शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी

By admin | Updated: March 9, 2015 23:44 IST

आंबा, काजू बागायतदारांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

वेंगुर्ले : अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यामुळे आंबा रिफ्लॉवरींग व फळगळ यामुळे आंबा व काजू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी संस्था, वित्तीय संस्था व राष्ट्रीय बँकांकडून शेतकरी आंबा, काजू बागायतदारांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी. त्याचबरोबर शासनाकडून प्रति झाडाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, असा एकमुखी ठराव मांडण्यात आला. आंबा व काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंच यांची संयुक्त बैठक आंबा केंद्रात आंबा, काजू मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी आंबा मंचचे अध्यक्ष दीपक कुबल, सचिव विलास ठाकूर, फळ संशोधन केंद्राचे सहयोगी डॉ. बी. आर. साळवी, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. पूजा पाटील, किटक शास्त्रज्ञ ए. वाय. मुंज, प्रा. आर. एम. देशपांडे, सदाशिव आळवे, शिवराम आरोलकर, शंकर नाबर, किशोर तुळसकर, सुरेश धुरी, सखाराम ठाकूर, विष्णू राऊळ, अशोक परब, चंद्रकांत कावडे, चंद्रकांत गडेकर, हनुमंत आंगचेकर, संतोष शेटकर, संतोष राऊळ, काशिनाथ आंगचेकर, देवेंद्र आंगचेकर, अरुण घोगळे, अनिल मोर्ये, राजन गावडे, जगदीश चमणकर, अनंत मोर्ये, सच्चिदानंद आंगचेकर, भालचंद्र परब, प्रवीण सातार्डेकर, यशवंत मठकर, विलास चव्हाण आदी बागायतदार उपस्थित होते. प्रथम सचिव विलास ठाकूर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कार्यवाही केली. यावेळी वेंगुर्ले तालुका आंबा व काजू उत्पादक सहकारी संघ निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या अवकाळी पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने रक्षक सापळे फळ केंद्राकडून शेतकऱ्यांना द्यावेत. परंतु त्याकरिता जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा व कृषी विभाग यांच्याकडून रक्षक सापळ्यांकरिता ५० टक्के अनुदान उपलब्ध करून द्यावे. आंबा फवारणीकरिता पॉवर स्प्रेअरयाकरिता सबसीडी कोट्यातून शासनाने बागायतदारांना परमिट देऊन सबसीडीचे जादा रॉकेल पुरवावे, याकरिता पुरवठा विभाग व तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आंबा कॅनिंगकरिता ५० रुपये किलो हमीभाव निश्चित करावा, शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई करारावर आंबे घेणाऱ्यांना मिळावी. (वार्ताहर)