शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

फसवेगिरी संपली, सतर्कता वाढली

By admin | Updated: March 16, 2015 00:08 IST

उत्पादक होतोय सतर्क : काजूच्या व्यवसाय बनला सचोटीचा !--काजू रे काजू भाग-२

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  काजूच्या उत्पादकतेमध्ये चढ उतार असला तरी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत ठिकठिकाणी विके्रेते काजू बी खरेदी करताना दिसतात. ग्रामीण भागातील काजू बी खरेदी परप्रांतीयांकडून सर्वाधिक होत असलेल्याचे दिसून येते. बेकरी उत्पादनावर काजू बीचे प्रमाण हळूहळू घटत आहे. शिवाय सतर्कतेमुळे फसवेगिरीचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे.बेकरीची उत्पादनांच्या बदल्यात काजू बी खरेदी करण्यात येते. अजूनही हे प्रमाण असले तरी ते किरकोळ आहे. ग्रामीण भागातील अनेक मंडळी शहरात नोकरी किंवा कामानिमित्त येत असल्याने दराबद्दल जागरूकता आली आहे. शहरात दर चांगला मिळत असला तरी तो निवडक किंवा दर्जेदार काजूला मिळतो. त्यामुळे परप्रांतीयांना सरसकट काजू बी घातली जाते. ग्रामीण भागातून परप्रांतीय ७० ते ८० रूपयांना खरेदी करून शहरात आणून तेच काजू ९० ते ९२ रूपयांना विकतात. काजू व्यवसायातील आता परकेपण संपले असून स्थानिकांचाही या व्यवसायात सहभाग वाढत आहे. शिवाय उत्पादक शेतकरीही सजग झाला असल्याने व्यवसायात प्रामाणिकपणा आणि सजगपणा आला आहे.वास्तविक बोंड तयार झालेनंतर त्यापासून विलग झालेले काजू निवडले जातात. मात्र काही शेतकरी हिरव्या बोंडाचे काजू काढले जातात. सुरूवातीला दर चांगला मिळत असल्याने अधिकाधिक काजू विक्रीला घातला जातो. शिवाय चोरीचे प्रमाण वाढत असल्याने राखणीला मनुष्यबळ खर्च करणे परवडत नाही. परिणामी शक्यतो काजू बी गोळा करण्यासाठी घाई केली जाते. ग्रामीण भागात सुशिक्षित मंडळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जागरूकता आली आहे. भैय्यांना काजू बी घालताना दराबाबत घासाघीस नक्कीच केली जात आहे. परप्रांतीय काजूचा दर्जा पाहत नसल्यामुळे सरसकटसाठीचा दर दिला जातो. परिणामी दर कमी लाभत आहे. रत्नागिरीचे काजू चवीला गोड व रूचकर असल्यामुळे परराज्यातून चांगली मागणी होत आहे. परप्रांतीयांकडून काजू बी गोळा करताना दर्जा तपासला जात नाही. लहान मोठी बी घातली जाते. त्यामुळे दर कमी प्राप्त होतो. मात्र, निवडक काजूला दर चांगला मिळतो. रत्नागिरी काजूची बेंगलोरमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.- प्रशांत टिळेकर, काजू व्यावसायिक, रत्नागिरी.