शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेतकरी, व्यापारी त्रस्त

By admin | Updated: May 21, 2015 00:11 IST

उलाढाल मंदावली : आंब्यांचे नुकसान वाढले; किरकोळ भाज्यांवरच समाधान

प्रसन्न राणे - सावंतवाड तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. यामुळे शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असेलली फळे, भाज्या तसेच अन्य पदार्थांची उलाढाल मंद गतीने होताना दिसत आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांना दररोज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ््यामध्येच पावसाने धरलेला जोर शेतकऱ्यांसाठी नुुकसानीचा ठरला होता. मात्र, त्यातून सावरत असताना पावसाने जोर कायम ठेवला. यामुळे शेतकरी वर्ग, त्यावर अवलंबून असणारा व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत आला होता. काही दिवसांनंतर पुन्हा अवकाळी पावसाने जोर धरत आजपर्यंत अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांची पूर्णत: नासधूस केली आहे. यामुळे शेवटच्या पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबता थांबत नाही. तालुक्यात उन्हाळ््यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल होते ती म्हणजे आंबा, काजू या पिकांची. मात्र, या फळांना पावसाने सुरुवातीपासूनच घेरल्याने त्यावर अवलंबून असणारे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यातून सावरत असताना अवकाळी पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसाने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात मंदी आलेली दिसून येत आहे. शेतकरी पूर्णत: अडचणीत असल्याने पूर्वीप्रमाणे बाजारपेठ फुलून दिसत नाही. बारीकसारीक भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.पावसाळ््याआधीच नैसर्गिक आपत्तीअवकाळी पावसाचे सत्र गेले चार महिने थांबतच नसल्याने काजू, आंबा या पिकांनंतर फळभाज्यांनाही त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे. गेले आठ दिवस पुन्हा अवकाळी पावसाने आपला जोर कायम केला असल्याने फळभाज्यांची विक्रीही कमी होताना दिसत आहे. यातच गावातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. चौकुळ, आंबोली, सावंंतवाडी, बांदा, कोलगाव, डिंगणे, इन्सुली या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचा फटका बसल्याने नैसर्गिक आपत्तींनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील अनेक भागांचे पंचनामे सुरू आहेत.आंब्याचा दर २00 रूपयांपर्यंत घसरलापूर्वी मे महिन्यात सावंतवाडी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबे, फणसांची उलाढाल होताना दिसत होती. मात्र, आता अवकाळी पावसामुळे क्वचितच व्यापारी आंबे विक्री करताना दिसत आहेत. तेही अत्यंत कवडीमोल किमतीने. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. ८०० ते १००० रुपये प्रतिकिलो आंब्याचा दर आता २०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या अडचणीत आले आहेत.