शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

शेतकऱ्यांवर एफसीआयची अवकृ पा

By admin | Updated: January 19, 2015 00:20 IST

भातखरेदी थांबली : पावसानंतर आता नवा दणका...

विनोद पवार- राजापूर - निसर्गाची अवकृ पा व यावर्षी राज्यात कमी पडलेला पाऊस यामुळे राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. शेतात पिकत नसल्यामुळे विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत आहे. तर दुसरीकडे फूड कॉर्पोेरेशन आॅफ इंडियाच्या अवकृपेमुळे आता कोकणातल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भातशेती करुन आर्थिक समृद्धतेची स्वप्न पाहणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्याला आता या भाताचे करायचे काय, असा यक्ष प्रश्न पडला आहे.एफसीआयच्या बदलेल्या धोरणांमुळे गतवर्षी खरेदी केलेले सुमारे २ लाख ९२ हाजर क्विंटल भात गोदामात पडून आहे. त्यामुळे, तर यावर्षीच्या भाताच्या खरेदीला एफसीआयने सुरुवात केलेली नाही. विदर्भापाठोपाठ आता कोकणातल्या शेतकऱ्याला आत्महत्येच्या विळख्यात सोडवण्यासाठी आता कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन, उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.कोकणातला शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून वर्षभरात फक्त भात हे पीक घेतो. त्यातून आपल्या कुटुंबाची गुजराण करतो. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. या प्रांतात सिंचनाचा अभाव असतानादेखील केवळ चार महिने पडणाऱ्या पावसावर कोकणात मोठ्या प्रमाणात भात पिकवले जाते. आता कोकणातला शेतकरी बागायत शेतीकडे वहला असला तरी ही बागायतदारांची संख्या फारच नगण्य आहे. त्यामुळे अद्यापही शेतीतले प्रमुख पीक म्हणून भाताकडेच पाहिले जाते. वर्षाचे बारा महीने कष्ट करुन, पिकवलेल्या भातातील आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे भात शिल्लक ठेऊन उर्वरित भात विकले जाते व त्यातून वरखर्चाचा ताळमेळ कोकणातला शेतकरी बसवतो. मात्र, यावर्षी हा वरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न येथील शेतकऱ्याला पडला आहे.यावर्षी, फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले भात अद्यापही एफसीआयच्या गोदामात पडून आहे. त्यामुळे, या पावसाळ्यात शेतकऱ्याने पिकवलेले भात खरेदी करण्यास एफसीआयने सुरुवात केलेली नाही. गतवर्षात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातापैकी अद्यापही सुमारे २ लाख ९७ हजार क्विंटल भात गोदामात पडून आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली असून, या चारही जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी पक्षभेद विसरुन एकत्र येत आपल्या कोकणी शेतकऱ्याला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे.आर्थिक संकट उभेएफसीआयने गतवर्षी कोकणातील चारही जिल्ह्यात खरेदी केलेल्या भातापैकी सिंधुदुर्गात १७ हजार क्विंटल, रत्नागिरीत २५ हजार क्विंटल, ठाण्यात २५ हजार क्विंटल तर रायगडमध्ये तब्बल २ लाख क्विंटल धान्य पडून आहे. त्यामुळे अद्यापही एफसीआयने यावर्षीचे भात खरेदी करण्यास सुरुवात केलेली नाही. या चारही जिल्ह्यात एफसीआय त्या त्या तालुक्यातील खरेदी विक्री संघामार्फ त शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करते. मात्र, यावर्षी भात खरेदी करण्याच्या सूचनाच अद्यापही न आल्याने खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांकडून भातखरेदीला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणातील या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.