शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भरतीचा मार्ग मोकळा, ७५ टक्के पदे भरण्यास मिळाली सूट

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

--शुभ वर्तमान--२ जून २०१५ पूर्वी संबंधित पदावर नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

शिवाजी गोरे - दापोली महाराष्ट्र शासनाने २ जून २०१५च्या निर्णयाने राज्यात ‘अ’ गट ते ‘ड’ गटातील नोकर भरतीवर निर्बंध घातले होते. मात्र, शासनाने नोकर भरतीवरील निर्बंध उठवल्याने या पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. २ जून २०१५ पूर्वी संबंधित पदावर नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु संबंधित उमेदवार रुजू झालेले नाहीत. अशा बेरोजगार तरूणांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. सरकारी नोकरीतील शिक्षक पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य परिचारिका, पशुधन पर्यवेक्षक, मत्स्य व्यवसाय विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी, वनरक्षक, कृषी सहाय्यक, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता या संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्के पदे भरण्यास मुभा राहील. या संवर्गांव्यतिरिक्त इतर संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असणाऱ्या पदांपैकी ५० टक्के किंवा एकूण संवर्गाच्या ४ टक्के यापैकी जे पॅकेज कमी असेल इतकी पदे भरण्यास शासन निर्णयान्वये सूट देण्यात आली आहे. गट ‘अ’ ते गट ‘ड’मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागप्रमुखांकडून करण्यात येते. शासन निर्णयानुसार पदभरती करताना संवर्ग व्यवस्थापन, आर्थिक नियोजन इत्यादी बाबी लक्षात घेऊन पदभरती करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. गट अ ते गट ड मधील संवर्गात रिक्त पदांचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. विहीत टक्केवारीपेक्षा जास्त प्रमाणात पदे भरण्याचे तातडीची गरज आहे, अशा बाबतीत रिक्त पदे भरण्यास मान्यतेचे प्रस्ताव प्रशासकीय विभागास पूर्ण समर्थनासह सादर करता येतील. असे प्रस्ताव समितीकडे पाठविले जाणार आहेत. समितीने प्रस्ताव तपासून पदभरतीसंदर्भात शिफारस केल्यास प्रशासकीय विभागाने सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन त्याबाबतचे आदेश काढणे आवश्यक राहील. त्यानंतर पदभरतीचा मार्ग मोकळा होईल. २ जूनपूर्वी नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. परंतु संबंधित उमेदवार रुजू झालेले नाहीत. अशा संबंधित उमेदवारांना नवीन शासन निर्णयान्वये रुजू होण्याची परवानगी देण्यात आली आहे. निवड यादीतील खुल्या गटातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. मात्र, आरक्षणातील उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी २ जून २०१५नंतर पूर्ण झालेली असल्याने ज्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही, अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. मागणीपत्र पाठवून उमदेवारांच्या शिफारशी आयोगाकडून किंवा जिल्हा निवड समितीकडून विभागास नियुक्ती प्राधिकाऱ्यास प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकरणीदेखील पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. पदभरतीसाठी पदांची मागणी निवड समित्यांना व महाराष्ट्र लोकसेवा आयोगास २ जून २०१५ पूर्वी पाठविली असेल व त्या अनुषंगाने १६ जुलै २०१५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असेल, अशा जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व समित्यांना पदभरतीबाबत २ जून २०१५ पूर्वी मागणी पत्र पाठविले असेल, परंतु पाठवलेल्या मागणी पत्राच्या अनुषंगाने १६ जुलैपर्यंत जाहिरात प्रसिध्द झाली नसल्यास त्यांनी वित्त विभाग, शासन निर्णय २ जूनमध्ये दिलेल्या सूचनांनुसार पद मागणीबाबत पुनर्विचार करावा, आणि आवश्यकतेप्रमाणे या समितीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्याात आल्या आहेत. प्रशासकीय विभाग्रपमुख व कार्यालयप्रमुख यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन रिक्त पदे भरण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठातील ४० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे नवीन निर्णयामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाळासाहेब सावंंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चारही कृषी विद्यापीठांतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्याने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भरतीवरील बंदी उठल्याने शेकडो तरुणांना दिलासा मिळाला आहे. शासनाने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्याने राज्यातील कृषी विद्यापीठांतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यात येतील. त्याचप्रमाणे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सुमारे २०० रिक्त पदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २ जून २०१५ रोजी शासनाने नोकर भरतीवर निर्बंध घातल्याने त्या लोकांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले नव्हते. आता भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने संबंधितांना दिलासा मिळाला आहे.