शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचे भवितव्य अंधकारमय

By admin | Updated: February 18, 2015 23:44 IST

नीतेश राणे : सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेबाबत व्यक्त केला संशय

कणकवली : दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्या पाच जिल्ह्यात समावेश असणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्याचे भवितव्य सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे अंधकारमय बनले आहे. केंद्रात व राज्यात आपलीच सत्ता असल्याने विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणला जाईल अशी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते. मात्र, जिल्ह्यातील एकाही प्रकल्प किंवा विकासकामाबाबत ठोस भूमिका ते व्यक्त करीत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा अधोगतीकडे चालला असल्याची टीका कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी येथे केली.कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार राणे म्हणाले, जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून सध्या शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सुरु असलेल्या हालचाली चिंताजनक आहेत. विविध विकासकामांसाठी मोठा निधी आणणार असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र तसे होताना दिसत नाही. हत्ती पकड मोहीम जिल्ह्यात यशस्वी झाली. या मोहिमेसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे तसेच प्रशासनाचे मी अभिनंदन करतो. नारायण राणे यांनी या मोहिमेसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. हत्तींकडून झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणे अडचणीचे ठरत आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीत भातसाठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता १५ दिवसांत नवीन गोदामाबरोबरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होेते. मात्र अद्याप काहीही झालेले नाही. शिवसेना व भाजपाच्या मंत्र्यांमध्ये अधिकारावरून वाद निर्माण झाले असून त्याचा परिणाम सिंधुदुर्गच्या विकासावर होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करणार आहे. नुकसानभरपाईबाबत सत्ताधारी आवाज उठविताना दिसत नाहीत. वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीच्यावेळी पालकमंत्र्यांनी सी वर्ल्डबाबत वेगळी भूमिका मांडली. त्यामुळे सी वर्ल्ड प्रकल्प वेंगुर्ले की मालवण तालुक्यात व्हावा याबाबतची ठोस भूमिका त्यांनी जनतेसाठी स्पष्ट करावी. देवगड-जामसंडे नळयोजनेबाबतच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण आपल्याला देण्यात आले नव्हते. मात्र, या बैठकीबाबत माहिती मिळावी यासाठी पत्र दिले तर पालकमंत्र्यांनी तिलारीसारखा प्रकल्प जामसंडे येथे व्हावा असे सांगितल्याचे समजले. माजी आमदार अजित गोगटे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेमधून निधी या नळयोजनेसाठी दिला जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांची परस्परविरोधी वक्तव्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. (वार्ताहर) शिव वडापाव स्टॉल अधिकृत करामुंबईत अनेक मराठी माणसांनी शिव वडापाव स्टॉल उभारले असून त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हे स्टॉल अधिकृत करून स्टॉलधारकांच्या डोक्यावरील अनिश्चिततेचे सावट दूर करावे, अशी मागणी मुंबईच्या महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे, असे राणे म्हणाले.सत्ताधाऱ्यांकडून कोकणवरच अन्याय का?सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणातील अनेक पाटबंधारे प्रकल्प अपूर्ण आहेत. या प्रकल्पांसाठी निधीच उपलब्ध करून न दिल्याने कामे ठप्प आहेत. कणकवली नगरपंचायतीला विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने विकास ठप्प आहे.हा कोकणवर अन्याय असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष या समस्यांकडे वेधणार असल्याचे आमदार राणे म्हणाले. जिल्हा नियोजन बैठकीत उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अजूनही त्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही