शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

साथरोग पसरण्याची भीती

By admin | Updated: October 30, 2014 00:46 IST

आरोग्य विभाग सतर्क : बदलत्या वातावरणाचा फटका

रजनीकांत कदम - कुडाळपरतीचा पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणेबरोबरच जनतेनेही सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाचे चार महिने संपून गेले, तरीही अधूनमधून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. परतीच्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सगळीकडे साचते. त्यामुळे तापमानात कधी वाढ तर कधी थंडी असे बदल घडत राहतात. कधी पाऊस, कधी कडक ऊन तर कधी थंडी असे वातावरण वारंवार बदलत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. यासाठी आरोग्य विभागाबरोबरच जनतेनेही सतर्क राहून साथीच्या रोगांपासून दूर राहण्याबाबत उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर आहेच, शिवाय सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे साथीचे रोग पसरण्याचा. जिकडे तिकडे साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची पैदास आताच्या उबदार वातावरणाुळे जोर धरणार असून या डासांमार्फत ताप किंवा अन्य साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत डासांचे प्रमाण वाढले असूनही यावर उपाययोजना करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. कुडाळ शहराचाच विचार करता, शहरात अनेक ठिकाणी तुंबलेले गटार, वाढता कचरा, घाणीचे साम्राज्य हे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य स्त्रोत ठिकठिकाणी दिसत आहेत. तरीही डासांच्या पैदासीला आळा घालण्यासाठी अथवा डासांचे निर्मूलन करण्यासाठी कोणतीही मोहीम हाती घेतलेली दिसत नाही. बदलत्या वातावरणामुळे शहराला डेंग्यू तापाच्या साथीला तोंड द्यावे लागले आहे. अशाचप्रकारचे रोग येण्यापूर्वीच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. ‘ड्राय डे’ पाळला जात नाहीपाऊस पडून गेल्यानंतर डबकी आणि साचलेल्या पाण्याचे स्त्रोत नष्ट करून डासांची पैदास थांबविण्यासाठी शासनातर्फे ‘ड्राय डे’चे आयोजन केले जाते. परंतु ग्रामपंचायत पातळीवर या ‘ड्राय डे’चे पालन योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच साथरोग नियंत्रणात आणणे अवघड होत आहे.