शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

दीपावलीपर्यंत चिपी विमानतळाचे काम पूर्ण करा

By admin | Updated: April 5, 2017 16:45 IST

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यास ूचना

लोकमत आॅनलाईन सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : पावसाळ्यानंतर दीपावलीपासून पर्यटन हंगाम सुरु होतो. या दृष्टीने दीपावली दरम्यान चिपी विमातळावर पर्यटकांचे विमान लँड होण्याच्या दृष्टीकोनातून अधिकारी वर्गाने प्रयत्नशील रहावे. धावपट्टी, कंट्रोल टॉवर, प्रशासकीय इमारत आदी आवश्यक गरजेच्या इमारतींची बांधकामांची पूर्तता करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी चिपी विमातळाच्या कार्यक्षेत्रास भेट देत कामांच्या प्रगतीची माहिती घेतली. आय. आर. बी. कंपनीचे व्यवस्थापक राजेश लोणकर, प्रकल्प अधिकारी सुहास पाटील, जनसंपर्क अधिकारी योगेश म्हेत्रे यांनी विमानतळ प्रकल्पाची सविस्तर माहिती यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.

या भेटी नंतर परुळे येथील प्रथमेश सामंत यांच्या कॉटेज प्रकल्पास पर्यटनमंत्री रावल यांनी भेट दिली. सामंत यांच्या कॉटेज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशाच प्रकारच्या कॉटेज उभारुन तरुणांनी स्वत:चा पर्यटन उद्योग उभारावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

वेंगुर्ला नगरपालिकेस सदिच्छा भेट

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी वेंगुर्ला नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरसेवकांनी व पदाधिकारी- अधिकारी यांनी वेंगुर्ला शहर पर्यटन दृष्ट्या विकसीत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. प्रारंभी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी हापूस आंब्याचे कलम, शाल श्रीफळ देऊन मंत्री महोदयांचा सत्कार केला. उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, वेंगुर्ला नगरपालिकेचे नगरसेवक- नगरसेविका, नागरिक उपस्थित होते.

वेळागर वासियांच्या समस्यांचे निराकरण करु

वेंगुर्ला नजिकच्या सागरेश्वर सागर किना-याची पाहणी करुन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शिरोडा- वेळागर सागर किना-यास भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी सर्वे क्रमांक ३९ मध्ये ग्रामस्थांना पर्यटन व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणी केली. याचबरोबर इतर अनुषंगिक समस्यांही मंत्री महोदयांनी जाणून घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. टाटामार्फत लवकरच वेळागर प्रकल्पाचे काम सुरु केले जाईल. ग्रामस्थांनी या प्रकल्पास सहकार्य करावे असे आवाहन करुन पर्यटनमंत्री रावल यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची निराकरण केले जाईल असे स्पष्ट करुन ग्रामस्थांनी नाष्टा- भोजन याचबरोबर सागरी सुरक्षा, वॉटर स्पोर्टस प्रकारात सहकार्य करण्याचे आवाहन केले. या भेटीपूर्वी मान्यवरांचे उपस्थितीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तिंबलो ग्रुपच्या आरवली टाक येथील प्रकल्पाची पाहणी करुन हा पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प दीपावलीपूर्वी पूर्ण करण्याची सूचना केली.

या प्रसंगी अशोक तिंबलो, पर्यटन महामंडळाचे सह व्यवस्थापक आशुतोष राठोड, वरीष्ठ व्यवस्थापक जगदीश चव्हाण, प्रकल्प अधिकारी दीपक माने, सल्लागर किरण सुलाखे तसेच आरवली ग्रामस्थ उपस्थित होते.