शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिक आंदोलन करणार

By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST

सत्याग्रहात सहभागी व्हा : जयानंद मठकर यांचा इशारा

सावंतवाडी : गोवा स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना आता सन्मानासाठी लढा देण्याची वेळ आली आहे. हुतात्मा स्मारकांची दुरवस्था थांबवावी, राज्यात स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानाने जगता यावे, या मूलभूत मागण्यांसाठी मुख्यमंत्री त्यांना भेट देणे टाळत आहेत. त्यामुळे त्यांनी ३० जुलै रोजी मुुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघाचे अध्यक्ष जयानंद मठकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यात शासकीय खर्चाने उभारलेल्या हुतात्मा स्मारकांची शासनाच्या अनास्थेमुळे झालेली दुरवस्था, मुंबईत येणाऱ्या राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना उतरण्यासाठी उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची सदनाची शोकांतिका आणि स्वातंत्र्य सैनिकांना राज्यात सन्मानाने जगता यावे, यासाठी राज्याने देऊ केलेल्या सोयी-सवलतींना अंमलबजावणीच्या नियमातील त्रुटीमुळे तसेच तांत्रिक कारणामुळे बहुसंख्य स्वातंत्र्य सैनिकांना वंचित रहावे लागत आहे. राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या या व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य सैनिक संघाने भेट मागितली होती. माजी दोन्ही मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिकांचे सुपुत्र असूनही स्वातंत्र्य सैनिकांच्या व्यथा जाणून घेण्यास त्यांना सवड काढता आली नाही. इतर राज्यांशी तुलना करता राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन कमी मिळते. असे असूनही निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी न करता राज्यात शासनाने स्वखर्चाने उभारलेल्या हुतात्मा स्मारकांची दैनावस्था दूर व्हावी, या राज्यात स्वातंत्र्य सैनिकांसाठी मुंबईत उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिक सदनाचा होणारा गैरवापर थांबवून त्याचा लाभ स्वातंत्र्य सैनिकांना मिळावा. तसेच स्वातंत्र्य सैनिकांना या राज्यात सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाने देऊ केलेल्या सोयी-सवलती स्वातंत्र्य सैनिकांना मिळाव्यात, एवढ्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती. पण त्यांना भेट देण्याची सुबुद्धी झाली नाही, हे राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे दुर्दैव म्हणायला हवे. याबद्दल निषेध नोंदवायच्या म्हटले तर निषेध हा शासनाच्या इतक्या अंगळवाणी पडला आहे की, तो आता निरर्थक झाला आहे. १८ जूनला गोवा क्रांतिदिनाच्या अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्य संग्राम सैनिक संघाच्या सभेत महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या प्रणालीनुसार निषेधाऐवजी आत्मक्लेशानुसार खेद व्यक्त करण्यासाठी ३० जुलै रोजी मुंबईत दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी सहभागी होऊन सत्याग्रह यशस्वी करावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष मठकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांना केले आहे. (वार्ताहर)