शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

नियोजनाअभावी निधीची वनविभागाकडून उधळपट्टी; गरज नसताना आंबोली घाटात संरक्षक कठडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 15:14 IST

सावंतवाडी : संकेश्वर बांदा महामार्गचा आराखडा पूर्ण होऊन आंबोली पर्यंतच्या मार्गाला निधी ही केंद्रिय रस्ते महामार्ग विभागाने मंजुर केला ...

सावंतवाडी : संकेश्वर बांदा महामार्गचा आराखडा पूर्ण होऊन आंबोली पर्यंतच्या मार्गाला निधी ही केंद्रिय रस्ते महामार्ग विभागाने मंजुर केला असतनाच दुसरीकडे मात्र वनविभागाकडून  देवसू पासून आंबोली घाट मार्गावर संरक्षक कठडे उभारण्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे संरक्षक कठडे कोणाच्या तरी नजरेत येऊ नयेत म्हणून रस्त्या पासून आत मध्ये दोनशे मीटर घेतले असून हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या सर्व प्रकारावर वनविभागाचे अधिकारी सारवा सारव करीत असून अद्याप महामार्गा बाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत.

केंद्र सरकारकडून संकेश्वर बांदा हा नवा महामार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आराखडा ही तयार करण्यात आला असून बांधकाम विभागाकडून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग ही करण्यात आला आहे या महामार्गाचा जो आराखडा निश्चित करण्यात आला आहे या आराखड्या प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, माडखोल, सावंतवाडी, इन्सुली, बांदा  मार्गावरून हा रस्ता निश्चित करण्यात आले आहे.

मात्र हा मार्ग निश्चित झाला असतानाच दुसरीकडे मात्र वनविभागाकडून आंबोली घाट मार्गावर रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे उभारणाऱ्याचे निश्चित करण्यात आले असून यासाठी नियोजन विभागाकडून निधी ही मजूर करण्यात आला आहे.मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत हा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.तसेच काहि संरक्षक कठडे ही गेल्या वर्षी उभारण्यात आले असून त्यानंतर  तक्रारी झाल्यानंतर या कठड्याचे काम थांबविण्यात आले होते.मात्र या वर्षी पुन्हा काम सुरू करण्यात आले असून कामाबाबत तक्रारी होऊ नये तसेच आलेला निधी खर्च व्हावा म्हणून वनविभागाकडून नामीशक्कल लढविण्यात आली असून हे कठडे मुख्य मार्गा पासून तब्बल दोनशे मीटर आत मध्ये रस्त्यावरून कुणाला दिसणार नाहीत अशा ठिकाणी उभारण्यात आले आहेत त्यामुळे वन विभागाला नेमके हे कपडे कशासाठी हवे होते असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

तसेच हे संरक्षक कठडे उभारताना संबंधित ठेकेदाराने वरच्यावर उभारल्याने हे कठडे भर पावसात केव्हाही कोसळू शकतात त्यामुळे हे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता वन विभागाचे अधिकारी कानावर हात घेत आहेत तर आंबोलीतील काही ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रारी केल्या आहेत.महामार्ग होत असेल संरक्षक कठडे कशासाठीसंकेश्वर बांदा हा महामार्ग आंबोली घाटातून जात असेल तर नियोजन विभागाचा पैसा खर्च करून हे संरक्षक कठडे कशासाठी उभारण्यात येत आहेत की पैशाची ही उधळपट्टी सुरू आहे एक तर करू ना काळात कोणत्याही विकासकामांना निधी मिळत नसताना असे पैसे खर्च करून शासन कशासाठी खर्च करत आहे असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.