शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

बंधाऱ्यासाठी निधी अपुरा

By admin | Updated: October 2, 2014 22:22 IST

पाणी अडवा योजना : जिल्ह्याला गरज अधिक पैशांची

रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, योजनेंतर्गत शासनाकडून बंधारे बांधण्यात येत आहेत. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, यावर्षीसाठी केवळ २ कोटी ६ लाखाच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. गतवर्षीपेक्षा निधीमध्ये घट झालेली दिसून येत आहे.नदीमधील पाणी अडवून ते जिरविण्यासाठी बंधारे बांधण्यात येतात. गावोगावी माती, वळण बंधारे व सिमेंटचे बंधारे बांधण्यात येतात. २०१२-१३ मध्ये सिमेंट बंधारे १५, तर वळण बंधारे १४ बांधण्यात आले होते. एकूण २९ बंधारे बांधण्यात आल्याने त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. २०१३-१४ मध्ये ५० बंधारे बांधण्यात आले. त्याकरिता ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र निम्माच निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजन मंडळातून १ कोटी ५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे, उर्वरित निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. बंधारे बांधकामासाठी सन २०१२-१३ मध्ये निधी कमी प्राप्त झाला होता. गतवर्षी निधीमध्ये वाढ झाली होती. परंतु यावर्षी पुन्हा निधी कमी प्राप्त झाला आहे. त्यामुळे यावर्षी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडणार आहे. दिवाळीनंतर बंधारे बांधकामाला प्रारंभ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, बचत गट, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारे बांधण्यात येतात. दिवाळीसुटीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर बंधारे बांधकामाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर बंधाऱ्यांची कामे हाती घेऊन ती पूर्ण करावीत, यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले असून, दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जातील. यंदा निधी कमी असला तरी तो वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी साडेचार कोटी यंदा मात्र केवळ २ कोटी ६ लाख.निधीच्या कमतरतेचा फटका बंधाऱ्यांच्या कामांना. गतवर्षी २९ बंधारे.२०१३-१४ मध्ये ५० बंधारे.जिल्हा नियोजन मंडळाकडील निधी १ कोटी ५ लाखाचा.एक वर्षाच्या फरकाने पुन्हा निधीची बोंबाबोंब.निवडणूक निकालानंतर म्हणजेच दिवाळी दरम्यान नव्या कामांना सुरूवात होण्याची शक्यता.