शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

हल्ल्याच्या भीतीने बिबट्याशी वैर नको

By admin | Updated: November 23, 2014 23:51 IST

प्रकाश आमटे : उभ्या राहिलेल्या व्यक्तीला धोका नाही; माणसांचे बोलणे ऐकूनही ‘तो’ दूर जातो

राजीव मुळ्ये -- सातारा -बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. तो आपल्यावर हल्ला करेलच, असे गृहित धरून त्याच्याशी वैर करू नका, असा कानमंत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी पश्चिम घाटातील ग्रामस्थांना दिला आहे. विकासाची प्रक्रिया पर्यावरणाचे संतुलन राखणारी असावी, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी ‘लोकमत’ला विविध मुद्द्यांवर अनुभवाचे बोल सांगितले. परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन नव्यानेच होऊ लागले आहे. उसाच्या शेतात दबा धरून बसणारा बिबट्या कधी प्रवासी वाहनावर उडी घेताना, तर कधी शेतात मृतावस्थेत आढळून येत असल्याने अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याविषयी बोलते केले असता डॉ. आमटे म्हणाले, ‘बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. खाली वाकलेली व्यक्ती, शौचाला बसलेली व्यक्ती अशी त्याच्यापेक्षा कमी उंचीची आकृती दिसली, तरच तो हल्ला करण्याची शक्यता असते. एरवी माणसाच्या जवळपास तो फिरकत नाही. भीती असणाऱ्या गावांतील ग्रामस्थ केवळ गप्पा मारत शेतात गेले, तरी त्या आवाजाने बिबट्या दूर राहील.’पाळीव जनावरांवरील हल्ले वाढत असल्याने बिबट्या शेतकऱ्यांना शत्रू वाटू लागला आहे, हे निदर्शनास आणून देताच त्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. ‘पाळीव प्राण्याची शिकार वन्यजीवांकडून झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे, ती सुटसुटीत करायला हवी. पंचनामा आणि भरपाई तातडीने मिळायला हवी. घटना वनखात्याच्या हद्दीत घडली की गावठाणात, असे घोळ न घालता भरपाई मिळू लागल्यास शेतकरी बिबट्याला शत्रू मानणार नाहीत,’ असे ते म्हणाले. घातक प्रकल्पांना विरोध हवागोंदिया जिल्ह्यात वनजमिनीत होऊ घातलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प, मुळशी तालुक्यात होऊ घातलेले आणखी एक खासगी हिलस्टेशन अशा प्रकल्पांकडे लक्ष वेधले असता, ‘निसर्गरक्षण आणि विकास या प्रक्रिया हातात हात घालून व्हायला हव्यात,’ असे मत डॉ. आमटे यांनी व्यक्त केले. ‘घातक प्रकल्पांना स्थानिकांनी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध करावा. दुर्दैवाने, आर्थिक हितसंबंध प्रत्येक वेळी प्रबळ ठरतात आणि विकासप्रक्रियेत पर्यावरणाला जणू स्थानच नाही, असे वातावरण निर्माण केले जाते. ही प्रक्रिया योग्य नाही,’ असे ते म्हणाले. ‘सोशल वाघां’ना सल्लावाघ, बिबटे आणि इतर वन्यजीवांचे फोटो आणि त्यांचा आढळ असलेली ठिकाणे हल्ली सोशल मीडियावर सर्रास फिरत असतात. अशा ‘सोशल वाघां’ना डॉ. आमटे यांनी सबुरीचा सल्ला दिला. ‘खोटी माहिती, फोटो प्रसिद्ध करणे तर टाळाच; परंतु खरोखर एखादा वन्यजीव कुठे आढळला असेल, तरी त्याचा फोटो ‘सोशल मीडिया’वर टाकू नका. अशा माहितीमुळे शिकारी सावध होण्याचा आणि दुर्मिळ वन्यजीवांची संख्या आणखी रोडावण्याचा धोका आहे,’ असे ते म्हणाले.