शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाचे सावट

By admin | Updated: November 26, 2015 23:56 IST

निर्यातही मंदावली : दर्याराजा हवालदील, शेकडो नौका किनाऱ्यावर उभ्या, वातावरणातील बदलाचे परिणाम

मालवण : वातावरणातील बदल आणि परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणाऱ्या मासळीची लुट या प्रमुख कारणांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मासळीचा दरही वाढले असून सिंधुदुर्गातून निर्यात होणाऱ्या मासळीतही गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्याहून अधिक घट झाली आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारीअभावी किनारपट्टीवर असून कोट्यवधीची होणारी उलाढाल मंदावली आहे. छोट्या पारंपरिक मच्छीमार आणि गिलनेट व ट्रॉलर्स पद्धतीची मासळी जाळीत मिळत नसल्याने दयार्राजा हवालदिल झाला आहे. किनारपट्टीवरील मत्स्योत्पादनात कमालीची घट झाल्याने मच्छिमार बांधवात चिंतेचे वातावरण आहे.मालवण किनारपट्टीवरील सजेर्कोट, दांडी किनारी नौका उभ्या स्थितीत दिसून येत आहेत. मत्स्य हंगामाची पापलेट, मोरी आदी "बंपरकॅच" मासळी मोठ्या प्रमाणात सापडल्याने आश्वासक सुरुवात झाल्याचे चित्र होते. मात्र, समुद्रातील खराब हवामानाचा फटका बसल्याने मासेमारी ठप्प झाली. तर नव्या मासेमारी हंगामापासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड व अनधिकृत पर्ससीन यांच्या द्वारे केला जाणाऱ्या मासळीच्या लयलुटीमुळे स्थानिक मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. समुद्रात सुरमय, पापलेट, संरगा यासारख्या बड्या मासळीत मोठी घट झाली आहे. समुद्र्रात मासेमारीस गेलेल्या अनेक नौकांना मिळालेल्या मासळीतून रॉकेल, डिझेल आदी इंधनाचा खर्चही सुटत नसल्याचे किनारपट्टी भागात चित्र आहे. याला हवामानाबरोबरच परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणारी माशांची लयलूटही कारणीभूत असल्याचे मत्स्य उद्योजक हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारी अभावी उभ्या आहेत. त्यामुळे अजूनही काही दिवस मत्स्य दुष्काळाचे सावट राहणार आहे. (प्रतिनिधी)हवामानात बदल : पाण्याला करंटसमुद्री हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. सुरुवातीच्या काळातील वादळसदृश स्थिती आणि आता दक्षिण-उत्तर दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु आहे. आता मच्छिमार भाषेत पाण्याला करंट असे म्हणतात. यात मासळी बाहेर ओढली जाते. बाहेर गेलेली मासळी स्थानिक मच्छिमारांना न मिळता सहजच परप्रांतीय ट्रॉलर्सच्या जाळीत सापडते. पापलेट, सुरमय अशा बड्या व किमती मासळीसाठी स्वतंत्र मासेमारी जाळी असते. गिलनेट पद्धतीने मासेमारी करणाऱ्या सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या जाळीत मासळीच गेल्या तीन महिन्यापासून मिळत नाही. २० ते २५ टक्केही मासेमारी या हंगामात झाली नाही.