शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीला निधी द्यावा

By admin | Updated: November 17, 2015 00:02 IST

सरपंचांची बैठक : तहसीलदारांना दिले निवेदन

चिपळूण : घरपट्टी वसुली बंद करण्यात आल्याने ग्रामपंचायतींच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अवघड झाले आहे. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार वृषाली पाटील यांना सभापती सुचिता सुवार यांच्यासह पंचायत समिती सदस्य व सर्व सरपंचांनी दिले.चिपळूण पंचायत समितीच्या सभागृहात सभापती सुचिता सुवार याच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी माजी सभापती शौकत मुकादम, जितेंद्र चव्हाण, सुरेश खापले, पंचायत समिती सदस्या स्नेहा मेस्त्री, प्रिया भुवड, पूनम शिंदे, ऋचा म्हालीम, दिलीप मोरे, चंद्रकात जाधव, दीपक वारोसे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सरपंचांनी आपल्या व्यथा मांडल्या. ग्रामसेवक ऐकत नाहीत. मिटिंगचे निमंत्रण केवळ दूरध्वनीवरून आयत्या वेळी दिले जाते. त्यामुळे पंचाईत होते. शासनाच्या या निर्णयाचा फटका ग्रामपंचायतीला बसला आहे. ग्रामीण भागात काम करणे अवघड झाले आहे. विविध उपक्रम शासन आमच्या माथी मारते. लोकसहभागातून सर्वच गोष्टी करणे आता शक्य होत नाही. आॅनलाईन प्रक्रियेचा फटकाही ग्रामपंचायतीला बसत आहे, असा समस्यांचा पाढा सरपचांनी वाचला.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरपट्टी ही चौरस फूट किंवा घराच्या मूल्यांकनावर आकारणी करण्याबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील घरपट्टी वसूली स्थगित करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आर्थिक संकटात सापडल्या आहेत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकासकामे, कार्यालयातील दिवाबत्ती पथदिव्यांची देयके, इतर आवश्यक बाबी व स्टेशनरी निधीअभावी खर्च करता येत नसल्याने ग्रामपंचायतींचा कार्यभार ठप्प झाला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांना दैनंदिन कामकाज करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. या बाबींचा गाभीर्याने विचार करून घरपट्टी आकारणीबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने सर्व ग्रामपंचायतींना अनुदान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. आज बैठकीत या विषयावर गांभिर्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आपली निवेदने शासनापर्यंत पाठवू, असे तहसीलदारांनी सांगितले. यावेळी वालोपे सरपंच मयुरी मुरकर, दहिवली बुद्रुकचे सुहास पांचाळ, उपसरपंच रुपेश घाग, कळंबस्तेच्या आशा राक्षे, खडपोलीचे मुस्कान अडरेकर, धामणवणे उपसरपंच स्नेहा जोशी, कामथेच्या संस्कृती महाडिक, खेर्डीच्या जयश्री खताते, कान्हेच्या गीतांजली मोडक, कौंढरचे महेंद्र तावडे, परशुरामच्या मंजिरी जोशी, वडेरुच्या निकिता कदम, टेरवच्या भाग्यलक्ष्मी मोरे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)