शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी

By admin | Updated: March 9, 2015 23:44 IST

आंबा, काजू बागायतदारांच्या संयुक्त बैठकीत निर्णय

वेंगुर्ले : अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यामुळे आंबा रिफ्लॉवरींग व फळगळ यामुळे आंबा व काजू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सहकारी संस्था, वित्तीय संस्था व राष्ट्रीय बँकांकडून शेतकरी आंबा, काजू बागायतदारांना शंभर टक्के कर्जमाफी मिळावी. त्याचबरोबर शासनाकडून प्रति झाडाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, असा एकमुखी ठराव मांडण्यात आला. आंबा व काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंच यांची संयुक्त बैठक आंबा केंद्रात आंबा, काजू मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी आंबा मंचचे अध्यक्ष दीपक कुबल, सचिव विलास ठाकूर, फळ संशोधन केंद्राचे सहयोगी डॉ. बी. आर. साळवी, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. पूजा पाटील, किटक शास्त्रज्ञ ए. वाय. मुंज, प्रा. आर. एम. देशपांडे, सदाशिव आळवे, शिवराम आरोलकर, शंकर नाबर, किशोर तुळसकर, सुरेश धुरी, सखाराम ठाकूर, विष्णू राऊळ, अशोक परब, चंद्रकांत कावडे, चंद्रकांत गडेकर, हनुमंत आंगचेकर, संतोष शेटकर, संतोष राऊळ, काशिनाथ आंगचेकर, देवेंद्र आंगचेकर, अरुण घोगळे, अनिल मोर्ये, राजन गावडे, जगदीश चमणकर, अनंत मोर्ये, सच्चिदानंद आंगचेकर, भालचंद्र परब, प्रवीण सातार्डेकर, यशवंत मठकर, विलास चव्हाण आदी बागायतदार उपस्थित होते. प्रथम सचिव विलास ठाकूर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कार्यवाही केली. यावेळी वेंगुर्ले तालुका आंबा व काजू उत्पादक सहकारी संघ निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या अवकाळी पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने रक्षक सापळे फळ केंद्राकडून शेतकऱ्यांना द्यावेत. परंतु त्याकरिता जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा व कृषी विभाग यांच्याकडून रक्षक सापळ्यांकरिता ५० टक्के अनुदान उपलब्ध करून द्यावे. आंबा फवारणीकरिता पॉवर स्प्रेअरयाकरिता सबसीडी कोट्यातून शासनाने बागायतदारांना परमिट देऊन सबसीडीचे जादा रॉकेल पुरवावे, याकरिता पुरवठा विभाग व तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आंबा कॅनिंगकरिता ५० रुपये किलो हमीभाव निश्चित करावा, शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई करारावर आंबे घेणाऱ्यांना मिळावी. (वार्ताहर)