शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

नदीपात्र कोरडे पडण्याची भीती

By admin | Updated: March 31, 2015 00:19 IST

पाण्याचा अनियंत्रित उपसा : ओटवणे पंचक्रोशीतील समस्या

महेश चव्हाण - ओटवणे पंचक्रोशीतून वाहत जाणाऱ्या तेरेखोल नदीचे पात्र पाण्याच्या अनियंत्रित उपशामुळे कोरडे होऊ लागले आहे. याचा परिणाम म्हणून आगामी कडक उन्हाळ्याच्या दिवसात स्थानिक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवणार आहे. ओटवणे पंचक्रोशीतून वाहणारी तेरेखोल नदी म्हणजे येथील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, मार्च अखेरीस नदीने जमिनीची पातळी गाठल्याने पुढील दिवसात जाणवणाऱ्या कडक उन्हाळ्यात शेती, बागायतीसाठी पाणी कोठून आणायचे, हा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे. पंचक्रोशीतील ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, बावळाट, दाभिल, कोनशी आदी गावे या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या पाण्याचा वापर करून या गावातील स्थानिक शेतकऱ्यांनी माड पोफळीच्या बागांसह केळी, विविध तत्सम पिके तर कृषीक्रांतीत अग्रेसर असलेला विलवडे गाव भाजीपाल्याचे मोठे उत्पन्न याठिकाणी घेतो. पूर्णत: आर्थिक ऊलाढाल शेतीवरच असलेल्या या ग्रामस्थांसाठी नदी म्हणजे जीवनदायिनी आहे. मात्र, या जीवनदायिनीवर परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पाणी आटू लागले आहे. परप्रांतीय व्यावसायिकांनी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगांच्या रांगा हस्तगत करून त्याठिकाणी रबर पिकाचे शेतमळे पिकवले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून आणि ग्रामस्थांना पैशाचे आमिष दाखवून येथील शेकडो एकर जमिनीवर केरळीयन व्यापाऱ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या काबीज केलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात रबर लागवड केली आहे. या रबर शेतीसाठी लागणारे पाणी डोंगररागांच्या पायथ्यालगत वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रातून भरमसाट उपसा केले जात आहे. रबर पिकासांठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असल्याने नदीवर मोठ्या अश्वशक्तीचे पंप बसवून बेसुमार पाणीसाठा वापरला जातो. प्रथमत: या हस्तगत केलेल्या जमिनीवर केळी तसेच अननस लागवड करून फळपिकांचा काही वर्षे देखावा करण्यात आला आणि त्यामध्ये रबराची पिके घेण्यात आली. जसजशी वर्षे पुढे ढकलली आणि रबराची झाडे मोठी झाली, तशी केळी, अननस, इतर पिके कमी करून रबराच्या झाडावर लक्ष केंद्रीत करण्याची कल्पकता या व्यावसायिकांनी वापरली. आता सद्यस्थितीत पाहिले असता, सह्याद्रीच्या पर्वतरांगा पूर्णत: रबराच्या झाडांनी व्यापलेल्या आहेत आणि रबर पिके उत्पन्न देण्याच्या जवळ आल्याने आपूसकच तत्सम फळ पिकांची लागवड बंद झाली. रबर हे पीक असे आहे की, या पिकाला ओलसरपणा भरपूर लागतो. त्यावर त्याची वाढ आणि येणारा चिक अवलंबून असतो. त्यामुळे या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या उपसा नदीतून केला जातो. त्यासाठी नदीवर मोठ्या पॉवरचे पंप बसविले. त्याशिवाय या उंच भागात मोठमोठाल्या विहिरी खोदून त्यामध्ये पाणी साठवणूक केल्याचे पहायला मिळते. पाण्याचा बेसुमार वापर तर होतोय, शिवाय हजारो लीटर पाणी वायाही जाते. नळपाणी पुरवठा धोक्याततेरेखोल नदीच्या पाण्यावर ओटवणे, विलवडे, इन्सुली, वाफोली, बावळाट आदी गावातील नळपाणी योजना कार्यान्वित आहे. पण मार्च अखेरीस केरळीयन परप्रांतियांच्या अतिक्रमणामुळे नदी कोरडी झाल्याने विंधन विहिरींना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अजूनही एप्रिल, मे हे कडक उन्हाळ्याचे महिने येणे बाकी आहे. त्यामुळे या नळपाण्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची पाण्यासाठी वणवण होणार आहे. त्यातच पावसाने अनियमितता दाखविली, तर दुष्काळजन्य परिस्थिती या भागात ओढवण्याची पाळी येईल. केरळीयन परप्रांतीयांच्या वाढत्या घुसखोरीवर आता त्वरित शासनस्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे व्यावसायिक करत असलेल्या पाणी उपशावर पूर्णत: निर्बंध लादून ठराविक पाणीसाठा त्यांनी दिवसागणिक उपसा करण्याचे नियम त्यांच्यावर लादण्यात यावेत. -एम. डी. सावंत,ओटवणे दशक्रोशी समिती अध्यक्ष