शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

बंधाऱ्यासाठी निधी अपुरा

By admin | Updated: October 2, 2014 22:22 IST

पाणी अडवा योजना : जिल्ह्याला गरज अधिक पैशांची

रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, योजनेंतर्गत शासनाकडून बंधारे बांधण्यात येत आहेत. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, यावर्षीसाठी केवळ २ कोटी ६ लाखाच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. गतवर्षीपेक्षा निधीमध्ये घट झालेली दिसून येत आहे.नदीमधील पाणी अडवून ते जिरविण्यासाठी बंधारे बांधण्यात येतात. गावोगावी माती, वळण बंधारे व सिमेंटचे बंधारे बांधण्यात येतात. २०१२-१३ मध्ये सिमेंट बंधारे १५, तर वळण बंधारे १४ बांधण्यात आले होते. एकूण २९ बंधारे बांधण्यात आल्याने त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. २०१३-१४ मध्ये ५० बंधारे बांधण्यात आले. त्याकरिता ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र निम्माच निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजन मंडळातून १ कोटी ५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे, उर्वरित निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. बंधारे बांधकामासाठी सन २०१२-१३ मध्ये निधी कमी प्राप्त झाला होता. गतवर्षी निधीमध्ये वाढ झाली होती. परंतु यावर्षी पुन्हा निधी कमी प्राप्त झाला आहे. त्यामुळे यावर्षी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडणार आहे. दिवाळीनंतर बंधारे बांधकामाला प्रारंभ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, बचत गट, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारे बांधण्यात येतात. दिवाळीसुटीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर बंधारे बांधकामाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर बंधाऱ्यांची कामे हाती घेऊन ती पूर्ण करावीत, यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले असून, दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जातील. यंदा निधी कमी असला तरी तो वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी साडेचार कोटी यंदा मात्र केवळ २ कोटी ६ लाख.निधीच्या कमतरतेचा फटका बंधाऱ्यांच्या कामांना. गतवर्षी २९ बंधारे.२०१३-१४ मध्ये ५० बंधारे.जिल्हा नियोजन मंडळाकडील निधी १ कोटी ५ लाखाचा.एक वर्षाच्या फरकाने पुन्हा निधीची बोंबाबोंब.निवडणूक निकालानंतर म्हणजेच दिवाळी दरम्यान नव्या कामांना सुरूवात होण्याची शक्यता.