शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्र कोरडे पडण्याची भीती

By admin | Updated: March 31, 2015 00:19 IST

पाण्याचा अनियंत्रित उपसा : ओटवणे पंचक्रोशीतील समस्या

महेश चव्हाण - ओटवणे पंचक्रोशीतून वाहत जाणाऱ्या तेरेखोल नदीचे पात्र पाण्याच्या अनियंत्रित उपशामुळे कोरडे होऊ लागले आहे. याचा परिणाम म्हणून आगामी कडक उन्हाळ्याच्या दिवसात स्थानिक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवणार आहे. ओटवणे पंचक्रोशीतून वाहणारी तेरेखोल नदी म्हणजे येथील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, मार्च अखेरीस नदीने जमिनीची पातळी गाठल्याने पुढील दिवसात जाणवणाऱ्या कडक उन्हाळ्यात शेती, बागायतीसाठी पाणी कोठून आणायचे, हा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे. पंचक्रोशीतील ओटवणे, विलवडे, सरमळे, भालावल, बावळाट, दाभिल, कोनशी आदी गावे या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या पाण्याचा वापर करून या गावातील स्थानिक शेतकऱ्यांनी माड पोफळीच्या बागांसह केळी, विविध तत्सम पिके तर कृषीक्रांतीत अग्रेसर असलेला विलवडे गाव भाजीपाल्याचे मोठे उत्पन्न याठिकाणी घेतो. पूर्णत: आर्थिक ऊलाढाल शेतीवरच असलेल्या या ग्रामस्थांसाठी नदी म्हणजे जीवनदायिनी आहे. मात्र, या जीवनदायिनीवर परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पाणी आटू लागले आहे. परप्रांतीय व्यावसायिकांनी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगांच्या रांगा हस्तगत करून त्याठिकाणी रबर पिकाचे शेतमळे पिकवले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून आणि ग्रामस्थांना पैशाचे आमिष दाखवून येथील शेकडो एकर जमिनीवर केरळीयन व्यापाऱ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या काबीज केलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात रबर लागवड केली आहे. या रबर शेतीसाठी लागणारे पाणी डोंगररागांच्या पायथ्यालगत वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रातून भरमसाट उपसा केले जात आहे. रबर पिकासांठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असल्याने नदीवर मोठ्या अश्वशक्तीचे पंप बसवून बेसुमार पाणीसाठा वापरला जातो. प्रथमत: या हस्तगत केलेल्या जमिनीवर केळी तसेच अननस लागवड करून फळपिकांचा काही वर्षे देखावा करण्यात आला आणि त्यामध्ये रबराची पिके घेण्यात आली. जसजशी वर्षे पुढे ढकलली आणि रबराची झाडे मोठी झाली, तशी केळी, अननस, इतर पिके कमी करून रबराच्या झाडावर लक्ष केंद्रीत करण्याची कल्पकता या व्यावसायिकांनी वापरली. आता सद्यस्थितीत पाहिले असता, सह्याद्रीच्या पर्वतरांगा पूर्णत: रबराच्या झाडांनी व्यापलेल्या आहेत आणि रबर पिके उत्पन्न देण्याच्या जवळ आल्याने आपूसकच तत्सम फळ पिकांची लागवड बंद झाली. रबर हे पीक असे आहे की, या पिकाला ओलसरपणा भरपूर लागतो. त्यावर त्याची वाढ आणि येणारा चिक अवलंबून असतो. त्यामुळे या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या उपसा नदीतून केला जातो. त्यासाठी नदीवर मोठ्या पॉवरचे पंप बसविले. त्याशिवाय या उंच भागात मोठमोठाल्या विहिरी खोदून त्यामध्ये पाणी साठवणूक केल्याचे पहायला मिळते. पाण्याचा बेसुमार वापर तर होतोय, शिवाय हजारो लीटर पाणी वायाही जाते. नळपाणी पुरवठा धोक्याततेरेखोल नदीच्या पाण्यावर ओटवणे, विलवडे, इन्सुली, वाफोली, बावळाट आदी गावातील नळपाणी योजना कार्यान्वित आहे. पण मार्च अखेरीस केरळीयन परप्रांतियांच्या अतिक्रमणामुळे नदी कोरडी झाल्याने विंधन विहिरींना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अजूनही एप्रिल, मे हे कडक उन्हाळ्याचे महिने येणे बाकी आहे. त्यामुळे या नळपाण्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची पाण्यासाठी वणवण होणार आहे. त्यातच पावसाने अनियमितता दाखविली, तर दुष्काळजन्य परिस्थिती या भागात ओढवण्याची पाळी येईल. केरळीयन परप्रांतीयांच्या वाढत्या घुसखोरीवर आता त्वरित शासनस्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे व्यावसायिक करत असलेल्या पाणी उपशावर पूर्णत: निर्बंध लादून ठराविक पाणीसाठा त्यांनी दिवसागणिक उपसा करण्याचे नियम त्यांच्यावर लादण्यात यावेत. -एम. डी. सावंत,ओटवणे दशक्रोशी समिती अध्यक्ष