शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खवले तस्करप्रकरणी आणखी चार अटकेत

By admin | Updated: February 12, 2016 23:38 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांच्या वाढलेल्या किमती वन्यजीव प्राण्यांच्या मुळावर उठल्या आहेत.

दापोली : खवले विक्रीप्रकरणी हाती आलेल्या दोन संशयितांमुळे आता आणखी चारजणांपर्यंत पोहोचण्यात वनखात्याला यश आले आहे. खवल्या मांजराची शिकार करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. हे चौघेही मंडणगड, दापोली परिसरातील असून, मांजराला मारून खवले काढून देण्याची जबाबदारी पार पाडत असत. त्यांच्या अटकेमुळे आणखी काही लोक हाती लागण्याची शक्यता आहे.कोकणात आढळणारे खवले मांजर हा वन्यजीव प्राणी धोक्यात आला असून, त्याची खवल्यांसाठी होणारी हत्या चिंतेचा विषय बनली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांच्या वाढलेल्या किमती वन्यजीव प्राण्यांच्या मुळावर उठल्या आहेत. दापोली तालुक्यातील वाकवली येथे सहा लाख रुपये किमतीच्या खवले मांजर तस्करी प्रकरणावरून सिद्ध होत आहे. मात्र, असे असले तरीही कोणतेही शस्त्र नसलेला वनविभाग याला आळा कसा घालणार, यावर वन्यजीव प्राण्यांचे भवितव्य अवलंबून आहे.खवले मांजर खवले तस्करी करणारी टोळी तालुक्यात सक्रिय असल्याची टीप रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून रत्नागिरी पोलिसांनी रात्रीच सापळा रचून संतोष पवार, अशोक पवार (सातारा) या दोन सख्ख्या भावांना वाकवली येथे ६ लाख रुपये किमतीचे खवले मुद्देमालासह ताब्यात घेतले. भंगार व्यवसाय करणाऱ्या या दोन सख्ख्या भावांना अटक झाली. दापोली पोलिसांनी पुढील तपासाकरिता त्यांना ९ फेब्रुवारीला वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानुसार तपास सुरू झाला. त्यात शिकार करणारे नीलेश वाघमारे, महेश जाधव (कुडावळे), दीपक जाधव (दुधेरे-मंडणगड), सचिव पवार (पोयणार) या चारजणांची नावे समोर आली. ते पळून जाण्याच्या आत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. एकमेकांशी संपर्क ठेवून जंगलात कोयती, कुऱ्हाड, चाकू, सुरा, दांडक्याच्या साहाय्याने शिकार केली जायची. बिळातील खवले मांजर उकरून काढण्यासाठी हत्याराचा वापर केला जायचा. खवल्या मांजराची शिकार केल्यावर त्याच्या अंगावर गरम पाणी टाकून कातडी सोलून घेऊन खवले काढण्यात येत असल्याची कबुलीसुद्धा संशयित आरोपींनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खवल्या मांजराच्या खवल्यांना विशेष महत्त्व असल्याने खवले तस्करी टोळीचा मुख्य सूत्रधार तुटपुंज्या किमतीत शिकाऱ्याकडून ते खरेदी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये कमवत आहेत. या तस्करीतील मुख्य सूत्रधार अजून वनविभाग, पोलीस यांच्या हाताला लागलेला नाही. (प्रतिनिधी) ‘लोकमत’च्या वृत्ताची दखलखवले मांजर प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत वनविभागाने तपासाची चक्रे फिरवत कुडावळे, पोयनार, दुधेरे, कातकरवाडीतील चारजणांना अटक केली आहे.माल नेमका जायचा कोणाकडे?चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटात सहा महिन्यांपूर्वी खवले मांजर तस्करी करणारे रॅकेट पकडण्यात चिपळूण पोलिसांना यश आले होते. त्यापाठोपाठ दापोली तालुक्यातील अशा प्रकारची तस्करी करणारे रॅकेट पकडण्यात आले होते. शिकार करणाऱ्या आरोपींना अटक झाली आहे. परंतु, हा माल कोणाकडे जायचा, याचा शोध अजून बाकी आहे. वन्यजीव वाचविण्याची जबाबदारी केवळ वन विभागाचीच नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने वन्यजिवांची काळजी घ्यावी. वन्यजीव निसर्गाच्या चक्रातील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना वाचवण्यासाठी जागरुक नागरिकांनी समोर यावे. तसेच शिकारीला आळा घालावा.- राजेंद्र पत्की,वनपरिक्षेत्र अधिकारी