शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

सिंधुदुर्गात गौरी-गणपतींना निरोप

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

. कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी जड अंत:करणाने गौरी-गणपतीना निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी ६६ हजार २६२ घरांमध्ये, तर ३७ सार्वजनिक मंडळांच्या गणरायांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येऊन मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले होते. गेले पाच दिवस ‘श्रीं’चा जागर सर्वत्र सुरू होता. शनिवारी गौराईचे आगमनही झाले. त्यानंतर रविवारी पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन करण्यात आले. विविध गीतांच्या साथीने फुगड्याचा फेर धरत महिलांनी रविवारची रात्र जागवली आणि आपल्या मनातले मागणे गौराईजवळ मागितले, तर सोमवारी सकाळपासूनच गौराईच्या विसर्जनाचे वेध महिलावर्गाला लागले होते. विविध भाज्या व भाकरी नैवेद्यासाठी बनविण्यात आली होती. सायंकाळी गणरायाबरोबर गौराईला निरोप देण्यात आला.गेले पाच दिवस संपूर्ण वातावरणच भारावून गेले होते. ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने आसमंत अगदी दुमदुमून गेल्याचा भास होत होता. आरती व भजनांचे सूर सर्वत्र ऐकू येत होते. त्यातच सोमवारचा दिवस उजाडला आणि पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. गणरायासोबत देण्याच्या शिदोरीची तयारी करण्यात आली. सायंकाळी नद्या, समुद्र, तलाव, विहिरी आदी ठिकाणी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. सात, नऊ, अकरा दिवसांनीही काही ठिकाणी गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन सुरू आहे. कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्डही कार्यरत होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशीच काहीशी स्थिती होती. (वार्ताहर)