शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका

By admin | Updated: May 5, 2015 00:48 IST

विनोद तावडे : कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये; सरकार पाठीशी

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, असे असले तरी नैराश्येमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये, आपण त्यावर मार्ग काढू. शासन केव्हाही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील आंबा बागायतदाराने रविवारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, या पार्श्वभूमीवर तावडे येथे पत्रकारांशी बोलत होते. आंबा बागायतदाराच्या आत्महत्येबद्दल खंत व्यक्त करून तावडे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं आहे आणि राहील, अशी ग्वाही दिली. राज्य शासनातर्फे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर अधिक भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पटपडताळणीमध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे सांगत तावडे यांनी यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. पवारांना आताच कळवळा का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र शासन शेतकरी हिताविरोधी असल्याची टीका केली आहे. पवारांना विरोधी पक्षात बसल्यावर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. हा कळवळा जर १५ वर्षांपूर्वी पवारांनी दाखविला असता, तर शेतकऱ्यांवर आजची वेळ आली नसती, अशी टीकाही तावडे यांनी केली. आधी सुलटी...नंतर पलटी... मेरिटाईम बोर्डाचे उपकेंद्र रायगड किंवा सिंधुदुर्गमध्ये होणे आवश्यक असल्याचे तावडे यांनी भाषणात सांगितले. मात्र, पत्रकारांशी बोलताना ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले. कोणतेही पुरस्कार वादापलीकडे हवेत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, कोणताही पुरस्कार हा वादापलीकडे असला पाहिजे. त्या-त्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहूनच तो दिला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं, ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे.