शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 00:21 IST

रघुजीराजे आंग्रे : हर्णैत जयभवानी प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती कार्यक्रम

दापोली : शिवरायांचा खरा इतिहास म्हणजे त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारे ३५० गड किल्ले आहेत. हा इतिहास सध्या ‘ढासळत’ आहे. अरबी समुद्रात होणारे शिवरायांचे भव्य स्मारक पाहिल्यावर कुणा परदेशी व्यक्तीला त्यांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा झाली, तर त्यांना दाखवण्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडूजी होणे गरजेचे असल्याचे मत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी हर्णै येथे बोलताना व्यक्त केले.हर्णै येथील जयभवानी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, कोकणशी आमची नाळ जोडली गेली आहे. आपण नेहमी येथील गड - किल्ल्यांना भेटी देत असतो. त्यातून आपणाला पूर्वजांना भेटल्याचा आनंद मिळतो. सध्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे वारे वाहात आहेत. शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्यच असायला पाहिजे. महाराष्ट्र काही गरीब राज्य नाही, हे सध्या उघड होणाऱ्या घोटाळ्यांच्या आकड्यांवर लक्ष टाकल्यास सहज लक्षात येते. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवरायांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाला शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहण्याची इच्छा झाली व त्याने शिवरायांनी बांधलेले किल्ले पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना काय किल्ल्यांचे पडलेले दगड दाखवणार? त्यांच्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुजी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.याबाबत ते म्हणाले की, सर्व काही सरकार करेल, या भ्रमात कुणी राहू नये. आपल्याला याकरिता काय करता येईल, याचा विचार करावा. सध्या प्रत्येक किल्ल्यात दारूच्या फोडून टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, कुरकुऱ्यांची पाकिटे, सिगारेटची थोटूके असा बराच ऐवज पडलेला आपल्याला आढळून येतो. ज्या गावात किल्ला आहे, त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन दीड ते दोन महिन्यांनी एकदा किल्ल्यातून चक्कर मारली व श्रमदान केले, तर हा किल्ला सहज स्वच्छ होईल. किल्ल्यांमधील वाढलेली झाडी साफ होईल, किल्ल्यात राबता वाढेल. तसेच कुणीतरी येऊन साफसफाई करतंय असं समजल्यावर गावात थोडा दबाव निर्माण होईल व अस्वच्छतेचं प्रमाण कमी होईल. यातून पर्यटकांची संख्या वाढेल आणि रोजगार निर्मितीही होईल, अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सोमनाथ पुन्हा बांधलं जातं, तर रायगडाचीदेखील पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आपण करणार आहोत.(प्रतिनिधी)कोकणात अजूनही आपूलकी शिल्लकआपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने दैनंदिन जीवनात काही वेगळेपणा अनुभवास येतो का? लोकांचा दृष्टीकोन कसा असतो? याबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने आपणाला गर्व वाटतो. आपल्या पूर्वजांची ही कर्मभूमी असल्याने आपण नेहमी कोकणात येतो. एसएससी झाल्यावर आपण सायकलवरून कुलाबा ते सिंंधुदुर्ग अशी सायकल भ्रमंती केली होती. कोकणात अजून आपूलकी शिल्लक आहे, असेही ते म्हणाले.किल्ल्यांची डागडुजी होणे आवश्यक : आंग्रे.आंग्रे घराण्याची कोकणशी नाळ.गड, किल्ल्यांच्या भेटीतून पूर्वजांना भेटल्याचा आनंद ; रघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन.