शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ग्रामपंचायतीला निधी द्यावा

By admin | Updated: November 17, 2015 00:02 IST

सरपंचांची बैठक : तहसीलदारांना दिले निवेदन

चिपळूण : घरपट्टी वसुली बंद करण्यात आल्याने ग्रामपंचायतींच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अवघड झाले आहे. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार वृषाली पाटील यांना सभापती सुचिता सुवार यांच्यासह पंचायत समिती सदस्य व सर्व सरपंचांनी दिले.चिपळूण पंचायत समितीच्या सभागृहात सभापती सुचिता सुवार याच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी माजी सभापती शौकत मुकादम, जितेंद्र चव्हाण, सुरेश खापले, पंचायत समिती सदस्या स्नेहा मेस्त्री, प्रिया भुवड, पूनम शिंदे, ऋचा म्हालीम, दिलीप मोरे, चंद्रकात जाधव, दीपक वारोसे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सरपंचांनी आपल्या व्यथा मांडल्या. ग्रामसेवक ऐकत नाहीत. मिटिंगचे निमंत्रण केवळ दूरध्वनीवरून आयत्या वेळी दिले जाते. त्यामुळे पंचाईत होते. शासनाच्या या निर्णयाचा फटका ग्रामपंचायतीला बसला आहे. ग्रामीण भागात काम करणे अवघड झाले आहे. विविध उपक्रम शासन आमच्या माथी मारते. लोकसहभागातून सर्वच गोष्टी करणे आता शक्य होत नाही. आॅनलाईन प्रक्रियेचा फटकाही ग्रामपंचायतीला बसत आहे, असा समस्यांचा पाढा सरपचांनी वाचला.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरपट्टी ही चौरस फूट किंवा घराच्या मूल्यांकनावर आकारणी करण्याबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील घरपट्टी वसूली स्थगित करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आर्थिक संकटात सापडल्या आहेत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकासकामे, कार्यालयातील दिवाबत्ती पथदिव्यांची देयके, इतर आवश्यक बाबी व स्टेशनरी निधीअभावी खर्च करता येत नसल्याने ग्रामपंचायतींचा कार्यभार ठप्प झाला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांना दैनंदिन कामकाज करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. या बाबींचा गाभीर्याने विचार करून घरपट्टी आकारणीबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने सर्व ग्रामपंचायतींना अनुदान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. आज बैठकीत या विषयावर गांभिर्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आपली निवेदने शासनापर्यंत पाठवू, असे तहसीलदारांनी सांगितले. यावेळी वालोपे सरपंच मयुरी मुरकर, दहिवली बुद्रुकचे सुहास पांचाळ, उपसरपंच रुपेश घाग, कळंबस्तेच्या आशा राक्षे, खडपोलीचे मुस्कान अडरेकर, धामणवणे उपसरपंच स्नेहा जोशी, कामथेच्या संस्कृती महाडिक, खेर्डीच्या जयश्री खताते, कान्हेच्या गीतांजली मोडक, कौंढरचे महेंद्र तावडे, परशुरामच्या मंजिरी जोशी, वडेरुच्या निकिता कदम, टेरवच्या भाग्यलक्ष्मी मोरे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)