शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आंबा हंगाम लांबण्याची भीती

By admin | Updated: July 8, 2014 23:16 IST

कलमे पुन्हा पालवण्याची शक्यता : पावसाच्या ओढीमुळे पालवलेल्या झाडांना किटकांचा प्रादुर्भाव

नरेंद्र बोडस : देवगड , देवगडसह संपूर्ण कोकणामध्ये मृग नक्षत्र कोरडेच गेले. पावसाच्या सुरुवातीनंतर आंबा कलमे जून मध्यानंतर पालवू लागली. बहुतांश झाडे पालवली. मात्र, पावसाच्या ओढीमुळे पालवलेली झाडे किटकांच्या हल्ल्यामुळे हतबल झाली. कोवळी पालवी किटकांनी खाऊन टाकल्यामुळे पालवण्याची प्रक्रिया पुन्हा दिसून येईल अशी भिती बागायतदार व्यक्त करीत आहेत. एकंदरीत पावसाच्या ओढीमुळे आॅक्टोबर मध्याच्याही पुढे पाऊस सुरु राहील असा अंदाजही जाणकार बागायतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबा हंगामाची सुरुवात नोव्हेंबर मध्यानंतरच होईल, अशीही भीती त्यांना वाटत आहे. दरम्यान, पावसाची ओढ संपल्याची चिन्हे असून तालुक्यात रविवार, सोमवारी पावसाच्या मोठ्या सरींनी बागायतदारांना दिलासा दिला आहे. पावसाचे आगमन पुन्हा जोरदारपणे होईल या आशेवर बागायतदारांची पुढील हालचाल अवलंबून आहे. त्यामुळे यावर्षी उशिराने दाखल झालेल्या पावसाचा फटका शेती बागायतींप्रमाणेच कोकणातील सर्वात मोठे पीक म्हणून नावारूपास आलेल्या आंबा पिकालाही बसला आहे. त्यावर आता योग्य उपाययोजना करण्याची गरज मोठ्या संख्येने निर्माण झाली आहे. यावर्षी तुडतुड्या, फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात राहिला होता. कोष स्थितीत असलेल्या तुडतुड्याच्या अंड्यातून पावसामुळे किटक निर्मिती होत आहे. त्यामुळेच चांगली पालवी या हल्ल्याचे लक्ष झाली आहे. बहुतांश पालवी कुरतडली जावून नष्ट होत आहे.त्यामुळे ही झाडे परत एकदा पालवण्याची दाट शक्यता बागायतदार व्यक्त करीत आहेत. किटकनाशक फवारणीही करावी लागणार- तुडतुड्यांची प्रभावी शक्ती लक्षात घेऊन मोठ्या बागायतदारांना आंबा कलमांना तुडतुड्या प्रतिबंधक व नाशक फवारणीचीही आवश्यकता वाटत आहे. पावसाच्या ओढीचा अंदाज घेऊन काही बागायतदारांनी तसा प्रयत्न करून पुढील नुकसान टाळण्याचा प्रयत्नही या भागात केला आहे. मात्र, यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याचीही शक्यता आहे. उत्पादनातील घट टाळायची असेल तर तसा धोका पत्करल्याखेरीज बागायतदारांनाही पर्याय दिसत नसल्याचे चित्र आहे.