शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 00:21 IST

रघुजीराजे आंग्रे : हर्णैत जयभवानी प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती कार्यक्रम

दापोली : शिवरायांचा खरा इतिहास म्हणजे त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारे ३५० गड किल्ले आहेत. हा इतिहास सध्या ‘ढासळत’ आहे. अरबी समुद्रात होणारे शिवरायांचे भव्य स्मारक पाहिल्यावर कुणा परदेशी व्यक्तीला त्यांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा झाली, तर त्यांना दाखवण्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडूजी होणे गरजेचे असल्याचे मत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी हर्णै येथे बोलताना व्यक्त केले.हर्णै येथील जयभवानी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, कोकणशी आमची नाळ जोडली गेली आहे. आपण नेहमी येथील गड - किल्ल्यांना भेटी देत असतो. त्यातून आपणाला पूर्वजांना भेटल्याचा आनंद मिळतो. सध्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे वारे वाहात आहेत. शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्यच असायला पाहिजे. महाराष्ट्र काही गरीब राज्य नाही, हे सध्या उघड होणाऱ्या घोटाळ्यांच्या आकड्यांवर लक्ष टाकल्यास सहज लक्षात येते. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवरायांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाला शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहण्याची इच्छा झाली व त्याने शिवरायांनी बांधलेले किल्ले पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना काय किल्ल्यांचे पडलेले दगड दाखवणार? त्यांच्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुजी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.याबाबत ते म्हणाले की, सर्व काही सरकार करेल, या भ्रमात कुणी राहू नये. आपल्याला याकरिता काय करता येईल, याचा विचार करावा. सध्या प्रत्येक किल्ल्यात दारूच्या फोडून टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, कुरकुऱ्यांची पाकिटे, सिगारेटची थोटूके असा बराच ऐवज पडलेला आपल्याला आढळून येतो. ज्या गावात किल्ला आहे, त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन दीड ते दोन महिन्यांनी एकदा किल्ल्यातून चक्कर मारली व श्रमदान केले, तर हा किल्ला सहज स्वच्छ होईल. किल्ल्यांमधील वाढलेली झाडी साफ होईल, किल्ल्यात राबता वाढेल. तसेच कुणीतरी येऊन साफसफाई करतंय असं समजल्यावर गावात थोडा दबाव निर्माण होईल व अस्वच्छतेचं प्रमाण कमी होईल. यातून पर्यटकांची संख्या वाढेल आणि रोजगार निर्मितीही होईल, अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सोमनाथ पुन्हा बांधलं जातं, तर रायगडाचीदेखील पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आपण करणार आहोत.(प्रतिनिधी)कोकणात अजूनही आपूलकी शिल्लकआपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने दैनंदिन जीवनात काही वेगळेपणा अनुभवास येतो का? लोकांचा दृष्टीकोन कसा असतो? याबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने आपणाला गर्व वाटतो. आपल्या पूर्वजांची ही कर्मभूमी असल्याने आपण नेहमी कोकणात येतो. एसएससी झाल्यावर आपण सायकलवरून कुलाबा ते सिंंधुदुर्ग अशी सायकल भ्रमंती केली होती. कोकणात अजून आपूलकी शिल्लक आहे, असेही ते म्हणाले.किल्ल्यांची डागडुजी होणे आवश्यक : आंग्रे.आंग्रे घराण्याची कोकणशी नाळ.गड, किल्ल्यांच्या भेटीतून पूर्वजांना भेटल्याचा आनंद ; रघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन.