शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे साडेपाच कोटी शासनाकडून येणे; ३९ विंधन विहीरी पूर्ण

By admin | Updated: July 6, 2016 00:35 IST

जलव्यवस्थापन समिती सभा : मंजूर कामे पहिल्या टप्प्यात करण्याचा ठराव; कामे अपूर्ण ठेवणाऱ्या गावांची यादी करा; प्रभुगावकरांच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी : गतवर्षीचे पाणीटंचाईचे एक कोटी रूपये थकित असताना यावर्षीचे साडेचार कोटी रूपये मिळालेले नाहीत. गेल्या दोन वर्षातील साडेपाच कोटी शासनाकडून जिल्हा परिषदेला येणे आहे. चालू वर्षाच्या १८१ विंधन विहिरींपैकी ३९ विंधनविहिरी पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाली आहे. मंजूर आहेत पण पूर्ण झालेल्या नाहीत अशा १४२ विंधन विहिरी आॅक्टोबर ते नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात याव्यात, असा ठरावही यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती जुलै २०१६ ची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संग्राम प्रभुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सदस्य संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पाणीटंचाईच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. १८१ पैकी २९ ठिकाणी सार्वजनिक जागा तर १५२ ठिकाणी खासगी जागा आहेत. दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात दूषित नमुने जास्त असल्याने तशा सूचना दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले. भूजल सर्व्हेक्षण विभागांची ५२ कामे मंजूर आहेत. परंतु निधी नसल्याने ही कामे सुरु झाली नसल्याचे सांगण्यात आले.जलस्वराज्य प्रकल्प, भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल या योजनातील जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता असताना आतापर्यंत केवळ दोनच ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सभागृहात ग्रामीण पाणी पुरवठ्याचे वैभव वाळके यांनी देताच सदस्य सावंत यांनी अनेक कामात अनियमितता आहे. याचे खापर जिल्हा परिषदेवर फोडले जाते. हे किती वर्षे भिजत घोंगडे ठेवणार आहात. मागील १८ समित्या मुद्दामहून कामकाज पूर्ण करीत नाहीत. अशांवर तत्काळ फौजदारी दाखल करा, अशी मागणी केली. चाफेखोल, लोरे नं. १ प्रमाणे अशा दोषी समित्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घतला. जलस्वराज्य प्रकल्पात जिल्ह्यातील ७५ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासह भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल या योजनेअंतर्गत एकूण मंजूर कामे, त्यातील भौतिकदृष्ट्या पूर्ण कामे व अपूर्ण कामे असा आराखडा तयार करा. कामे पूर्ण न करणाऱ्या गावांची यादी करा. त्यांना लवकरच आपल्या दालनात बैठकीचे आयोजन करा, असे आदेश संग्राम प्रभुगावकर यांनी दिले. यानंतर कारवाई निश्चित करणार असल्याचे प्रभुगावकर यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)