शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीपर्यंत चिपी विमानतळाचे काम पूर्ण करा

By admin | Updated: April 5, 2017 16:45 IST

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यास ूचना

लोकमत आॅनलाईन सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : पावसाळ्यानंतर दीपावलीपासून पर्यटन हंगाम सुरु होतो. या दृष्टीने दीपावली दरम्यान चिपी विमातळावर पर्यटकांचे विमान लँड होण्याच्या दृष्टीकोनातून अधिकारी वर्गाने प्रयत्नशील रहावे. धावपट्टी, कंट्रोल टॉवर, प्रशासकीय इमारत आदी आवश्यक गरजेच्या इमारतींची बांधकामांची पूर्तता करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी चिपी विमातळाच्या कार्यक्षेत्रास भेट देत कामांच्या प्रगतीची माहिती घेतली. आय. आर. बी. कंपनीचे व्यवस्थापक राजेश लोणकर, प्रकल्प अधिकारी सुहास पाटील, जनसंपर्क अधिकारी योगेश म्हेत्रे यांनी विमानतळ प्रकल्पाची सविस्तर माहिती यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.

या भेटी नंतर परुळे येथील प्रथमेश सामंत यांच्या कॉटेज प्रकल्पास पर्यटनमंत्री रावल यांनी भेट दिली. सामंत यांच्या कॉटेज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशाच प्रकारच्या कॉटेज उभारुन तरुणांनी स्वत:चा पर्यटन उद्योग उभारावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

वेंगुर्ला नगरपालिकेस सदिच्छा भेट

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी वेंगुर्ला नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरसेवकांनी व पदाधिकारी- अधिकारी यांनी वेंगुर्ला शहर पर्यटन दृष्ट्या विकसीत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. प्रारंभी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी हापूस आंब्याचे कलम, शाल श्रीफळ देऊन मंत्री महोदयांचा सत्कार केला. उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, वेंगुर्ला नगरपालिकेचे नगरसेवक- नगरसेविका, नागरिक उपस्थित होते.

वेळागर वासियांच्या समस्यांचे निराकरण करु

वेंगुर्ला नजिकच्या सागरेश्वर सागर किना-याची पाहणी करुन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शिरोडा- वेळागर सागर किना-यास भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी सर्वे क्रमांक ३९ मध्ये ग्रामस्थांना पर्यटन व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणी केली. याचबरोबर इतर अनुषंगिक समस्यांही मंत्री महोदयांनी जाणून घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. टाटामार्फत लवकरच वेळागर प्रकल्पाचे काम सुरु केले जाईल. ग्रामस्थांनी या प्रकल्पास सहकार्य करावे असे आवाहन करुन पर्यटनमंत्री रावल यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची निराकरण केले जाईल असे स्पष्ट करुन ग्रामस्थांनी नाष्टा- भोजन याचबरोबर सागरी सुरक्षा, वॉटर स्पोर्टस प्रकारात सहकार्य करण्याचे आवाहन केले. या भेटीपूर्वी मान्यवरांचे उपस्थितीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तिंबलो ग्रुपच्या आरवली टाक येथील प्रकल्पाची पाहणी करुन हा पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प दीपावलीपूर्वी पूर्ण करण्याची सूचना केली.

या प्रसंगी अशोक तिंबलो, पर्यटन महामंडळाचे सह व्यवस्थापक आशुतोष राठोड, वरीष्ठ व्यवस्थापक जगदीश चव्हाण, प्रकल्प अधिकारी दीपक माने, सल्लागर किरण सुलाखे तसेच आरवली ग्रामस्थ उपस्थित होते.