शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीमुळे खाद्यपदार्थ महाग

By admin | Updated: February 11, 2015 22:46 IST

सैन्यभरती; उमेदवारांच्या निवासव्यवस्थेची मागणी

रत्नागिरी : सैन्य भरतीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांची गर्दी अधिक असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. केळी ५० रूपये डझन, तर वडापाव १२ ते १५ रूपये दराने विकण्यात येत होता.सैन्य भरतीसाठी परजिल्ह्यातून बहुसंख्येने विद्यार्थी येत आहेत. मध्यरात्रीपासून भरती प्रक्रियेसाठी विविध प्रात्यक्षिकांना प्रारंभ होत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील मंडळी एक दिवस आधीच शहरात दाखल होत आहेत. येताना एकदिवसाचा जेवणाचा डबा घेऊन मंडळी आली असली तरी खाद्य पदार्थाचा आस्वाद घ्यावा लागतो.सैन्यभरती वेळी नाश्त्याची सुविधा असली तरी बाहेर पडल्यानंतर वडापाव, सामोसा, केळी, कलिंगडाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. हॉटेल्समध्येसुध्दा जेवणाकरिता गर्दी होत आहे. मात्र, सामान्य परिस्थिती असलेली मंडळी येताना घरचा डबा घेऊन येत आहेत. त्यामुळे जेमतेम पैशात मिळेल त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. कलिंगडाचे थंडगार काप असलेली डीश १० रूपये दराने विकण्यात येत आहे. ३० ते ४० रूपये डझन असणारी केळी ५० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. १० रूपयांना मिळणारा वडापाव १२ ते १५ रूपये दराने विकण्यात येत आहे. समोसासुध्दा १२ ते १५ रूपयांना विकण्यात येत आहे. सायंकाळच्या वेळेत बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थ संपत असल्याने विद्यार्थ्यांना फळांचा आस्वाद घ्यावा लागत आहे.१० ते १५ रूपये दराने विकण्यात येणारा मोसंबीचा रस १५ ते २० रूपये दराने विकण्यात येत होता. रत्नागिरी शहरातील बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने ९ वाजेपर्यंत बंद होत असल्याने उमेदवार आधीच खरेदी करून ठेवत आहेत. खाद्यपदार्थ खाऊन रॅपर्स, पिशव्या, कागद तसेच केळ्यांच्या साली रस्त्यावरच टाकून देण्यात येत असल्यामुळे मारूती मंदिर परिसरात सध्या गर्दीबरोबर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पालिकेने पिण्याच्या पाण्याचा टँकर स्टेडियमवर तैनात केला असला तरी मारूती मंदिर परिसरातील नळावर, बागेतील नळावर पाण्याच्या बाटल्या भरून घेण्यासाठी गर्दी होत आहे. याशिवाय पाण्याच्या बाटल्यांनाही मागणी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)सैन्यभरती; उमेदवारांच्या निवासव्यवस्थेची मागणीरत्नागिरी : रत्नागिरीत सुरु असलेल्या सैन्यभरतीसाठी विविध जिल्ह्यातील हजारो तरुण येत आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था तत्काळ करावी, अशा आशयाचे निवेदन येथील समविचारी मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.पहाटे तीन वाजल्यापासून भरती सुरु होत असल्याने, या तरुणांना भरतीच्या आदल्या दिवशीच यावे लागते. कोणतीही निवास व्यवस्था नसल्याने त्यांना थंडीच्या दिवसात उघड्यावर थांबावे लागत आहे. सार्वजनिक शौचालयाचा अभाव असल्याने शहर आणि परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर या उमेदवारांची आबाळही होत आहे.रत्नागिरी शहरातील महाविद्यालयानजीकच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि पालिकेच्या शाळा यामध्ये स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. त्यामध्ये या तरुणांची व्यवस्था होऊ शकते. प्रशासनाने शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने या तरुणांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावावा व या भावी सैनिकांची परवड थांबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन समविचारी मंचाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अशोक वाडेकर, छोटू खामकर, संजय नागवेकर, दिलीप नागवेकर, राजू चव्हाण यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)