शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

भिरवंडे येथे घराला आग

By admin | Updated: February 27, 2017 21:21 IST

तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 27 - तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
भिरवंडे वरची परतकामवाडी येथे रवींद्र तुकाराम सावंत यांचे घर आहे. ते तालुक्यातील सावडाव हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे कणकवली येथे ते रहातात. त्यांच्या भिरवंडे येथील घरात रायमन जॉन लोबो हे पत्नी एल्विन , मुलगा न्याल्विन यांच्यासह भाड्याने रहातात. सोमवारी रायमन लोबो कुटुंबियांसह कुंभवडे येथे पाहुण्यांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते.
सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराजवळील रस्त्यावरुन एक दुचाकीस्वार जात होता. त्याला घरातून धुर येताना दिसला. त्याने याबाबत सावंत यांच्या शेजाऱ्याना कल्पना दिली. भिरवंडे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र सावंत , अमित सावंत, आद्राव डिसोझा, एरोन डिसोझा, सुधाकार सावंत, दत्ताराम खांबल आदी ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घराला आग लागल्याचे समजताच ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घराशेजारील विहिरितील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, सोमवारी विज प्रवाह बंद असल्याने विजेवरील पाण्याचे पंप सूरु करता आले नाहीत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास वेळ लागल्याने अधिक हानी झाली. या आगीबाबत रविंद्र सावंत तसेच रायमन लोबो यांना कल्पना देण्यात आली. त्यांना घटनेबाबत माहिती समजताच धक्काच बसला.ते घराजवळ तत्काळ दाखल झाले. 
या आगीत रविंद्र सावंत  यांच्या चिरेबंदी घराचे लाकडी छप्पर,  दरवाजे, खिडक्या , फर्निचर आदी लाकडी सामान तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे 2 लाख 77 हजार 150 रुपयांचे नुकसान झाले आहे.  तर घरातील भाडोत्री रायमन लोबो यांच्या सोन्याच्या चार बांगड्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा हार, दोन अंगठ्या असे दागिने, कपडे, धान्य , भांडी , शैक्षणिक साहित्य व रोख 20 हजार रूपये आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. त्यामुळे लोबो यांचे 1लाख 88 हजार 555 रुपयांचे नुकसान झाले आहे. 
या घटनेबाबत माहिती समजताच उपसरपंच मिलिंद सावंत, मंडळ अधिकारी शरद कुलकर्णी, तलाठी अर्जुन पंडित, ग्रामसेवक राकेश गोवळकर, कोतवाल अरविंद सावंत, पोलिस पाटील बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी करून पंचयादी घातली.