शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मासेमारीने मच्छिमार उध्वस्त होईल !

By admin | Updated: July 9, 2016 00:57 IST

मच्छिमारांनी व्यक्त केली भीती : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ‘माफियाराज’

मालवण : सिंधुदुर्गसह महराष्ट्राच्या किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीडच्या धुमाकुळाबरोबरच आता स्थानिक मच्छिमारांना ‘प्रकाशझोता’तील मासेमारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षातील मासळीच्या लुटीनंतर शिल्लक असलेला मत्स्यसाठा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या संघर्षाला नवी समस्या तोंड वर काढत असून प्रखर विद्युत झोतातील मासेमारी सुरु राहिल्यास येथील मच्छिमार देशोधडीला लागून उध्वस्त होईल, अशी भीती मच्छिमार नेते गोपीनाथ तांडेल यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, शासनाने मच्छिमारांना न्याय हक्काकडे नेहमीच दुर्लक्ष केला आहे. शासनकर्त्यांची अनास्थेची भूमिका मच्छिमारांसाठी मारक आहे. शासकीय यंत्रणाही कुचकामी असून त्यांचे मच्छिमार क्षेत्रावर अंकुश नाही. अन्यायाविरोधात संघर्ष करत असताना जिल्हा प्रशासन मच्छिमारांच्या पाठिशी राहत नाही, हे उघड सत्य आहे, असा आरोप कृष्णनाथ तांडेल यांनी केला.मालवण येहील हॉटेल सागर किनारा येथे गिलनेट व ट्रॉलर्सधारक मच्छिमारांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हायस्पीड मासेमारीबरोबरच प्रखर प्रकाशझोताच्या मासेमारीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी महेश देसाई, सुधीर जोशी, पिटर मेंडीस, नारायण आडकर, संतोष शेलटकर, विकी चोपडेकर, संतोष देसाई, नितीन आंबेरकर, संदीप शेलटकर, प्रसाद पाटील, नागेश परब, वासुदेव आजगावकर, प्रमोद खवणेकर आदी मच्छिमार उपस्थित होते.किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना हरप्रकारचे नियम, निर्बंध असतात. मात्र, हेच नियम लागू न करता परप्रांतिय अनधिकृत व विनापरवाना बोटींना मोकळे रान करून दिले जात आहे. शासन व्यवस्था कमी पडत असून परप्रांतिय मच्छिमारांचे ‘माफियाराज’ सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरु आहे. या प्रकाराला शासनाची गस्त अडवत नसून अर्थकारण होते. आम्ही त्यांना अडवल्यास कायद्याचा बडगा दाखविला जातो, अशी भूमिका तांडेल यांनी मांडली. (प्रतिनिधी)मालवणात १0७ ट्रॉलर्समत्स्य दुष्काळ व परप्रांतीय बोटींचे आक्रमण यात किनारपट्टी पोखरली गेली आहे. मच्छिमारांना वारंवार मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे मत्स्यखाते दुर्लक्षित आहे. परवाना अधिकारी अथवा कर्मचारी नसल्याची स्थिती आहे. मालवण बंदरात ३५० ट्रॉलर्सपैकी अवघे १०७ ट्रॉलर्स शिल्लक राहिले आहेत. यापुढे येथील मच्छिमारही देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.पालकमंत्र्यांवर निशाणामच्छिमारांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बोले तैसा चाले ही प्रवृत्ती पालकमंत्र्यांमध्ये नाही. परप्रांतिय नौकांचा बंदोबस्त करण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. अन्य समस्याही जैसे थे आहेत. ज्या मच्छिमारांनी धाडस करून परप्रांतिय बोटी पकडल्या. त्यामुळे शासन तिजोरीत लाखोचा दंड जमा झाला आहे. मात्र शासनाने या मच्छिमारांचे कौतुकही केले नाही याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.जलधी क्षेत्र वाढवावेराज्याच्या सागरी क्षेत्राचा विचार १२ नॉटीकल मैल हे क्षेत्र स्थानिक मच्छिमारांसाठी राखीव आहे. मात्र जुन्या कायद्यानुसार हे क्षेत्र निश्चित आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. १९८० नंतर मासेमारीत यांत्रिक बदल झाले. बोटींना १०० अश्वशक्ती प्राप्त झाली. त्यामुळे १२ नॉटीकल मैल क्षेत्र २५ नॉटीकल मैलपर्यंत वाढवावे. त्यामुळे परप्रांतियांचे आक्रमण कमी होईल. याबाबत शासनाने धोरण निश्चित करावे, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली.