शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

पाणीटंचाईचे साडेपाच कोटी शासनाकडून येणे; ३९ विंधन विहीरी पूर्ण

By admin | Updated: July 6, 2016 00:35 IST

जलव्यवस्थापन समिती सभा : मंजूर कामे पहिल्या टप्प्यात करण्याचा ठराव; कामे अपूर्ण ठेवणाऱ्या गावांची यादी करा; प्रभुगावकरांच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी : गतवर्षीचे पाणीटंचाईचे एक कोटी रूपये थकित असताना यावर्षीचे साडेचार कोटी रूपये मिळालेले नाहीत. गेल्या दोन वर्षातील साडेपाच कोटी शासनाकडून जिल्हा परिषदेला येणे आहे. चालू वर्षाच्या १८१ विंधन विहिरींपैकी ३९ विंधनविहिरी पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाली आहे. मंजूर आहेत पण पूर्ण झालेल्या नाहीत अशा १४२ विंधन विहिरी आॅक्टोबर ते नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात याव्यात, असा ठरावही यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती जुलै २०१६ ची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संग्राम प्रभुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सदस्य संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पाणीटंचाईच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. १८१ पैकी २९ ठिकाणी सार्वजनिक जागा तर १५२ ठिकाणी खासगी जागा आहेत. दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात दूषित नमुने जास्त असल्याने तशा सूचना दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले. भूजल सर्व्हेक्षण विभागांची ५२ कामे मंजूर आहेत. परंतु निधी नसल्याने ही कामे सुरु झाली नसल्याचे सांगण्यात आले.जलस्वराज्य प्रकल्प, भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल या योजनातील जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता असताना आतापर्यंत केवळ दोनच ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सभागृहात ग्रामीण पाणी पुरवठ्याचे वैभव वाळके यांनी देताच सदस्य सावंत यांनी अनेक कामात अनियमितता आहे. याचे खापर जिल्हा परिषदेवर फोडले जाते. हे किती वर्षे भिजत घोंगडे ठेवणार आहात. मागील १८ समित्या मुद्दामहून कामकाज पूर्ण करीत नाहीत. अशांवर तत्काळ फौजदारी दाखल करा, अशी मागणी केली. चाफेखोल, लोरे नं. १ प्रमाणे अशा दोषी समित्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घतला. जलस्वराज्य प्रकल्पात जिल्ह्यातील ७५ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासह भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल या योजनेअंतर्गत एकूण मंजूर कामे, त्यातील भौतिकदृष्ट्या पूर्ण कामे व अपूर्ण कामे असा आराखडा तयार करा. कामे पूर्ण न करणाऱ्या गावांची यादी करा. त्यांना लवकरच आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करा, असे आदेश संग्राम प्रभुगावकर यांनी दिले. यानंतर कारवाई निश्चित करणार असल्याचे प्रभुगावकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)