शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका

By admin | Updated: May 5, 2015 00:48 IST

विनोद तावडे : कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये; सरकार पाठीशी

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, असे असले तरी नैराश्येमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. कोकणी माणसाने संकटामुळे निराश होऊ नये, आपण त्यावर मार्ग काढू. शासन केव्हाही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील आंबा बागायतदाराने रविवारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, या पार्श्वभूमीवर तावडे येथे पत्रकारांशी बोलत होते. आंबा बागायतदाराच्या आत्महत्येबद्दल खंत व्यक्त करून तावडे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं आहे आणि राहील, अशी ग्वाही दिली. राज्य शासनातर्फे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर अधिक भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पटपडताळणीमध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे सांगत तावडे यांनी यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. पवारांना आताच कळवळा का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र शासन शेतकरी हिताविरोधी असल्याची टीका केली आहे. पवारांना विरोधी पक्षात बसल्यावर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. हा कळवळा जर १५ वर्षांपूर्वी पवारांनी दाखविला असता, तर शेतकऱ्यांवर आजची वेळ आली नसती, अशी टीकाही तावडे यांनी केली. आधी सुलटी...नंतर पलटी... मेरिटाईम बोर्डाचे उपकेंद्र रायगड किंवा सिंधुदुर्गमध्ये होणे आवश्यक असल्याचे तावडे यांनी भाषणात सांगितले. मात्र, पत्रकारांशी बोलताना ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले. कोणतेही पुरस्कार वादापलीकडे हवेत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, कोणताही पुरस्कार हा वादापलीकडे असला पाहिजे. त्या-त्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहूनच तो दिला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं, ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे.