शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सिंधुदुर्गात गौरी-गणपतींना निरोप

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

. कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी जड अंत:करणाने गौरी-गणपतीना निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी ६६ हजार २६२ घरांमध्ये, तर ३७ सार्वजनिक मंडळांच्या गणरायांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येऊन मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले होते. गेले पाच दिवस ‘श्रीं’चा जागर सर्वत्र सुरू होता. शनिवारी गौराईचे आगमनही झाले. त्यानंतर रविवारी पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन करण्यात आले. विविध गीतांच्या साथीने फुगड्याचा फेर धरत महिलांनी रविवारची रात्र जागवली आणि आपल्या मनातले मागणे गौराईजवळ मागितले, तर सोमवारी सकाळपासूनच गौराईच्या विसर्जनाचे वेध महिलावर्गाला लागले होते. विविध भाज्या व भाकरी नैवेद्यासाठी बनविण्यात आली होती. सायंकाळी गणरायाबरोबर गौराईला निरोप देण्यात आला.गेले पाच दिवस संपूर्ण वातावरणच भारावून गेले होते. ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने आसमंत अगदी दुमदुमून गेल्याचा भास होत होता. आरती व भजनांचे सूर सर्वत्र ऐकू येत होते. त्यातच सोमवारचा दिवस उजाडला आणि पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. गणरायासोबत देण्याच्या शिदोरीची तयारी करण्यात आली. सायंकाळी नद्या, समुद्र, तलाव, विहिरी आदी ठिकाणी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. सात, नऊ, अकरा दिवसांनीही काही ठिकाणी गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन सुरू आहे. कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्डही कार्यरत होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशीच काहीशी स्थिती होती. (वार्ताहर)