शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

अपंगांना मोफत गणवेश

By admin | Updated: August 7, 2015 23:46 IST

समाजकल्याण सभापतींचा निर्णय : २७६ विद्यार्थ्यांना लाभ, २ लाख रूपयांची तरतूद

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अपंग विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मोफत गणवेश देण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी घेतला. याचा लाभ जिल्ह्यातील २७६ अपंग विद्यार्थ्यांना मिळणार असून यासाठी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रती विद्यार्थी २ असे गणवेश विद्यार्थ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मिळणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्य सुरेश ढवळ, वृंदा सारंग, धोंडूू पवार, आस्था सर्पे, समिती सचिव तथा प्रभारी समाजकल्याण अधिकारी मारुती जाधव, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. सिंधुदुर्गात अपंग विद्यार्थ्यांच्या ७ शाळा आहेत. यात ६ विनाअनुदानित व एका अनुदानित शाळेचा समावेश आहे. या शाळांमध्ये पोषण आहार, गणवेश हा शासनाकडून दिला जात नसल्याने या विद्यार्र्थ्यांना या सोयी प्राप्त व्हाव्यात यासाठी वेळोवेळी मागणी होत होती. या मागणीची दखल समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी घेत समाजकल्याण विभागाच्या ३ टक्के अपंग सेस निधीतून या २७६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ याप्रमाणे गणवेश द्यायचा निर्णय घेतला आहे. हे गणवेश सप्टेंबर अखेरपर्यंत वितरीत करण्यात येतील असेही जाधव यांनी स्पष्ट केले. यासाठी २ लाख निधीची तरतूद समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आली आहे.समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या घरातील कुटुंब लाभ घेत असल्याचा खळबळजनक आरोप समिती सदस्य सुरेश ढवळ यांनी करीत गरीब जनता या योजनांपासून अलिप्त राहिल्याचे सांगितले. याची गंभीर दखल समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी घेत योजनांचा फायदा जर गरजंूव्यतिरिक्त अन्य कोणी घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)नोव्हेंबरमध्ये १०० टक्के खर्च झालाच पाहिजेसमाजकल्याण विभागाचा नोव्हेंबर अखेरपर्यंत १०० टक्के खर्च झालाच पाहिजे. निधी अखर्चित राहिल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून आलेले प्रस्ताव तत्काळ जिल्हा स्तरावर पाठवा, असे आदेश समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिले.पथक स्थापन करासमाजकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना देत असलेल्या योजनांच्या निधीचा सदुपयोग झाला की नाही हे पहाण्यासाठी जिल्हास्तरावर पथक स्थापन करावे व त्या लाभार्थ्यांची चौकशी करावी असा निर्णय घेण्यात आला.