शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जावडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: February 13, 2015 00:57 IST

नगरपरिषदेची सभा गाजली : जिल्हा प्रशासनाची नगरपरिषद कारभारात ढवळाढवळ नको

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या विकासकामांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ‘खो’ घालणारे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. पालिकेवर जिल्हाधिकारी नियंत्रणासाठी आहेत, अतिक्रमणासाठी नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नगरपरिषदेच्या अधिकारात ढवळाढवळ केल्यास नगरपरिषद स्वस्थ बसणार नाही. प्रथम जावडेकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कलम ३०८ चे भूत गाडून टाका, अशी आग्रही मागणी नगरसेवक उमेश शेट्ये यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. सभागृहात त्या आशयाचा ठरावही मंजूर करण्यात आला. तत्कालीन हंगामी मुख्याधिकारी जावडेकर यांनी विकासकामात ‘खो’ घालून जनविरोधी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री व संबंधितांना सभेतील ठरावाचे पत्र पाठवावे, अशी मागणीही शेट्ये यांनी केल्यानंतर सभागृहाने त्याला मान्यता दिली. रत्नागिरी नगर परिषदेकडील एकूण १३ विकासकामांसंदर्भात तत्कालीन मुख्याधिकारी जावडेकर यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार अर्ज दाखल करून ही कामे वाढीव मुदतीचा विचार करून वाढीव दराने केल्याने या कामांना स्थगिती मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अनुक्रमांक १, ५, ११ व १३ या चार विकासकामांच्या फेरनिविदा मागविण्याबाबत व अन्य नऊ कामे अंदाजपत्रकीय दराप्रमाणे करून घेण्याबाबत आदेश दिला आहे. हा आदेश माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सर्वसाधारण सभेपुढे निर्णयासाठी सादर करण्यात आला होता. (प्रतिनिधी)‘ते’ पत्र वैध की अवैध?विषयपत्रिकेत १९९ नंबरचा हा विषय चर्चेस येताच शेट्ये यांनी याबाबत म्हणणे मांडत तत्कालीन मुख्याधिकारी जावडेकर यांच्यावर विकासकामांत ‘खो’ घातल्याचा ठपका ठेवला. तसेच जावडेकर यांची हंगामी मुख्याधिकारी म्हणून १२ डिसेंबर २०१४ पर्यंतच मुदत असताना त्यांनी स्थगितीबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना १५ डिसेंबर २०१५ ला दिले होते. त्यामुळे ते पत्रही कायदेशीर ठरत नसल्याचा दावा शेट्ये यांनी केला. मात्र, जावडेकर यांचे हे पत्र १५ डिसेंबरला दिले असले तरी १२ डिसेंबर २०१४ पूवी त्यावर स्वाक्षरी झालेली असेल तर वैध ठरू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे पत्र वैध की अवैध, असा सवाल निर्माण झाला आहे.