शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लिलावात घेतलेल्या जागेचा पाच वर्षांनंतरही ताबा नाही

By admin | Updated: August 31, 2015 00:25 IST

राजापूर अर्बन बँक : सर्वसाधारण सभेत सभासदाचा आरोप

राजापूर : कर्जप्रकरणी तारण असलेली जागा लिलावात घेऊन पाच वर्षे उलटली तरी अद्याप आपल्याला बँकेने त्या जागेचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव बँकेच्या कार्यालयापुढे आपल्याला आत्मदहन करावे लागेल, असा इशारा राजापूर अर्बन बँकेचे सभासद प्रकाश कातकर यांनी वार्षिक सभेत दिला.राजापूर अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात झाली. बँकेचे अध्यक्ष जयवंत अभ्यंकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे व अधिकारी उपस्थित होते. या सभेला सभासदांची उपस्थिती अल्प राहिली. सकाळी ९.३० वाजता सभेला सुरुवात झाली. त्यानंतर विषयपत्रिकेप्रमाणे एकेक विषय घेण्यात आले. नेहमीप्रमाणे बँकेच्या थकबाकीवर मुद्दा उपस्थित करण्यात आला. एकूण थकबाकी किती आहे व ती वसूल का झाली नाही, यावर उपस्थित सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले.मागील पाच वर्षांतील थकबाकी ४० लाख ५४ हजारच्या घरात असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले व त्याच्या वसुलीचे कामही सुरु असल्याची माहिती देण्यात आली.बँकेकडून सभासद कल्याण निधीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. राजापूर जवाहर चौकातील शिवस्मारकाचे नूतनीकरण सुरु केले जाणार असून, त्यासाठी बँकेच्या प्रत्येक सभासदाने यावर्षी मिळणाऱ्या ११ टक्के लाभांशातील २ टक्के रक्कम शिवस्मारकासाठी द्यावी, अशी एकमुखी संमती दिली.बाहेरील कर्जमर्यादा वाढवणे, राज्याबाहेर बँकेचे कार्यक्षेत्र वाढवणे, या विषयांवर चर्चा करून तोडगा काढू, अशी ग्वाही संचालक मंडळासहीत बँक व्यवस्थापनाने दिली. सर्व सहकारी बँका व पतपेढ्या यांनी २० टक्के कृषी कर्ज द्यावे, अशी सूचना शासनाने केली आहे. राजापूर अर्बन बँकेनेही याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. सौंदळ पट्ट्यातील १० गावांना बँकिंग सुविधांचा लाभ मिळत नसल्याने राजापूर अर्बन बँकेची एखादी शाखा सौंदळ गावात सुरु करावी, अशी सूचना सभासदांनी केली.काही दिवसांपूर्वी मनी ट्रान्सफरप्रकरण गाजत होते. या प्रकरणी अपेक्षेप्रमाणेच अनेक सभासदांनी प्रश्न उपस्थित करून याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तथापि त्या प्रकरणी आपण कायदेशीर कारवाईसंदर्भात वकिलाचा सल्ला घेत असून, त्यानंतर दिवाणीसह फौजदारीचा मार्ग अवलंबत असल्याचे सांगून त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. राजापूर अर्बन बँकेचे सभासद प्रकाश कातकर यांनी यापूर्वी कर्ज प्रकरणातील तारण जागा लिलावात घेऊन बराच कालावधी लोटला तरी त्याचा ताबा बँक व्यवस्थापनाने दिलेला नसल्याचा मुद्दा पुढे आला. पूर्वी तशी मागणीही केली होती, पण काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता आपण या बँकेपुढे आत्मदहन करू, असा इशारा कातकर यांनी दिला. मात्र, तुम्ही बँकेत या, याबाबत चर्चा करु, अशी ग्वाही जयंत अभ्यंकर यांनी दिली, तेव्हा कातकर शांत झाले. (प्रतिनिधी)