शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेतकरी, व्यापारी त्रस्त

By admin | Updated: May 21, 2015 00:11 IST

उलाढाल मंदावली : आंब्यांचे नुकसान वाढले; किरकोळ भाज्यांवरच समाधान

प्रसन्न राणे - सावंतवाड तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. यामुळे शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असेलली फळे, भाज्या तसेच अन्य पदार्थांची उलाढाल मंद गतीने होताना दिसत आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांना दररोज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ््यामध्येच पावसाने धरलेला जोर शेतकऱ्यांसाठी नुुकसानीचा ठरला होता. मात्र, त्यातून सावरत असताना पावसाने जोर कायम ठेवला. यामुळे शेतकरी वर्ग, त्यावर अवलंबून असणारा व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत आला होता. काही दिवसांनंतर पुन्हा अवकाळी पावसाने जोर धरत आजपर्यंत अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांची पूर्णत: नासधूस केली आहे. यामुळे शेवटच्या पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. तालुक्यात उन्हाळ््यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल होते ती म्हणजे आंबा, काजू या पिकांची. मात्र, या फळांना पावसाने सुरुवातीपासूनच घेरल्याने त्यावर अवलंबून असणारे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यातून सावरत असताना अवकाळी पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसाने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात मंदी आलेली दिसून येत आहे. शेतकरी पूर्णत: अडचणीत असल्याने पूर्वीप्रमाणे बाजारपेठ फुलून दिसत नाही. बारीकसारीक भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.पावसाळ््याआधीच नैसर्गिक आपत्तीअवकाळी पावसाचे सत्र गेले चार महिने थांबतच नसल्याने काजू, आंबा या पिकांनंतर फळभाज्यांनाही त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे. गेले आठ दिवस पुन्हा अवकाळी पावसाने आपला जोर कायम केला असल्याने फळभाज्यांची विक्रीही कमी होताना दिसत आहे. यातच गावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. चौकुळ, आंबोली, सावंंतवाडी, बांदा, कोलगाव, डिंगणे, इन्सुली या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचा फटका बसल्याने नैसर्गिक आपत्तींनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील अनेक भागांचे पंचनामे सुरू आहेत.आंब्याचा दर २00 रूपयांपर्यंत घसरलापूर्वी मे महिन्यात सावंतवाडी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबे, फणसांची उलाढाल होताना दिसत होती. मात्र, आता अवकाळी पावसामुळे क्वचितच व्यापारी आंबे विक्री करताना दिसत आहेत. तेही अत्यंत कवडीमोल किमतीने. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. ८०० ते १००० रुपये प्रतिकिलो आंब्याचा दर आता २०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या अडचणीत आले आहेत.