शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जीवघेणा प्रवास टळणार

By admin | Updated: November 28, 2014 23:54 IST

ग्रामस्थांमध्ये समाधान : तिलारी नदीवर परमे येथे बांधला पूल

गजानन बोंदे्र - साटेली भेडशी -गेली अनेक वर्षे भेडशी-परमे येथे जाणारा रस्ता पावसाळ्यात बंद असल्यामुळे नदी पार करण्यासाठी ग्रामस्थांना होडीचा जीवघेणा प्रवास करावा लागत होता. परंतु तिलारी नदीवर परमे येथे झालेल्या पुलामुळे परमे आणि घोटगे येथील लोकांची चांगली सोय झाली आहे. हा मार्ग आता बारमाही सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. भेडशी ते परमे हे अवघे तीन ते चार किलोमीटरचे अंतर आहे. परंतु कालव्याच्या पुलाचा वापर केल्यास हेच अंतर दहा ते बारा किलोमीटर होत असे. शिवाय भोमवाडीमार्गे जाणाऱ्या कालव्याचा रस्ता चिखलय आणि धोकादायक होता. रात्रीच्यावेळी या मार्गावरून एकट्याने प्रवास करणे फारच धोकादायक होते. परंतु यावर्षी पावसाळ्यात झालेला परमे येथील परमे पूल म्हणजे घोटगे-परमेवासीयांसाठी वरदानच ठरला आहे. मागील काही वर्षे या परिसरातील लोक नदी पार करण्यासाठी तिलारी प्रकल्पांतर्गत बांधलेल्या कॉजवेचा वापर करीत. त्यावेळी या कॉजवेवरून अनेक वाहने तसेच माणसे वाहून गेल्याचे प्रकार घडले होते. कॉजवेवर पाणी कमी असल्याचे समजून त्यातून चालत जाण्याचा अथवा वाहन हाकण्याचा प्रयत्न अनेकांच्या जीवावर बेतला आहे. परंतु आज येथे झालेल्या पुलामुळे परिसरातील लोकांना नदी पार करणे फारच सोयीस्कर आणि सुरक्षित झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात काढता येण्यासारखे संरक्षक पाईप बसविणे महत्त्वाचे आहे. पुलाला जोडणारा दोन्ही बाजूचा रस्ता उंचावर आहे. घोटगे येथे जाणाऱ्या रस्त्याला पुलापासून जवळच तीव्र वळण आहे. त्यामुळे या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची फार आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात हे ठिकाण अपघातांसाठी निमंत्रण ठरण्याची भीती ग्रामस्थ आणि वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे. पूर्वी दुथडी वाहणाऱ्या तिलारी नदीतून घोटगे-परमे येथील विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये येण्यासाठी होडीतून जीवघेणा प्रवास करीत असत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी येथील मुलांना भेडशी येथे यावे लागत असल्याने होडीचा प्रवास अपरिहार्य होता. तसेच गावातील लोकांनाही साटेली-भेडशी येथे येण्यासाठी होडीतून यावे लागत असे. परमे येथे झालेल्या पुलामुळे होडीचा प्रवास आता टळला असून याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.काम अपूर्णघोटगे-परमे हा भाग दुर्गम असला, तरी आज या पुलामुळे या दोन्ही गावांना विकासाची नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा परिसरातील लोकांनी घेऊन आपल्यासह परिसराचा संपूर्ण विकास करून घ्यायला हवा. दरम्यान, या पुलामुळे होडीचा जीवघेणा प्रवास टळला असला, तरी पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम घाईगडबडीत करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्याने काही काम आजही अपूर्णावस्थेत आहे.