शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

वनपाल, वनरक्षकांचा संप आश्वासनानंतर स्थगित

By admin | Updated: September 7, 2014 00:37 IST

विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने पुकारलेला संप अखेर शुक्रवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक व वन विभागाचे मुख्य सचिव यांनी विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन त्या पूर्ण करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला. राज्यातील सर्व वनपाल, वनरक्षकांचा सुधारीत वेतनश्रेणीच्या मागणीसाठी २५ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरू होता. २ सप्टेंबर रोजी संघटनेच्या प्रतिनिधींना प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी चर्चेसाठी बोलावून वनरक्षक-वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता वनरक्षक व वनपाल संघटनांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. वेतनश्रेणी सुधारणा करण्याबरोबरच नियमित प्रवास भत्ता, वनरक्षक, वनपाल यांना अतिकर्तव्य भत्ता, कालवार पदोन्नती, वनरक्षक वनपालांच्या पदनामात वाढ करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी मागण्यांबाबत वन विभागाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक सक्सेना यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेकरिता बोलावून मागण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला. वन विभागाच्या वनपाल व वनरक्षकांचा संप तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली. संघटनेने आचारसंहितेच्या शक्यतेमुळे संप तात्पुरता मागे घेतला आहे. मात्र, मागण्या तीन महिन्यात पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी प्रमोद राणे, द. बा. देसाई, दत्तगुरू पिळणकर, श्रीकृष्ण परीट, सूर्यकांत सावंत, सहदेव सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)