शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीनुसार बदल केल्यास मासेमारीला यश

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

संजय भावे : वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्वर येथे मच्छिमारांना प्रशिक्षण

कुडाळ : देशातील किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमारांचे चरितार्थाचे मुख्य साधन मासेमारी असून, बदलत्या परिस्थितीनुसार यात आवश्यक असणारे बदल करून ती पथ्ये काटेकोरपणे पाळल्यास शाश्वत मासेमारी ही संकल्पना फक्त कागदावर न राहता ती प्रत्यक्षात सहजपणे उतरू शकेल. तसेच ज्या सागराने मच्छिमारांच्या अगणित पिढ्यांना जीवन दिले आहे, त्या समुद्र परिसंस्थेला वाचवण्याकरिता मच्छिमार समाजाने एकत्र येऊन एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी ‘शाश्वत मासेमारीकरिता मच्छिमारांचा क्षमता विकास’ या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची मत्स्यविद्याशाखा, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएमडीपी), जीईएफ व भारत सरकारचा वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत मच्छिमारांचा क्षमता विकास’ या विषयावरील एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील मच्छिमारांकरिता सागरेश्वर येथील एका रिसोर्टवर आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला मत्स्य महाविद्यालय रत्नागिरीच्या कृषी अर्थशास्त्रज्ञ व सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश शिरधनकर, गोड्यापाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे मत्स्यवैज्ञानिक डॉ. नितीन सावंत, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या प्रतिनिधी दुर्गा ठिगळे, विषयतज्ज्ञ डॉ. केतनकुमार चौधरी, डॉ. रवींद्र पवार, संदेश पाटील व मोठ्या संख्येने पुरुष व महिला मच्छिमार प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थिंना विषयतज्ज्ञांनी सागरी मासेमारी, नियमन कायदे, शाश्वत मासेमारीची संकल्पना व त्याची उद्दिष्टे, जबाबदार मासेमारी, परिसंस्थीय मासेमारी व्यवस्थापन, मत्स्य व्यवसायातील पूरक उद्योग आदी महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींबरोबर चर्चा केली आणि त्यांच्या व्यवसायाच्या सद्यस्थितीबाबतही माहिती संकलित केली. मच्छिमारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी विषयतज्ज्ञांनी केले. कार्यक्रमाला सुमारे ७५ मच्छिमार प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मंगेश शिरधनकर, आभार डॉ. केतनकुमार चौधरी यांनी मानले. (प्रतिनिधी)समुद्र परिसंस्थेला वाचवण्याकरिता मच्छिमारांनी एकत्र येण्याची गरज : भावे.अनेक मच्छिमारांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ.मच्छिमारांच्या शंकांचे केले निरसन.‘शाश्वत मासेमारीकरिता मच्छिमारांचा क्षमता विकास’ या विषयावरील प्रशिक्षण.