शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वायंगणी शेती नामशेषची भीती

By admin | Updated: April 8, 2015 23:55 IST

भातपेरणीत दिवसेंदिवस घट : वन्यप्राण्यांचा उपद्रव, पाणीटंचाईची समस्या

सुरेश बागवे - कडावल -वायंगणी भातपेरणी क्षेत्राखाली दिवसेंदिवस घट होत आहे. सातत्याने होणारा वन्यप्राण्यांचा उपद्रव व पाणीटंचाईच्या समस्येमुळे शेतकरी याबाबत अनुत्सुकता दाखवत असून, भात उत्पादनाबरोबरच उत्कृष्ट प्रतीचे वैरणीचे गवत असा दुहेरी फायदा देणारी ही शेती पुढील काळात नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. कडावल व हिर्लोक पंचक्रोशीत पूर्वीपासून वायंगणी शेती करण्यात येते. नारूर, कुसगाव, गिरगाव, हिर्लोक, किनळोस, रांगणा तुळसुली आदी गावांमध्ये विशेषत: वायंगणी भातपेरणीचे प्रमाण जास्त आहे. वायंगणी भातामुळे भात उत्पादनाबरोबरच गुरांसाठी उत्कृष्ट गवत असा दुहेरी फायदा मिळत असल्याने पूर्वी शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपेरणी करत असत. शिवाय शेतात उन्हाळी हंगामातील वायंगणी भात पेरणी केल्यामुळे चरण्यासाठी मोकाट सोडण्यात येणाऱ्या गुरांना आपसूकच प्रतिबंध होतो. त्यामुळे गुरांकडून होणारे शेतबंधाऱ्यांचे नुकसान टळते. पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचे सावटही या शेतीवर कायम आहे. गवा रेडे व रानडुकरांकडून वायंगणी पिकाचे सतत मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानेही शेतकरी आता वायंगणी भात पेरणीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. परिणामी भात उत्पादन व वैरणीचे गवत असा दुहेरी फायदा देणारे ही पीक पुढील काळात नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)पाणीपुरवठ्याअभावी भात उत्पादनात घटवायंगणी शेती शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असली, तरी या शेतीला पाणीटंचाईची झळ आता बसू लागली आहे. वायंगणी पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेत जमिनीतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पाणी पुरवठ्याअभावी भात उत्पादनात घट येत आहे.