शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

मुलींच्या वसतीगृहाप्रश्नी जनहित याचिका दाखल

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

महेश परूळेकर यांची माहिती

कणकवली : वेंगुर्ले येथे साडेतीन कोटी रूपये खर्च करून मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण होऊनही अद्याप त्याचा वापर होत नसल्याने दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती समितीचे जिल्हा निमंत्रक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वसतीगृहाची इमारत गेली तीन वर्षे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. तांत्रिक कारणे देत जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडून याबाबत निर्णय घेण्यास चालढकल करण्यात येत आहे. दरवर्षी १०० मुलींना या वसतीगृहात प्रवेश देण्यात आला असता तर आतापर्यंत ४०० मुलींना या वसतीगृहाचा लाभ झाला असता. मात्र या मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. २६ जूनला या इमारतीचे प्रतिकात्मक उद्घाटन संघर्ष समितीच्या पुढाकाराने करण्यात आले. मात्र वसतीगृह प्रत्यक्षात सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनाही याबाबत काहीच देणेघेणे उरलेले नसून जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाची त्यांना कदर नाही असेच यावरून दिसून येते. त्यामुळे दलित अत्याचारविरोधी संघर्ष कृती समितीने अ‍ॅड. अमृता पाटील व अ‍ॅड. विरेंद्र नेवे यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मुलांना न्याय मिळवून देणार असल्याचे श्री. परूळेकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)