शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर एफसीआयची अवकृ पा

By admin | Updated: January 19, 2015 00:20 IST

भातखरेदी थांबली : पावसानंतर आता नवा दणका...

विनोद पवार- राजापूर - निसर्गाची अवकृ पा व यावर्षी राज्यात कमी पडलेला पाऊस यामुळे राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. शेतात पिकत नसल्यामुळे विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत आहे. तर दुसरीकडे फूड कॉर्पोेरेशन आॅफ इंडियाच्या अवकृपेमुळे आता कोकणातल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भातशेती करुन आर्थिक समृद्धतेची स्वप्न पाहणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्याला आता या भाताचे करायचे काय, असा यक्ष प्रश्न पडला आहे.एफसीआयच्या बदलेल्या धोरणांमुळे गतवर्षी खरेदी केलेले सुमारे २ लाख ९२ हाजर क्विंटल भात गोदामात पडून आहे. त्यामुळे, तर यावर्षीच्या भाताच्या खरेदीला एफसीआयने सुरुवात केलेली नाही. विदर्भापाठोपाठ आता कोकणातल्या शेतकऱ्याला आत्महत्येच्या विळख्यात सोडवण्यासाठी आता कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन, उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.कोकणातला शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून वर्षभरात फक्त भात हे पीक घेतो. त्यातून आपल्या कुटुंबाची गुजराण करतो. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. या प्रांतात सिंचनाचा अभाव असतानादेखील केवळ चार महिने पडणाऱ्या पावसावर कोकणात मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. आता कोकणातला शेतकरी बागायत शेतीकडे वहला असला तरी ही बागायतदारांची संख्या फारच नगण्य आहे. त्यामुळे अद्यापही शेतीतले प्रमुख पीक म्हणून भाताकडेच पाहिले जाते. वर्षाचे बारा महीने कष्ट करुन, पिकवलेल्या भातातील आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे भात शिल्लक ठेऊन उर्वरित भात विकले जाते व त्यातून वरखर्चाचा ताळमेळ कोकणातला शेतकरी बसवतो. मात्र, यावर्षी हा वरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न येथील शेतकऱ्याला पडला आहे.यावर्षी, फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले भात अद्यापही एफसीआयच्या गोदामात पडून आहे. त्यामुळे, या पावसाळ्यात शेतकऱ्याने पिकवलेले भात खरेदी करण्यास एफसीआयने सुरुवात केलेली नाही. गतवर्षात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातापैकी अद्यापही सुमारे २ लाख ९७ हजार क्विंटल भात गोदामात पडून आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली असून, या चारही जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी पक्षभेद विसरुन एकत्र येत आपल्या कोकणी शेतकऱ्याला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.आर्थिक संकट उभेएफसीआयने गतवर्षी कोकणातील चारही जिल्ह्यात खरेदी केलेल्या भातापैकी सिंधुदुर्गात १७ हजार क्विंटल, रत्नागिरीत २५ हजार क्विंटल, ठाण्यात २५ हजार क्विंटल तर रायगडमध्ये तब्बल २ लाख क्विंटल धान्य पडून आहे. त्यामुळे अद्यापही एफसीआयने यावर्षीचे भात खरेदी करण्यास सुरुवात केलेली नाही. या चारही जिल्ह्यात एफसीआय त्या त्या तालुक्यातील खरेदी विक्री संघामार्फ त शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करते. मात्र, यावर्षी भात खरेदी करण्याच्या सूचनाच अद्यापही न आल्याने खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांकडून भातखरेदीला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणातील या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.