शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेपासून शेतकरी वंचितच...

By admin | Updated: January 20, 2015 00:05 IST

लांजा तालुका : नुकसानग्रस्तांची प्रतिक्षा कायम.

रत्नागिरी : लांजा तालुक्यात समाविष्ट असलेल्या पूनस महसूल विभागातील शेकडो आंबा बागायतदार शासनाच्या फळपीक विमा योजनेपासून दोन वर्षे वंचित आहेत. वार्षिक हप्ता भरूनही अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. संबंधित विभागाकडून स्वयंचलित तापमानमापक यंत्रणा अद्याप उपलब्ध झाली नसल्याने ही रक्कम रखडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.राज्यात हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना राबविली जात आहे. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेत राज्य शासनाचा ५० टक्के आणि शेतकऱ्यांचा ५० टक्के असा सहभाग आहे. पूनस (ता. लांजा) क्षेत्रात खानू मठ, पूनस, नांदिवली, पूनस, देवधे, वेरळ, आंजणारी, नांदिवली, शिरंबवली, कुर्णे आदी गावांचा समावेश आहे. प्रतिझाड ६० रूपये इतकी विमा रक्कम असून नुकसान झाल्यास १००० रूपये भरपाई मिळते. पूनस क्षेत्रातील शेकडो शेतकरी, सहकारी बँका तसेच सोसायटी यांच्यामार्फत प्रतिवर्षी पीककर्ज घेतात. बँकेकडून या कर्जावर पीकविम्याचा हप्ता भरून घेतला जातो. गावातील शेकडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी २०१३ - १४ आणि २०१४ - १५ या दोन्ही वर्षाचे लाखो रूपयांच्या पीक विमा कर्जाचे वार्षिक हप्ते संबंधित बँकांकडे अदा केलेले आहेत. मात्र, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या आंबा बागायतदारांना अजूनही विम्यापोटी भरपाई मिळालेली नाही. पूनस क्षेत्रात स्वयंचलित तापमानमापक यंत्र उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांना दोन वर्षे हा लाभ मिळाला नसल्याची माहिती नांदिवलीतील शेतकरी सतीश सरपोतदार यांनी दिली.या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागापासून अगदी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. मात्र, अजूनही त्याची तड लागलेली नाही. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी याबाबत आपण कृषी विभागाला कळविल्याचे सांगितले. मात्र, कृषी विभागाने याबाबतची कुठलीच सूचना अद्याप कंपनीेकडून आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या गोंधळामुळे शेकडो शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेवरील विश्वास उडाला आहे. (प्रतिनिधी)कंपनीने स्वयंचलित तापमानमापक यंत्रणेचा गैरवापर होऊ नये, यासाठी यंत्रणा कुठे बसविली आहे, ते गोपनीय ठेवले आहे. त्याबाबत कृषी अधीक्षक कार्यालयालाही काही माहिती देण्यात येत नाही. शेतकऱ्यांनी सलग दोन वर्षे या योजनेसाठी हप्ते भरले . पत्रव्यवहारही आहे. कंपनीनेच खुलासा करावा.- व्ही. एस. वैद्य, पर्यवेक्षक, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी