उरलेले नसून जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाची त्यांना कदर नाही असेच यावरून दिसून येते. त्यामुळे दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने अ‍ॅड. अमृता पाटील व अ‍ॅड. विरेंद्र नेवे यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मुलांना न्याय मिळवून देणार असल्याचे श्री. परूळेकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)