शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस व्हॅनच्या धडकेत पिता-पुत्र जखमी

By admin | Updated: December 22, 2016 00:30 IST

सावंतवाडीत अपघात : पंचनाम्यापूर्वी वाहने हलविल्याने नागरिक आक्रमक; किरकोळ बाचाबाची

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील आपले काम संपवून कुडाळ-तेंडोलीच्या दिशेने घरी जाणाऱ्या पिता-पुत्राच्या दुचाकीला रुग्णालयासमोरच्या महामार्गावर पोलिस व्हॅनने धडक दिली. यात विजय बाबू वेंगुर्लेकर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मुलगा दुचाकीस्वार विनय वेंगुर्लेकर (२५) याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना अधिक उपचारांसाठी बांबुळी-गोवा येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान, अपघातानंतर पंचनामा करण्यापूर्वीच पोलिसांनी आपल्या व्हॅनची जागा बदलली. तसेच जखमीचे रक्त पडलेले ठिकाण अग्निशामक बंबाने धुऊन घेतल्याने नागरिक आक्रमक झाले होते. यावेळी पोलिस व नागरिक यांच्यात किरकोळ बाचाबाचीही झाली. मात्र, उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. हा अपघात बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला.येथील उपजिल्हा रुग्णालयात कामानिमित्त आलेले विजय वेंगुर्लेकर व त्याचा मुलगा विनय वेंगुर्लेकर हे स्वत:ची दुचाकी (एमएच ०७ वाय ११२४) घेऊन घरी तेंडोलीला परतत असताना रुग्णालयाच्या जवळच्या उतारावर आले व कुडाळच्या दिशेने वळले. मात्र, त्याचवेळी महामार्गावरून सावंतवाडी पोलिस ठाण्याची व्हॅन (एमएच ०७ जी २०९७) घेऊन पोलिस प्रशांत सुरेश धुमाळे पोलिस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच व्हॅन वेगात दुचाकीला धडकली. या धडकेत विजय वेंगुर्लेकर यांच्या पायाचे हाड व्हॅनच्या पुढच्या चाकात अडकले, तर डोके रस्त्यावर आदळले. तसेच हातालाही जोरदार दुखापत झाली. तर विनय याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.अपघात झाला त्यावेळी पोलिस व्हॅनही रस्त्याच्या विरुद्ध दिशेला अपघातग्रस्त झाली होती. ती अचानक नेऊन एका बाजूला लावण्यात आली. हे काही प्रत्यक्षदर्शिंनी बघितले होते. मात्र, पोलिसांनी आपल्या गाडीला अपघात झालाच नाही, असा पवित्रा घेतला. तसेच नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी मागवून रस्त्यावर पडलेले जखमीचे रक्त धुतले. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलिसांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण कोणीच अधिकारी सुरुवातीला समोर आले नाहीत. दरम्यान, घटनेची माहिती शहरात पसरली. शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, बाळा कुडतरकर, भाऊ पाटील, बाबा आल्मेडा, आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. त्यांनी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना पंचनाम्यापूर्वी गाडी हलविल्याबद्दल जाब विचारला. तसेच कोणाच्या परवानगीने रक्ताचा सडा धुण्यात आला. अग्निशामक बंब कोणी बोलावला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, पोलिस यातील एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. अखेर पोलिसांनी नागरिकांच्या समक्ष पंचनामा केला. घटनास्थळावरून काही प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदविले आणि नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.नागरिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून लोकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. काहीनी आक्रमक होत पोलिसांशी हुज्जत घेतली. अखेर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविण्याचा इशारा देताच नागरिक पांगले. हा प्रकार महामार्गावर तब्बल दोन तास सुरू होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर, हेडकॉन्स्टेबल संजय हुबे, प्रवीण माने, राजू शेळके, प्रमोद काळसेकर, विकी गवस, मंगेश शिगाडे, आदींनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अपघाताचा अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)