शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

भिंत कोसळूनही बाप्पासह घरातील मंडळी सुखरुप

By admin | Updated: August 31, 2014 00:33 IST

पिंगुळी-नवीवाडी येथील घटना : घर कोसळण्याची भीती

कुडाळ : पिंगुळी- नवीवाडी येथील राऊळ कुटुंबियांच्या घराच्या भिंती कोसळल्या. या दुर्घटनेतून घरातील माणसे आणि गणेशमूर्तीही सुखरूप राहिली. त्यामुळे बाप्पाच्या कृपेमुळेच विघ्न टळल्याच्या भावना यावेळी राऊळ कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. दरम्यान, पूर्ण घर कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे राऊळ कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे.पिंगुळी- नवीवाडी येथील राजन राऊळ व विनायक राऊळ यांचे घर आहे. गणपती सणानिमित्त त्यांच्या कुटुंबातील मुंबईस्थित व्यक्तीही पिंगुळी येथील घरी आल्या होत्या. शुक्रवारी या सर्वांनी मंगलमय वातावरणात गणपतीची प्रतिष्ठापना केली. शनिवारी सकाळी सर्वांनी बाप्पाची पूजाअर्चा केली. काहीजण नैवेद्याच्या तयारीला लागले असतानाच १०.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या एका बाजूच्या मोठ्या भिंती कोसळल्या.यावेळी घरामध्ये राऊळ कुटुंबियांची नऊ माणसे काम करीत होती. भिंत कोसळताच सर्वांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. ज्या बाजूच्या भिंती कोसळल्या, त्यालाच लागून गणेशाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले होते. मात्र, गणपती असलेल्या भिंतीला धोका पोहोचला नाही. छपराची काही कौलेही गणपतीच्या खोलीत पडली. परंतु मूर्तीला कोणतेही नुकसान झाले नाही. राऊळ कुटुंबीयांचे हे घर पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यांना दुसरीकडे रहावे लागणार आहे. दरम्यान, घर धोकादायक स्थितीत असल्याने गणपतीचे दीड दिवसांनी विसर्जन करण्यात आले. घटनास्थळी मनसेचे हेमंंत जाधव, बाबल गावडे, दीपक गावडे, तलाठी यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)