शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पावसाने शेतकरी, व्यापारी त्रस्त

By admin | Updated: May 21, 2015 00:11 IST

उलाढाल मंदावली : आंब्यांचे नुकसान वाढले; किरकोळ भाज्यांवरच समाधान

प्रसन्न राणे - सावंतवाड तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. यामुळे शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असेलली फळे, भाज्या तसेच अन्य पदार्थांची उलाढाल मंद गतीने होताना दिसत आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांना दररोज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ््यामध्येच पावसाने धरलेला जोर शेतकऱ्यांसाठी नुुकसानीचा ठरला होता. मात्र, त्यातून सावरत असताना पावसाने जोर कायम ठेवला. यामुळे शेतकरी वर्ग, त्यावर अवलंबून असणारा व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत आला होता. काही दिवसांनंतर पुन्हा अवकाळी पावसाने जोर धरत आजपर्यंत अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांची पूर्णत: नासधूस केली आहे. यामुळे शेवटच्या पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. तालुक्यात उन्हाळ््यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल होते ती म्हणजे आंबा, काजू या पिकांची. मात्र, या फळांना पावसाने सुरुवातीपासूनच घेरल्याने त्यावर अवलंबून असणारे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यातून सावरत असताना अवकाळी पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसाने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात मंदी आलेली दिसून येत आहे. शेतकरी पूर्णत: अडचणीत असल्याने पूर्वीप्रमाणे बाजारपेठ फुलून दिसत नाही. बारीकसारीक भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.पावसाळ््याआधीच नैसर्गिक आपत्तीअवकाळी पावसाचे सत्र गेले चार महिने थांबतच नसल्याने काजू, आंबा या पिकांनंतर फळभाज्यांनाही त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे. गेले आठ दिवस पुन्हा अवकाळी पावसाने आपला जोर कायम केला असल्याने फळभाज्यांची विक्रीही कमी होताना दिसत आहे. यातच गावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. चौकुळ, आंबोली, सावंंतवाडी, बांदा, कोलगाव, डिंगणे, इन्सुली या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचा फटका बसल्याने नैसर्गिक आपत्तींनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील अनेक भागांचे पंचनामे सुरू आहेत.आंब्याचा दर २00 रूपयांपर्यंत घसरलापूर्वी मे महिन्यात सावंतवाडी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबे, फणसांची उलाढाल होताना दिसत होती. मात्र, आता अवकाळी पावसामुळे क्वचितच व्यापारी आंबे विक्री करताना दिसत आहेत. तेही अत्यंत कवडीमोल किमतीने. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. ८०० ते १००० रुपये प्रतिकिलो आंब्याचा दर आता २०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या अडचणीत आले आहेत.