शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या वसतीगृहाप्रश्नी जनहित याचिका दाखल

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

महेश परूळेकर यांची माहिती

कणकवली : वेंगुर्ले येथे साडेतीन कोटी रूपये खर्च करून मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचा वापर होत नसल्याने दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती समितीचे जिल्हा निमंत्रक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वसतीगृहाची इमारत गेली तीन वर्षे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. तांत्रिक कारणे देत जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडून याबाबत निर्णय घेण्यास चालढकल करण्यात येत आहे. दरवर्षी १०० मुलींना या वसतीगृहात प्रवेश देण्यात आला असता तर आतापर्यंत ४०० मुलींना या वसतीगृहाचा लाभ झाला असता. मात्र या मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. २६ जूनला या इमारतीचे प्रतिकात्मक उद्घाटन संघर्ष समितीच्या पुढाकाराने करण्यात आले. मात्र वसतीगृह प्रत्यक्षात सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनाही याबाबत काहीच देणेघेणे उरलेले नसून जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाची त्यांना कदर नाही असेच यावरून दिसून येते. त्यामुळे दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने अ‍ॅड. अमृता पाटील व अ‍ॅड. विरेंद्र नेवे यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मुलांना न्याय मिळवून देणार असल्याचे श्री. परूळेकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)