शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

सिंधुदुर्गात गौरी-गणपतींना निरोप

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

. कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी जड अंत:करणाने गौरी-गणपतीना निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी ६६ हजार २६२ घरांमध्ये, तर ३७ सार्वजनिक मंडळांच्या गणरायांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येऊन मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले होते. गेले पाच दिवस ‘श्रीं’चा जागर सर्वत्र सुरू होता. शनिवारी गौराईचे आगमनही झाले. त्यानंतर रविवारी पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन करण्यात आले. विविध गीतांच्या साथीने फुगड्याचा फेर धरत महिलांनी रविवारची रात्र जागवली आणि आपल्या मनातले मागणे गौराईजवळ मागितले, तर सोमवारी सकाळपासूनच गौराईच्या विसर्जनाचे वेध महिलावर्गाला लागले होते. विविध भाज्या व भाकरी नैवेद्यासाठी बनविण्यात आली होती. सायंकाळी गणरायाबरोबर गौराईला निरोप देण्यात आला.गेले पाच दिवस संपूर्ण वातावरणच भारावून गेले होते. ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने आसमंत अगदी दुमदुमून गेल्याचा भास होत होता. आरती व भजनांचे सूर सर्वत्र ऐकू येत होते. त्यातच सोमवारचा दिवस उजाडला आणि पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. गणरायासोबत देण्याच्या शिदोरीची तयारी करण्यात आली. सायंकाळी नद्या, समुद्र, तलाव, विहिरी आदी ठिकाणी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. सात, नऊ, अकरा दिवसांनीही काही ठिकाणी गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन सुरू आहे. कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्डही कार्यरत होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशीच काहीशी स्थिती होती. (वार्ताहर)