शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘त्या’ मासेमारीने मच्छिमार उध्वस्त होईल !

By admin | Updated: July 9, 2016 00:57 IST

मच्छिमारांनी व्यक्त केली भीती : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ‘माफियाराज’

मालवण : सिंधुदुर्गसह महराष्ट्राच्या किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीडच्या धुमाकुळाबरोबरच आता स्थानिक मच्छिमारांना ‘प्रकाशझोता’तील मासेमारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षातील मासळीच्या लुटीनंतर शिल्लक असलेला मत्स्यसाठा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या संघर्षाला नवी समस्या तोंड वर काढत असून प्रखर विद्युत झोतातील मासेमारी सुरु राहिल्यास येथील मच्छिमार देशोधडीला लागून उध्वस्त होईल, अशी भीती मच्छिमार नेते गोपीनाथ तांडेल यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, शासनाने मच्छिमारांना न्याय हक्काकडे नेहमीच दुर्लक्ष केला आहे. शासनकर्त्यांची अनास्थेची भूमिका मच्छिमारांसाठी मारक आहे. शासकीय यंत्रणाही कुचकामी असून त्यांचे मच्छिमार क्षेत्रावर अंकुश नाही. अन्यायाविरोधात संघर्ष करत असताना जिल्हा प्रशासन मच्छिमारांच्या पाठिशी राहत नाही, हे उघड सत्य आहे, असा आरोप कृष्णनाथ तांडेल यांनी केला.मालवण येहील हॉटेल सागर किनारा येथे गिलनेट व ट्रॉलर्सधारक मच्छिमारांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हायस्पीड मासेमारीबरोबरच प्रखर प्रकाशझोताच्या मासेमारीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी महेश देसाई, सुधीर जोशी, पिटर मेंडीस, नारायण आडकर, संतोष शेलटकर, विकी चोपडेकर, संतोष देसाई, नितीन आंबेरकर, संदीप शेलटकर, प्रसाद पाटील, नागेश परब, वासुदेव आजगावकर, प्रमोद खवणेकर आदी मच्छिमार उपस्थित होते.किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना हरप्रकारचे नियम, निर्बंध असतात. मात्र, हेच नियम लागू न करता परप्रांतिय अनधिकृत व विनापरवाना बोटींना मोकळे रान करून दिले जात आहे. शासन व्यवस्था कमी पडत असून परप्रांतिय मच्छिमारांचे ‘माफियाराज’ सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरु आहे. या प्रकाराला शासनाची गस्त अडवत नसून अर्थकारण होते. आम्ही त्यांना अडवल्यास कायद्याचा बडगा दाखविला जातो, अशी भूमिका तांडेल यांनी मांडली. (प्रतिनिधी)मालवणात १0७ ट्रॉलर्समत्स्य दुष्काळ व परप्रांतीय बोटींचे आक्रमण यात किनारपट्टी पोखरली गेली आहे. मच्छिमारांना वारंवार मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे मत्स्यखाते दुर्लक्षित आहे. परवाना अधिकारी अथवा कर्मचारी नसल्याची स्थिती आहे. मालवण बंदरात ३५० ट्रॉलर्सपैकी अवघे १०७ ट्रॉलर्स शिल्लक राहिले आहेत. यापुढे येथील मच्छिमारही देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.पालकमंत्र्यांवर निशाणामच्छिमारांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बोले तैसा चाले ही प्रवृत्ती पालकमंत्र्यांमध्ये नाही. परप्रांतिय नौकांचा बंदोबस्त करण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. अन्य समस्याही जैसे थे आहेत. ज्या मच्छिमारांनी धाडस करून परप्रांतिय बोटी पकडल्या. त्यामुळे शासन तिजोरीत लाखोचा दंड जमा झाला आहे. मात्र शासनाने या मच्छिमारांचे कौतुकही केले नाही याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.जलधी क्षेत्र वाढवावेराज्याच्या सागरी क्षेत्राचा विचार १२ नॉटीकल मैल हे क्षेत्र स्थानिक मच्छिमारांसाठी राखीव आहे. मात्र जुन्या कायद्यानुसार हे क्षेत्र निश्चित आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. १९८० नंतर मासेमारीत यांत्रिक बदल झाले. बोटींना १०० अश्वशक्ती प्राप्त झाली. त्यामुळे १२ नॉटीकल मैल क्षेत्र २५ नॉटीकल मैलपर्यंत वाढवावे. त्यामुळे परप्रांतियांचे आक्रमण कमी होईल. याबाबत शासनाने धोरण निश्चित करावे, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली.