शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतकरी खुशीत तर कारखानदार चिंतेत

By admin | Updated: March 18, 2017 21:02 IST

योग्य दर मिळेना : काजूची आवक स्थिर; खर्च-उत्पादनाचा बसेना मेळ

कडावल : काजू उत्पादन यंदा कमी असले तरी स्थानिक बाजारपेठेत काजूला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे; पण कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि तुलनेत काजूगराला अपेक्षित दर मिळत नसल्याने काजू कारखानदारांसमोर संकट उभे राहिले आहे. यामुळेच गतसाली ऐन हंगामात बंद पडलेल्या कारखान्यांच्या विचाराने काजू कारखानदार धास्तावले आहेत.बाजारपेठेत काजूची आवक काहीशी स्थिर असून, आसपासच्या खेड्यातील शेतकरी आपल्याकडील काजू विक्रीसाठी आणत आहेत. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच काजूला प्रतिकिलो १६० ते १७० रुपयांच्या दरम्यान चांगला बाजारभाव मिळत आहे. काजूची आवक स्थिर असली तरी आणखी काही दिवसानंतर ती वाढेल, असा विश्वास व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.काजूला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी खुशीत असले, तरी काजू कारखानदार मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. काजूची खरेदी करण्यासाठी त्यांना अधिक प्रमाणात खर्च करावा लागत आहे. तसेच मजुरी, पॅकिंग व वाहतूक इत्यादींसाठीही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे काजूगर उत्पादनासाठी येणारा खर्च व उत्पादनाला मिळणारा दर यात बरीच तफावत येते. या समस्येमुळेच गेल्या वर्षी अनेक लहान-मोठे काजू कारखाने बंद ठेवावे लागले होते. या गोष्टीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने येथील काजू कारखानदार धास्तावले आहेत.जिल्ह्यातील अनेक तरुणांनी बँकेचे कर्ज काढून काजू कारखाने सुरू केले आहेत. या उद्योगापासून रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे. मात्र, या उद्योगाचा कच्चा माल म्हणजे काजू बीच्या किमती वाढल्यामुळे काजू कारखानदारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. काजू बी तयार करून तो बाजारात आणण्यासाठी त्यावरील प्रक्रियेचा खर्च पाहता बाजारपेठेत तयार काजू बीला आवश्यक दर मिळत नाही. त्यामुळे कारखानदारांची कोंडी होत असून, सर्व कारखान्यांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखाने कसे सुरू ठेवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. (वार्ताहर)एक किलो चांगल्या प्रतीचा गर मिळण्यासाठी चार किलो काजू फोडावी लागते. आज काजू किमान १६० रुपये प्रतिकिलो असून, त्याच्या प्रक्रियेसाठी मजुरी, पँकिंग, वाहतूक व इतर खर्चाचा विचार करता बाजारात काजूगराला मिळणारा दर परवडत नाही. - बाळकृष्ण ठाकूर, काजू कारखानदार, कडावल