शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

गणेश चित्रशाळांमध्ये दिवसरात्र गजबज

By admin | Updated: September 7, 2015 23:23 IST

मूर्तिकार व्यस्त : वाढत्या महागाईचा सर्वांनाच बसतोय फटका

निकेत पावसकर -- नांदगांव  अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागलेले असून दिवसरात्र गावागावातील गणेशशाळा गजबजू लागल्या आहेत. पिढ्यानपिढ्या गणेशमूर्ती घडविणारे मूर्तीकार आता गणरायाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत.कोकणात परंपरागत गणेशमूर्ती घडविणारे अनेक कलाकार आहेत. आपली पिढीजात कला आजही टिकवून ठेवलेली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चांगले मूर्तिकार यानिमित्ताने असल्याचे दिसून येते. आपल्या कुंचल्यातून सुंदर गणेशमूर्ती घडविण्याचे काम अनेक वर्षे करताना दिसतात. केवळ एक कला, मानसिक समाधान आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला जोपासली गेली पाहिजे यासाठीच ही परंपरागत कला चालू ठेवल्याचे सांगितले जाते. आपण व्यवसाय म्हणून याकडे न पाहता कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने हा व्यवसाय करीत असल्याचे ग्रामीण भागातील अनेक मूर्तिकार सांगतात.कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक गणेश मूर्तिकारांकडे किमान ५० ते ६० विविध आकारातल्या मातीच्या गणेशमूर्ती असतात. या गणेशोत्सवाची चाहूल किमान दोन महिने पूर्वीपासून लागते. कोकणातील अनेक ठिकाणी भजनांचे सूरही या दरम्यान ऐकू येतात. काही ठिकाणी कागदाच्या लगद्यापासूनही गणेशमूर्ती बनविल्या जातात. पर्यावरणप्रेमी तर वर्षानुवर्षे अशाचप्रकारची गणेशमूर्ती आणतात. इथले गणेश मूर्तिकार काही वर्षांपूर्वी पिवळ्या चिकट मातीपासून गणेश मूर्ती बनवायचे. त्यावेळी मात्र खूप कष्ट घ्यावे लागत असल्याचेही वयोवृद्ध मूर्तिकारांकडून सांगण्यात येते. त्यावेळी त्या मातीला पर्यायच नव्हता. तर अलिकडच्या काळात त्या मातीऐवजी पेणला मिळणारी राखाडी माती अनेकजण मागवतात. ती तयार माती येत असल्यामुळे मूर्ती घडवायला सहज सोपे जाते. ही कला जोपासताना मात्र दरवर्षी वाढीव किंमतीलाही सामोरे जावे लागत आहे. वाढणारी महागाई यामुळे ही कला जोपासणे अत्यंत जिकिरीचे झाले असल्याचेही अनेकजण बोलून दाखवितात. या गणेशमूर्ती साकारताना मूर्तिकारांचे कसब लागते. त्यात त्यांची जबाबदारी वाढलेली असते. कोकणातल्या या गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणचे चाकरमानी आवर्जून येतात. मात्र, ग्रामीण भागात अजूनही वेगवेगळ्या कारणांसाठी अक्षरश: कसरतच करावी लागत असून आमची ही कला भविष्यातही जिवंत रहावे यासाठीच ही कारागिरी सुरु असल्याचे सांगतानाच यात मिळणारे मानसिक समाधान खूप मोलाचे आहे. दरवर्षी माती, रंगाचे वाढलेले दर शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी व गणेशमूर्तीमधून मिळणारी रक्कम याचा मेळच बसत नसल्याचेही सांगितले जाते.