शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चौपदरीकरण करा

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

पावशी ग्रामस्थांची मागणी : अन्य गावांतून अजूनही विरोध सुरूच

कुडाळ : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनावेळी येथील ग्रामस्थांवर अन्याय न होता त्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करण्यात यावे, अन्यथा लोक बेघर होऊन त्यांच्या उपजीविकेचे साधन बंद होईल. याकरिता येथील ग्रामस्थांचे म्हणणे शासन दरबारी मांडावे, अशा आशयाचे निवेदन कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना पावशी सरपंच व ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले. जिल्ह्यात होणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाबाबत भूसंपादन प्रक्रियेला अनेक गावांतून विरोध होत आहे. अशाचप्रकारे चुकीच्या पद्धतीने व अन्यायकारक भूसंपादन प्रक्रिया होऊ नये, अशी मागणी पावशी सरपंच श्रीपाद तवटे यांनी पावशी ग्रामस्थांच्यावतीने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अवाजवी भूसंपादन होत असून या भूसंपादनास ग्रामस्थांचा विरोध आहे. अवाजवी भूसंपादन केल्याने अनेक लोक बेघर होणार आहेत. आमच्या माहितीप्रमाणे शहरी भागात २२.०५ मीटर भूसंपादन होणार आहे. पावशी गावातील दूरध्वनी बिले ही शहरी भागाप्रमाणे आकारत असल्याने पावशी गाव हा शहरी भागातच येतो. त्यामुळे पावशी गावात २२.०५ मीटर भूसंपादन करण्यात यावे. तसेच दोन्ही बाजूने समसमान भूसंपादन करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. भूसंपादन करण्यासाठी भविष्यातील ६० ते १०० वर्षांचा दळणवळणाचा विचार करून मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येत असल्याने जमिनींची किंमत तसेच निवासी घरांची किंमत सुद्धा भविष्यातील ६० ते १०० वर्षानंतरची बाजारभावाच्या ४ ते ६ पटीने ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना मिळावी. भंगसाळ नदीवरील पुलावर पुराच्या वेळी ५ ते ६ फूट पाणी असते. या सर्व गोष्टींचा विचार करून रहिवाशी व ग्रामस्थांवर अन्याय न होता त्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन करावे. अन्यथा अनेक लोक बेघर होऊन त्यांच्या उपजीविकेचे साधन बंद होईल. ग्रामस्थांचे म्हणणे शासनाकडे मांडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना पावशीचे सरपंच श्रीपाद तवटे यांच्यासह ग्रामस्थ मेघराज वाटवे, वृणाल कुंभार, विनायक मयेकर, संजय कोरगावकर, रवींद्र तुळसकर, संजय केसरकर, अनिल पेडणेकर, अनिल कुंभार, रमेश कुंभार, वेदेश ढवण, अशोक शिरसाट, श्रीधर मुंज, भास्कर गोसावी, योगेश तुळसकर, सुनील तवटे, चंद्रकांत पाटकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)