शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भिरवंडे येथे घराला आग

By admin | Updated: February 27, 2017 21:21 IST

तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 27 - तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
भिरवंडे वरची परतकामवाडी येथे रवींद्र तुकाराम सावंत यांचे घर आहे. ते तालुक्यातील सावडाव हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे कणकवली येथे ते रहातात. त्यांच्या भिरवंडे येथील घरात रायमन जॉन लोबो हे पत्नी एल्विन , मुलगा न्याल्विन यांच्यासह भाड्याने रहातात. सोमवारी रायमन लोबो कुटुंबियांसह कुंभवडे येथे पाहुण्यांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते.
सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराजवळील रस्त्यावरुन एक दुचाकीस्वार जात होता. त्याला घरातून धुर येताना दिसला. त्याने याबाबत सावंत यांच्या शेजाऱ्याना कल्पना दिली. भिरवंडे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र सावंत , अमित सावंत, आद्राव डिसोझा, एरोन डिसोझा, सुधाकार सावंत, दत्ताराम खांबल आदी ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घराला आग लागल्याचे समजताच ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घराशेजारील विहिरितील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, सोमवारी विज प्रवाह बंद असल्याने विजेवरील पाण्याचे पंप सूरु करता आले नाहीत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास वेळ लागल्याने अधिक हानी झाली. या आगीबाबत रविंद्र सावंत तसेच रायमन लोबो यांना कल्पना देण्यात आली. त्यांना घटनेबाबत माहिती समजताच धक्काच बसला.ते घराजवळ तत्काळ दाखल झाले. 
या आगीत रविंद्र सावंत  यांच्या चिरेबंदी घराचे लाकडी छप्पर,  दरवाजे, खिडक्या , फर्निचर आदी लाकडी सामान तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे 2 लाख 77 हजार 150 रुपयांचे नुकसान झाले आहे.  तर घरातील भाडोत्री रायमन लोबो यांच्या सोन्याच्या चार बांगड्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा हार, दोन अंगठ्या असे दागिने, कपडे, धान्य , भांडी , शैक्षणिक साहित्य व रोख 20 हजार रूपये आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. त्यामुळे लोबो यांचे 1लाख 88 हजार 555 रुपयांचे नुकसान झाले आहे. 
या घटनेबाबत माहिती समजताच उपसरपंच मिलिंद सावंत, मंडळ अधिकारी शरद कुलकर्णी, तलाठी अर्जुन पंडित, ग्रामसेवक राकेश गोवळकर, कोतवाल अरविंद सावंत, पोलिस पाटील बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी करून पंचयादी घातली.