शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

चाळीस वर्षांनी चिंचाळी कालव्यातून पाणी वाहणार

By admin | Updated: April 8, 2015 23:55 IST

१९७५ साली तांत्रिक मंजूर मिळालेल्या चिंचाळी धरण रडतखडत पूर्ण झाले खरे; पण कालव्यांचे काम अपूर्ण राहिल्याने हे पाणी विनावापर फुकट जात होते.

मंडणगड : तालुक्यातील पहिले व गेली चाळीस वर्षे पूर्णत्त्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिंचाळी धरणातील मुख्य विमोचक व सांडव्याच्या कामास सुरुवात झाली आहे. अपूर्ण कालवे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत कालव्यांच्या माध्यमातून पाणी पोहोचण्याची येथील शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ १९७५ साली तांत्रिक मंजूर मिळालेल्या चिंचाळी धरण रडतखडत पूर्ण झाले खरे; पण कालव्यांचे काम अपूर्ण राहिल्याने हे पाणी विनावापर फुकट जात होते. कालव्याचे हे काम पूर्ण व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर निधीचे प्रस्ताव जात होते. मात्र, निधीअभावी काम रखडले होते. अखेरीस हे काम आता सुरू झाले आहे.धरणाचे कालवे सुरु झाल्यास तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून कालव्यांचा फायदा चिंचाळी, लोकरवण, म्हाप्रळ, कुंभार्ली पन्हळी या गावांना होणार आहे. या गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.यंदा अपूर्ण कालव्याच्या कामाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यापूर्वी धरणात उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे कालवे काम करतात की नाही याची तपासणीसुध्दा होणार असल्याची माहिती धरणाचे अभियंता राणे यांच्याकडून मिळाले असून, कालवे प्रवाहित होऊन पाणी शेतापर्यंत जाण्याची येथील शेतकऱ्याची चाळीस वर्षांची मागणी मार्गी लागणार आहे.या पाण्याचा वापर शेतीसाठीही होणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)