शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शासकीय डॉक्टर न येण्याची कारणे शोधा

By admin | Updated: August 14, 2014 22:39 IST

आरोग्य समिती सभा : निकिता जाधव यांची मागणी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या जिल्ह्यात परजिल्ह्यातून डॉक्टरही यायला तयार होत नाहीत. ही बाब गंभीर असून डॉक्टर या जिल्ह्यात सेवा बजावण्यासाठी का येत नाहीत? याबाबत चिंतन करायची वेळ आता आली आहे. यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमा अशी आग्रही मागणी सदस्य निकिता जाधव यांनी आरोग्य समिती सभेत केली.जिल्हा परिषद आरोग्य समिती सभा बॅ. नाथ पै सभागृहात सभापती प्रकाश कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्या जान्हवी सावंत, नम्रता हरदास, निकिता जाधव, समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी ए. ए. आठले, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषद आरोग्य विभागाला ५९ लाख ८६ हजार एवढा निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीत वाढ व्हावी यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न केले आहेत. ३६ लाख १० हजार रुपये निधी आणखीन वाढवून मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.यामध्ये प्रत्येक आरोग्यकेंद्रामध्ये मधुमेह तपासणी यंत्रणेसाठी ५ लाख, प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये संगणक सुविधेसाठी १६ लाख, दुर्धर आजारासाठी १५ लाख, वाहन दुरुस्ती ४ लाख यावर हा वाढीव निधी खर्च होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यकेंद्र व उपकेंद्र बांधकामांसाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ३ कोटी ८७ लाख रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी १२ लाख रुपये खर्च झाले असून अद्यापही ३ कोटी ७५ लाख रुपये निधी शिल्लक आहे. हा निधी मार्च २०१५ अखेर खर्च करणे आवश्यक आहे. तर नव्याने या आर्थिक वर्षामध्ये इमारत बांधकामासाठी १ कोटी ९८ लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असून तो लवकरच आरोग्य विभागाला प्राप्त होईल अशी माहिती सभागृहात अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.जिल्हा रुग्णालयात पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नळयोजनेवर ७८ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी येत नसल्यामुळे त्याठिकाणी रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने राहिलेल्या त्रुटी दूर करून रुग्णांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सदस्या जान्हवी सावंत यांनी केली.जिल्ह्यात मानसिक रुग्णांची संख्या वाढत असून त्याचा ताण जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांवर पडत असून त्याच धर्तीवर प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये रुग्ण तपासण्यात यावेत अशी मागणी सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)२७ पासून पथक स्थापन करणार गणेश चतुर्थीला काही दिवस बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर चाकरमानी मुंबई, पुणे येथून येणार असून आरोग्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न सदस्यांनी केला. यावर २७ आॅगस्टपासून सर्व बसस्थानक, रेल्वेस्टेशन व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य विभागामार्फत स्टॉल उभारण्यात येणार असून या कालावधीत कोणत्याही प्रकारची साथ उद्भवू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल अशी माहिती आरोग्य अधिकारी आठले यांनी दिली. आवश्यक तो औषध साठा ठेवा व प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्या, असे आदेश सभापती प्रकाश कवठणकर यांनी दिले.कुष्ठरोगाचे नव्याने २८ रुग्ण आढळलेजुलैअखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने २८ रुग्ण आढळले असून यात एका बालकाचाही समावेश आहे. या सर्वांना औषधोपचाराखाली ठेवण्यात आले आहे. तर क्षयरोगाचे नव्याने २४ रुग्ण आढळले असून सध्या ५३१ रुग्ण उपचार घेत आहेत.