शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाचे सावट

By admin | Updated: November 26, 2015 23:56 IST

निर्यातही मंदावली : दर्याराजा हवालदील, शेकडो नौका किनाऱ्यावर उभ्या, वातावरणातील बदलाचे परिणाम

मालवण : वातावरणातील बदल आणि परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणाऱ्या मासळीची लुट या प्रमुख कारणांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मासळीचा दरही वाढले असून सिंधुदुर्गातून निर्यात होणाऱ्या मासळीतही गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्याहून अधिक घट झाली आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारीअभावी किनारपट्टीवर असून कोट्यवधीची होणारी उलाढाल मंदावली आहे. छोट्या पारंपरिक मच्छीमार आणि गिलनेट व ट्रॉलर्स पद्धतीची मासळी जाळीत मिळत नसल्याने दयार्राजा हवालदिल झाला आहे. किनारपट्टीवरील मत्स्योत्पादनात कमालीची घट झाल्याने मच्छिमार बांधवात चिंतेचे वातावरण आहे.मालवण किनारपट्टीवरील सजेर्कोट, दांडी किनारी नौका उभ्या स्थितीत दिसून येत आहेत. मत्स्य हंगामाची पापलेट, मोरी आदी "बंपरकॅच" मासळी मोठ्या प्रमाणात सापडल्याने आश्वासक सुरुवात झाल्याचे चित्र होते. मात्र, समुद्रातील खराब हवामानाचा फटका बसल्याने मासेमारी ठप्प झाली. तर नव्या मासेमारी हंगामापासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड व अनधिकृत पर्ससीन यांच्या द्वारे केला जाणाऱ्या मासळीच्या लयलुटीमुळे स्थानिक मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. समुद्रात सुरमय, पापलेट, संरगा यासारख्या बड्या मासळीत मोठी घट झाली आहे. समुद्र्रात मासेमारीस गेलेल्या अनेक नौकांना मिळालेल्या मासळीतून रॉकेल, डिझेल आदी इंधनाचा खर्चही सुटत नसल्याचे किनारपट्टी भागात चित्र आहे. याला हवामानाबरोबरच परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणारी माशांची लयलूटही कारणीभूत असल्याचे मत्स्य उद्योजक हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे. किनारपट्टीवर शेकडो नौका मासेमारी अभावी उभ्या आहेत. त्यामुळे अजूनही काही दिवस मत्स्य दुष्काळाचे सावट राहणार आहे. (प्रतिनिधी)हवामानात बदल : पाण्याला करंटसमुद्री हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. सुरुवातीच्या काळातील वादळसदृश स्थिती आणि आता दक्षिण-उत्तर दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु आहे. आता मच्छिमार भाषेत पाण्याला करंट असे म्हणतात. यात मासळी बाहेर ओढली जाते. बाहेर गेलेली मासळी स्थानिक मच्छिमारांना न मिळता सहजच परप्रांतीय ट्रॉलर्सच्या जाळीत सापडते. पापलेट, सुरमय अशा बड्या व किमती मासळीसाठी स्वतंत्र मासेमारी जाळी असते. गिलनेट पद्धतीने मासेमारी करणाऱ्या सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या जाळीत मासळीच गेल्या तीन महिन्यापासून मिळत नाही. २० ते २५ टक्केही मासेमारी या हंगामात झाली नाही.