शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाचे सावट

By admin | Updated: November 26, 2015 23:56 IST

निर्यातही मंदावली : दर्याराजा हवालदील, शेकडो नौका किनाऱ्यावर उभ्या, वातावरणातील बदलाचे परिणाम

मालवण : वातावरणातील बदल आणि परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणाऱ्या मासळीची लुट या प्रमुख कारणांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मासळीचा दरही वाढले असून सिंधुदुर्गातून निर्यात होणाऱ्या मासळीतही गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्याहून अधिक घट झाली आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारीअभावी किनारपट्टीवर असून कोट्यवधीची होणारी उलाढाल मंदावली आहे. छोट्या पारंपरिक मच्छीमार आणि गिलनेट व ट्रॉलर्स पद्धतीची मासळी जाळीत मिळत नसल्याने दयार्राजा हवालदिल झाला आहे. किनारपट्टीवरील मत्स्योत्पादनात कमालीची घट झाल्याने मच्छिमार बांधवात चिंतेचे वातावरण आहे.मालवण किनारपट्टीवरील सजेर्कोट, दांडी किनारी नौका उभ्या स्थितीत दिसून येत आहेत. मत्स्य हंगामाची पापलेट, मोरी आदी "बंपरकॅच" मासळी मोठ्या प्रमाणात सापडल्याने आश्वासक सुरुवात झाल्याचे चित्र होते. मात्र, समुद्रातील खराब हवामानाचा फटका बसल्याने मासेमारी ठप्प झाली. तर नव्या मासेमारी हंगामापासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड व अनधिकृत पर्ससीन यांच्या द्वारे केला जाणाऱ्या मासळीच्या लयलुटीमुळे स्थानिक मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. समुद्रात सुरमय, पापलेट, संरगा यासारख्या बड्या मासळीत मोठी घट झाली आहे. समुद्र्रात मासेमारीस गेलेल्या अनेक नौकांना मिळालेल्या मासळीतून रॉकेल, डिझेल आदी इंधनाचा खर्चही सुटत नसल्याचे किनारपट्टी भागात चित्र आहे. याला हवामानाबरोबरच परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणारी माशांची लयलूटही कारणीभूत असल्याचे मत्स्य उद्योजक हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारी अभावी उभ्या आहेत. त्यामुळे अजूनही काही दिवस मत्स्य दुष्काळाचे सावट राहणार आहे. (प्रतिनिधी)हवामानात बदल : पाण्याला करंटसमुद्री हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. सुरुवातीच्या काळातील वादळसदृश स्थिती आणि आता दक्षिण-उत्तर दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु आहे. आता मच्छिमार भाषेत पाण्याला करंट असे म्हणतात. यात मासळी बाहेर ओढली जाते. बाहेर गेलेली मासळी स्थानिक मच्छिमारांना न मिळता सहजच परप्रांतीय ट्रॉलर्सच्या जाळीत सापडते. पापलेट, सुरमय अशा बड्या व किमती मासळीसाठी स्वतंत्र मासेमारी जाळी असते. गिलनेट पद्धतीने मासेमारी करणाऱ्या सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या जाळीत मासळीच गेल्या तीन महिन्यापासून मिळत नाही. २० ते २५ टक्केही मासेमारी या हंगामात झाली नाही.