शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

वित्त समिती सभेत सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर

By admin | Updated: September 20, 2014 00:36 IST

सुरेश ढवळ बनले विरोधक : जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वनिधीवरून आक्रमक

सिंधुदुर्गनगरी : मतदारसंघाच्या विकासकामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या स्वनिधीमध्येही पूर्णपणे तफावत आढळत असून जिल्हा परिषदेमधील प्रमुख ‘मानकरी’च स्वत:च्या मतदारसंघात जास्तीत जास्त स्वनिधी पळवतात, असा आरोप खुद्द सत्ताधारी सदस्य सुरेश ढवळ यांनी करीत सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे ढवळ यांनी विरोधकांची भूमिका निभावल्याचे सभागृहात दिसून आले.जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती भगवान फाटक यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवळ, सुभाष चव्हाण, समिती सचिव मारूती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते. शासनाने ‘विकास निधी’ या हेडखाली निधी खर्च करण्यास नकार दिल्याने तो स्वनिधी या हेडखाली खर्च होणार आहे, अशी माहिती सभागृहात कांबळे यांनी दिली. यावर आक्रमक झालेले सुरेश ढवळ यांनी स्वनिधी तरी कुठे समान वाटप केला जातो, असा सनसनी सवाल अधिकाऱ्यांना करीत धारेवर धरले.वित्त समिती ठरावाला ग्रामपंचायतीकडून केराची टोपलीप्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे गरीबांचे घर दुरूस्तीबाबत प्रस्ताव मंजूर करावेत, असा ठराव १९ आॅगस्टच्या सभेत घेतला गेला असतानाही ग्रामपंचायत विभागाने या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. केवळ एकट्या कुडाळ तालुक्यात गरीबांची घर दुरूस्ती यासाठीचे ८ प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सुरेश ढवळ यांनी सभागृहात नाराजी व्यक्त करीत वित्त समिती सभेला किंमतच नसल्याचे यावेळी सांगितले. असे असेल तर आम्ही मिटींगलाच येणार नसल्याचे जाहीर केले.जमा-खर्चास मान्यता दिली नाहीसभागृहात जमा-खर्चाला मान्यता मिळण्याबाबत इतिवृत्त वाचण्यात आले. त्यात गरीबांची घरे दुरूस्त करण्यासाठी झालेल्या खर्चाला सभागृहाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे गरीबांची घरे दुरूस्ती करणे हा विषय पेटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)सर्व निधी खर्च करा१३व्या वित्त आयोगाअंतर्गत सर्व रक्कम येत्या मार्च महिन्यापर्यंत खर्च होणे आवश्यक आहे. निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नावरील दायित्वावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहिल्यास तो शासनाला जाणार आहे. त्यामुळे निधी वेळेत खर्च करा, असे आवाहनही यावेळी सदस्यांना वित्त अधिकारी मारूती कांबळे यांनी केले.उठायचं अन्... सरळ बाहेर जायचंआजच्या वित्त समिती सभेत गरीबांची घर दुरूस्ती या हेडखाली महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असते. वित्त विभागातीलच काही अधिकारी व इतर एक-दोन खातेप्रमुख मोबाईलवर तसेच आपापसात चर्चा करीत होते. हा सर्व प्रकार वित्त अधिकारी कांबळे यांच्या निदर्शनास येताच कांबळे यांनी संबंधितांना चांगलेच फटकारत ज्यांना सभागृहात बोलायचे आहे त्यांनी उठायचं आणि सरळ बाहेर जायचं असा सल्ला दिला. नंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.