शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आंबा हंगाम लांबण्याची भीती

By admin | Updated: July 8, 2014 23:16 IST

कलमे पुन्हा पालवण्याची शक्यता : पावसाच्या ओढीमुळे पालवलेल्या झाडांना किटकांचा प्रादुर्भाव

नरेंद्र बोडस : देवगड , देवगडसह संपूर्ण कोकणामध्ये मृग नक्षत्र कोरडेच गेले. पावसाच्या सुरुवातीनंतर आंबा कलमे जून मध्यानंतर पालवू लागली. बहुतांश झाडे पालवली. मात्र, पावसाच्या ओढीमुळे पालवलेली झाडे किटकांच्या हल्ल्यामुळे हतबल झाली. कोवळी पालवी किटकांनी खाऊन टाकल्यामुळे पालवण्याची प्रक्रिया पुन्हा दिसून येईल अशी भिती बागायतदार व्यक्त करीत आहेत. एकंदरीत पावसाच्या ओढीमुळे आॅक्टोबर मध्याच्याही पुढे पाऊस सुरु राहील असा अंदाजही जाणकार बागायतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबा हंगामाची सुरुवात नोव्हेंबर मध्यानंतरच होईल, अशीही भीती त्यांना वाटत आहे. दरम्यान, पावसाची ओढ संपल्याची चिन्हे असून तालुक्यात रविवार, सोमवारी पावसाच्या मोठ्या सरींनी बागायतदारांना दिलासा दिला आहे. पावसाचे आगमन पुन्हा जोरदारपणे होईल या आशेवर बागायतदारांची पुढील हालचाल अवलंबून आहे. त्यामुळे यावर्षी उशिराने दाखल झालेल्या पावसाचा फटका शेती बागायतींप्रमाणेच कोकणातील सर्वात मोठे पीक म्हणून नावारूपास आलेल्या आंबा पिकालाही बसला आहे. त्यावर आता योग्य उपाययोजना करण्याची गरज मोठ्या संख्येने निर्माण झाली आहे. यावर्षी तुडतुड्या, फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात राहिला होता. कोष स्थितीत असलेल्या तुडतुड्याच्या अंड्यातून पावसामुळे किटक निर्मिती होत आहे. त्यामुळेच चांगली पालवी या हल्ल्याचे लक्ष झाली आहे. बहुतांश पालवी कुरतडली जावून नष्ट होत आहे.त्यामुळे ही झाडे परत एकदा पालवण्याची दाट शक्यता बागायतदार व्यक्त करीत आहेत. किटकनाशक फवारणीही करावी लागणार- तुडतुड्यांची प्रभावी शक्ती लक्षात घेऊन मोठ्या बागायतदारांना आंबा कलमांना तुडतुड्या प्रतिबंधक व नाशक फवारणीचीही आवश्यकता वाटत आहे. पावसाच्या ओढीचा अंदाज घेऊन काही बागायतदारांनी तसा प्रयत्न करून पुढील नुकसान टाळण्याचा प्रयत्नही या भागात केला आहे. मात्र, यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याचीही शक्यता आहे. उत्पादनातील घट टाळायची असेल तर तसा धोका पत्करल्याखेरीज बागायतदारांनाही पर्याय दिसत नसल्याचे चित्र आहे.