शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल

By admin | Updated: June 24, 2014 01:43 IST

जिल्ह्यातील स्थिती : नवीन तंत्रज्ञानासह बाजारपेठेचेही ज्ञान गरजेचे

गजानन बोंद्रे / साटेली भेडशी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली शेती ही पारंपरिक शेतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक फायदेशीर आहे. आधुनिक शेतीतून मिळणारे उत्पन्न पारंपरिक शेतीपेक्षा निश्चितच जास्त आहे. आधुनिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची बाजारपेठ ठरलेली असते. तर बऱ्याचवेळा या शेतीतून मागणीप्रमाणे उत्पन्न काढून विकल्याने मालाची नासाडी न होता योग्य वेळेत तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे त्यातून मिळणारा फायदा निश्चित आणि चांगला असतो. भांडवलाची कमतरता, आधुनिक शेतीची माहिती नसणे यामुळे लहान मोठे अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे न वळता ते पारंपरिक शेतीतच समाधान मानतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना फायदा त्यामानाने कमी मिळतो. त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. माल योग्य वेळेत बाजारपेठेत न पोहोचल्याने शेतीमाल खराब होतो. मालाची नासाडी होणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पारंपरिक शेती करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना बऱ्याचवेळा नुकसानीस सामोरे जावे लागते. आधुनिक शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. नांगरणीची विविध साधने, पाणी पुरवठ्याची साधने आदीसाठी गुंतवणूक करावी लागल्याने भांडवलाची आवश्यकता मोठी असते. परंतु आधुनिक शेतीसाठी ज्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक त्या प्रमाणात आणि निश्चित मोठ्या प्रमाणावर फायदा आधुनिक शेतीतून आपण मिळवू शकतो. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती निश्चितच फायदेशीर आहे. पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे या शेतीतून वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. परंतु आधुनिक शेतीतून कमी जागेत, योग्य वेळेत मर्यादित खर्चात अधिकाधिक उत्पन्न घेता येते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा आधुनिक शेतीतून पूर्ण होऊ शकतात. पारंपरिक शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने पावसाची अनिश्चितता, दिवसेंदिवस उष्णतेत होणारी वाढ तसेच अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. काही वेळा उत्पन्न जास्त, तर काही वेळा बरीच घट होते. उत्पन्नात घट झाली, तर त्या शेतीवर केलेला खर्चही निघताना कठीण होते. परिणामी शेतकरी तोट्यात जातो. आधुनिक शेतीत यंत्राचा वापर, योग्य व नियमित पाणी पुरवठा, योग्य सेंद्रीय आणि रासायनिक खतांचा वापर यामुळे या शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निश्चित मिळते. उत्पन्नाची निश्चिती आणि उत्पन्नातील प्रमाणाचीही निश्चिती असल्याने तसेच या मालाची प्रत चांगली असल्याने अशा मालाला योग्य वेळी योग्य बाजारपेठ मिळते. त्यामुळे याचा शेतकऱ्याला अधिकाधिक फायदा मिळून ग्राहकांनाही चांगला माल बाजारपेठेत मिळतो. पीक हातात येईपर्यंतचा कालावधी, खतांचे प्रमाण, मिळणारे उत्पन्न, पाण्याचे प्रमाण हे सर्व काही आधुनिक शेतीत निश्चित असते. कारण या सर्वांचा अभ्यास शेतकरी पीक घेण्याआधीपासूनच करत असतो. त्यामुळे खर्च आणि फायदा या शेतकऱ्याला साधारणपणे माहीत असतो. शेतीत यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने मजुरांची संख्या घटून फायदा वाढतो. आधुनिक शेतीला करण्यात येणारा पाणीपुरवठा योग्य प्रमाणातच असतो. त्यासाठी योग्य सिंचन पध्दतीचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टळतो. पिकाला मिळणारे पाण्याचे प्रमाण योग्य असल्याने उत्पन्नात वाढ होते. शेतीला पुरविण्यात येणारी सेंद्रीय आणि रासायनिक खतांचेही प्रमाण योग्य असल्याने खर्च मर्यादित होऊन फायद्याचे प्रमाण वाढते. आधुनिक शेतीतील शेतकरी बऱ्याचवेळा मोठे हॉटेल व्यावसायिक आणि शेतीमाल विक्रेते यांच्याबरोबर करार करूनच त्याप्रमाणात उत्पन्न घेतात. त्यामुळे शेतीतील माल तयार झाल्यानंतर लगेचच बाजारपेठेत आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये पोहोचतो. त्यामुळे यातून शेतकरी चिंतामुक्त होतो. मालाची नासाडी न होता मालाला योग्य भाव मिळतो. आधुनिक शेती ही संकल्पना अधिकाधिक दृढ करण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्यातून विविध प्रशिक्षण शिबिरे, कमी व्याजदरात मुबलक कर्जपुरवठा, सवलतीच्या दरात विविध शेतकी उपकरणे अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जातात. याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घेऊन आपल्या शेतातील उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.