शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका

By admin | Updated: May 5, 2015 00:48 IST

विनोद तावडे : कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये; सरकार पाठीशी

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, असे असले तरी नैराश्येमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये, आपण त्यावर मार्ग काढू. शासन केव्हाही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील आंबा बागायतदाराने रविवारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, या पार्श्वभूमीवर तावडे येथे पत्रकारांशी बोलत होते. आंबा बागायतदाराच्या आत्महत्येबद्दल खंत व्यक्त करून तावडे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं आहे आणि राहील, अशी ग्वाही दिली. राज्य शासनातर्फे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर अधिक भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पटपडताळणीमध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे सांगत तावडे यांनी यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. पवारांना आताच कळवळा का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र शासन शेतकरी हिताविरोधी असल्याची टीका केली आहे. पवारांना विरोधी पक्षात बसल्यावर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. हा कळवळा जर १५ वर्षांपूर्वी पवारांनी दाखविला असता, तर शेतकऱ्यांवर आजची वेळ आली नसती, अशी टीकाही तावडे यांनी केली. आधी सुलटी...नंतर पलटी... मेरिटाईम बोर्डाचे उपकेंद्र रायगड किंवा सिंधुदुर्गमध्ये होणे आवश्यक असल्याचे तावडे यांनी भाषणात सांगितले. मात्र, पत्रकारांशी बोलताना ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले. कोणतेही पुरस्कार वादापलीकडे हवेत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, कोणताही पुरस्कार हा वादापलीकडे असला पाहिजे. त्या-त्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहूनच तो दिला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं, ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे.