शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वनक्षेत्रपालाला धरले धारेवर

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

शेतकरी आक्रमक : हत्तीच्या हल्ल्याने बाबरवाडीतील ग्रामस्थ हैराण

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींच्या उपद्रवाने हैराण झालेल्या बाबरवाडीतील शेतकऱ्यांच्या संतापाचा मंगळवारी कडेलोट झाला. काँगे्रस पदाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्ती नुकसानीची पाहणी करण्याचे आश्वासन देऊनही दोडामार्गचे वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे उपस्थित राहिले नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक रूप धारण करीत घटनास्थळी उपस्थित असलेल्या वनकर्मचाऱ्यांनाच कोंडीत पकडले. याची माहिती मिळताच बाबरवाडीत दाखल झालेल्या वनक्षेत्रपालांना काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींचा उपद्रव सुरू आहे. बाबरवाडी, विजघर परिसरात या हत्तींच्या नेहमीच्या नुकसानसत्रामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी केवळ केविलवाण्या उपाययोजना करण्यापेक्षा कुडाळ तालुक्याप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातही हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँगे्रसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, प्रेमानंद देसाई आदी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हत्ती नुकसानीची दोडामार्गचे वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे यांना सोबत घेऊनच पाहणी करण्याचे नियोजन केले होते. त्याला शिंदे यांची सहमती होती. ठरल्याप्रमाणे मंगळवारी काँग्रेस पदाधिकारी बाबरवाडीत दाखल झाले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. मात्र, दोडामार्गचे वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी प्रतिनिधी म्हणून कोनाळ येथील वन अधिकाऱ्यांना पाठविले. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले. शिंदे यांची भूमिका शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच जोपर्यंत शिंदे दाखल होत नाहीत, तोपर्यंत उपस्थित वनकर्मचाऱ्यांना घरी जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा धारण केला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आक्रमकता पाहून अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची कल्पना शिंदे यांना दूरध्वनीवरून देताच ते तातडीने बाबरवाडीत दाखल झाले. हत्तींचे संकट कायमचे दूर करण्यासाठी हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी हेवाळे ग्रामपंचायत सदस्य संदीप देसाई, काका देसाई, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमेश दळवी, गुरू देसाई, समीर देसाई आदी शेतकरी व काँगे्रस पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आश्वासन...अखेर बाबूराव शिंदे यांनी याबाबतचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना व आपल्या वरिष्ठांना सादर करण्याचे आश्वासन दिल्यावर शेतकरी शांत झाले. शिवाय मंगळवारपासून १६ वन कर्मचारी हत्ती बंदोबस्तासाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच हत्तीपकड मोहीम राबविण्याबाबत अहवाल तयार करून येत्या चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांशी होणाऱ्या बैठकीवेळी तो सादर केला जाईल, असे आश्वासन दिले.