शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फसवेगिरी संपली, सतर्कता वाढली

By admin | Updated: March 16, 2015 00:08 IST

उत्पादक होतोय सतर्क : काजूच्या व्यवसाय बनला सचोटीचा !--काजू रे काजू भाग-२

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  काजूच्या उत्पादकतेमध्ये चढ उतार असला तरी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत ठिकठिकाणी विके्रेते काजू बी खरेदी करताना दिसतात. ग्रामीण भागातील काजू बी खरेदी परप्रांतीयांकडून सर्वाधिक होत असलेल्याचे दिसून येते. बेकरी उत्पादनावर काजू बीचे प्रमाण हळूहळू घटत आहे. शिवाय सतर्कतेमुळे फसवेगिरीचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे.बेकरीची उत्पादनांच्या बदल्यात काजू बी खरेदी करण्यात येते. अजूनही हे प्रमाण असले तरी ते किरकोळ आहे. ग्रामीण भागातील अनेक मंडळी शहरात नोकरी किंवा कामानिमित्त येत असल्याने दराबद्दल जागरूकता आली आहे. शहरात दर चांगला मिळत असला तरी तो निवडक किंवा दर्जेदार काजूला मिळतो. त्यामुळे परप्रांतीयांना सरसकट काजू बी घातली जाते. ग्रामीण भागातून परप्रांतीय ७० ते ८० रूपयांना खरेदी करून शहरात आणून तेच काजू ९० ते ९२ रूपयांना विकतात. काजू व्यवसायातील आता परकेपण संपले असून स्थानिकांचाही या व्यवसायात सहभाग वाढत आहे. शिवाय उत्पादक शेतकरीही सजग झाला असल्याने व्यवसायात प्रामाणिकपणा आणि सजगपणा आला आहे.वास्तविक बोंड तयार झालेनंतर त्यापासून विलग झालेले काजू निवडले जातात. मात्र काही शेतकरी हिरव्या बोंडाचे काजू काढले जातात. सुरूवातीला दर चांगला मिळत असल्याने अधिकाधिक काजू विक्रीला घातला जातो. शिवाय चोरीचे प्रमाण वाढत असल्याने राखणीला मनुष्यबळ खर्च करणे परवडत नाही. परिणामी शक्यतो काजू बी गोळा करण्यासाठी घाई केली जाते. ग्रामीण भागात सुशिक्षित मंडळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जागरूकता आली आहे. भैय्यांना काजू बी घालताना दराबाबत घासाघीस नक्कीच केली जात आहे. परप्रांतीय काजूचा दर्जा पाहत नसल्यामुळे सरसकटसाठीचा दर दिला जातो. परिणामी दर कमी लाभत आहे. रत्नागिरीचे काजू चवीला गोड व रूचकर असल्यामुळे परराज्यातून चांगली मागणी होत आहे. परप्रांतीयांकडून काजू बी गोळा करताना दर्जा तपासला जात नाही. लहान मोठी बी घातली जाते. त्यामुळे दर कमी प्राप्त होतो. मात्र, निवडक काजूला दर चांगला मिळतो. रत्नागिरी काजूची बेंगलोरमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.- प्रशांत टिळेकर, काजू व्यावसायिक, रत्नागिरी.