शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग पसरण्याची भीती

By admin | Updated: October 30, 2014 00:46 IST

आरोग्य विभाग सतर्क : बदलत्या वातावरणाचा फटका

रजनीकांत कदम - कुडाळपरतीचा पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणेबरोबरच जनतेनेही सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाचे चार महिने संपून गेले, तरीही अधूनमधून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. परतीच्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सगळीकडे साचते. त्यामुळे तापमानात कधी वाढ तर कधी थंडी असे बदल घडत राहतात. कधी पाऊस, कधी कडक ऊन तर कधी थंडी असे वातावरण वारंवार बदलत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. यासाठी आरोग्य विभागाबरोबरच जनतेनेही सतर्क राहून साथीच्या रोगांपासून दूर राहण्याबाबत उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर आहेच, शिवाय सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे साथीचे रोग पसरण्याचा. जिकडे तिकडे साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची पैदास आताच्या उबदार वातावरणाुळे जोर धरणार असून या डासांमार्फत ताप किंवा अन्य साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत डासांचे प्रमाण वाढले असूनही यावर उपाययोजना करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. कुडाळ शहराचाच विचार करता, शहरात अनेक ठिकाणी तुंबलेले गटार, वाढता कचरा, घाणीचे साम्राज्य हे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य स्त्रोत ठिकठिकाणी दिसत आहेत. तरीही डासांच्या पैदासीला आळा घालण्यासाठी अथवा डासांचे निर्मूलन करण्यासाठी कोणतीही मोहीम हाती घेतलेली दिसत नाही. बदलत्या वातावरणामुळे शहराला डेंग्यू तापाच्या साथीला तोंड द्यावे लागले आहे. अशाचप्रकारचे रोग येण्यापूर्वीच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. ‘ड्राय डे’ पाळला जात नाहीपाऊस पडून गेल्यानंतर डबकी आणि साचलेल्या पाण्याचे स्त्रोत नष्ट करून डासांची पैदास थांबविण्यासाठी शासनातर्फे ‘ड्राय डे’चे आयोजन केले जाते. परंतु ग्रामपंचायत पातळीवर या ‘ड्राय डे’चे पालन योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच साथरोग नियंत्रणात आणणे अवघड होत आहे.