शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

भिरवंडे येथे घराला आग

By admin | Updated: February 27, 2017 21:21 IST

तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 27 - तालुक्यातील भिरवंडे येथील वरची परतकामवाडीतील घराला आग लागून 4 लाख 65 हजार 705 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
भिरवंडे वरची परतकामवाडी येथे रवींद्र तुकाराम सावंत यांचे घर आहे. ते तालुक्यातील सावडाव हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे कणकवली येथे ते रहातात. त्यांच्या भिरवंडे येथील घरात रायमन जॉन लोबो हे पत्नी एल्विन , मुलगा न्याल्विन यांच्यासह भाड्याने रहातात. सोमवारी रायमन लोबो कुटुंबियांसह कुंभवडे येथे पाहुण्यांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते.
सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराजवळील रस्त्यावरुन एक दुचाकीस्वार जात होता. त्याला घरातून धुर येताना दिसला. त्याने याबाबत सावंत यांच्या शेजाऱ्याना कल्पना दिली. भिरवंडे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र सावंत , अमित सावंत, आद्राव डिसोझा, एरोन डिसोझा, सुधाकार सावंत, दत्ताराम खांबल आदी ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घराला आग लागल्याचे समजताच ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घराशेजारील विहिरितील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, सोमवारी विज प्रवाह बंद असल्याने विजेवरील पाण्याचे पंप सूरु करता आले नाहीत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास वेळ लागल्याने अधिक हानी झाली. या आगीबाबत रविंद्र सावंत तसेच रायमन लोबो यांना कल्पना देण्यात आली. त्यांना घटनेबाबत माहिती समजताच धक्काच बसला.ते घराजवळ तत्काळ दाखल झाले. 
या आगीत रविंद्र सावंत  यांच्या चिरेबंदी घराचे लाकडी छप्पर,  दरवाजे, खिडक्या , फर्निचर आदी लाकडी सामान तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे 2 लाख 77 हजार 150 रुपयांचे नुकसान झाले आहे.  तर घरातील भाडोत्री रायमन लोबो यांच्या सोन्याच्या चार बांगड्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा हार, दोन अंगठ्या असे दागिने, कपडे, धान्य , भांडी , शैक्षणिक साहित्य व रोख 20 हजार रूपये आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. त्यामुळे लोबो यांचे 1लाख 88 हजार 555 रुपयांचे नुकसान झाले आहे. 
या घटनेबाबत माहिती समजताच उपसरपंच मिलिंद सावंत, मंडळ अधिकारी शरद कुलकर्णी, तलाठी अर्जुन पंडित, ग्रामसेवक राकेश गोवळकर, कोतवाल अरविंद सावंत, पोलिस पाटील बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी करून पंचयादी घातली.