शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चौपदरीकरणाच्या भूसंपादनास दोन वर्षे?

By admin | Updated: June 5, 2014 00:41 IST

चिपळूण, राजापूर, लांजात भूसंपादनात अडथळे

 रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले असले, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गालगतच्या जमिनी संपादन करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. चिपळूण, लांजा, राजापूरसह काही बाजारपेठांतील जागांचे संपादन करण्यात अडथळे असून, तेथे रस्ता रुंदीकरणात काहीअंशी शिथिलता दिली जाण्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी सुरू आहे. पत्रकारांनीही त्यासाठी पुढाकार घेऊन आंदोलने केली होती. वाढत्या अपघातामुळे तसेच वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे महामार्ग चौपदरीकरणाचा विषय गाजत आहे. जनरेट्यामुळे हे चौपदरीकरणाचे काम मार्गी लागत असून, रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी १६१ कि. मी. ते झाराप ४५० कि.मी. या अंतराकरिता चौपदरीकरण होणार आहे. कशेडी ते संगमेश्वरपर्यंत १६१ ते २६५ कि.मी., संगमेश्वर ते राजापूर विभागात २६५ ते ३५१ कि.मी.व राजापूर ते झाराप ३५१ ते ४५० कि.मी. अशा चार टप्प्यांत चौपदरीकरणाचे काम रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणार आहे. चौपदरीकरणाच्या कामासंबंधी शासन आदेशानंतर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात चौपदरीकरणासाठी आवश्यक ८० मीटर्स रुंद जागेच्या संपादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे चौपदरीकरण प्रत्यक्षात येण्यास तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) धोरण शिथिल होणार मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना रुंदीकरण वा भूसंपादनात काही अडचणी आहेत. चिपळूण बाजारपेठेतून हा रस्ता जाणार असल्याने तेथेही भूसंपादन होणार आहे. मात्र, दुकाने जवळ असल्याने तेथे रुंदीकरणाबाबत काही शिथिलता असावी, अशी मागणी असल्याने तशी शिथिलता महामार्गावरील बाजारपेठांना देण्याचा धोरणात्मक निर्णय होण्याचे संकेत आहेत.