शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

बंधाऱ्यासाठी निधी अपुरा

By admin | Updated: October 2, 2014 22:22 IST

पाणी अडवा योजना : जिल्ह्याला गरज अधिक पैशांची

रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, योजनेंतर्गत शासनाकडून बंधारे बांधण्यात येत आहेत. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, यावर्षीसाठी केवळ २ कोटी ६ लाखाच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. गतवर्षीपेक्षा निधीमध्ये घट झालेली दिसून येत आहे.नदीमधील पाणी अडवून ते जिरविण्यासाठी बंधारे बांधण्यात येतात. गावोगावी माती, वळण बंधारे व सिमेंटचे बंधारे बांधण्यात येतात. २०१२-१३ मध्ये सिमेंट बंधारे १५, तर वळण बंधारे १४ बांधण्यात आले होते. एकूण २९ बंधारे बांधण्यात आल्याने त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. २०१३-१४ मध्ये ५० बंधारे बांधण्यात आले. त्याकरिता ४ कोटी ४७ लाख १४ हजार रूपये खर्च करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र निम्माच निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजन मंडळातून १ कोटी ५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे, उर्वरित निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. बंधारे बांधकामासाठी सन २०१२-१३ मध्ये निधी कमी प्राप्त झाला होता. गतवर्षी निधीमध्ये वाढ झाली होती. परंतु यावर्षी पुन्हा निधी कमी प्राप्त झाला आहे. त्यामुळे यावर्षी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडणार आहे. दिवाळीनंतर बंधारे बांधकामाला प्रारंभ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, बचत गट, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारे बांधण्यात येतात. दिवाळीसुटीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर बंधारे बांधकामाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर बंधाऱ्यांची कामे हाती घेऊन ती पूर्ण करावीत, यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले असून, दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जातील. यंदा निधी कमी असला तरी तो वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी साडेचार कोटी यंदा मात्र केवळ २ कोटी ६ लाख.निधीच्या कमतरतेचा फटका बंधाऱ्यांच्या कामांना. गतवर्षी २९ बंधारे.२०१३-१४ मध्ये ५० बंधारे.जिल्हा नियोजन मंडळाकडील निधी १ कोटी ५ लाखाचा.एक वर्षाच्या फरकाने पुन्हा निधीची बोंबाबोंब.निवडणूक निकालानंतर म्हणजेच दिवाळी दरम्यान नव्या कामांना सुरूवात होण्याची शक्यता.