शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

जीव वाचविल्यामुळे कुटुंबाला आधार मिळतो

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

प्रवीण सुलोकार : फोंडाघाट येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

कणकवली : आपत्ती व्यवस्थापन करताना स्वत:चा जीव सांभाळून आपत्तिग्रस्तांना मदत करणे आवश्यक असते, आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य ध्येय हे जीव वाचविणे हे असते. एक जीव वाचविल्यामुळे एका कुटुंबाला आधार मिळतो. प्रथमोपचार करताना अपुऱ्या ज्ञानाने उपचार केल्यास एका आपत्तीचे निवारण करताना दुसरी आपत्ती निर्माण होणार नाही, याची जाणीव असणे आवश्यक आहे. जग फार सुंदर आहे, तसेच जीवन अनमोल आहे, हे युवा पिढीने लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रवीण सुलोकार यांनी केले. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा नुकतीच झाली. या कार्यशाळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा सिंधुदुर्गचे प्रवीण सुलोकार आणि भिकाजी मर्दाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष रायबोले म्हणाले, आपत्ती ही कोणत्याही क्षणी येऊ शकते. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. या प्रशिक्षणाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळेस राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. विनोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विद्या मोदी यांनी स्वागत केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)\\प्रथमोपचार कसे करावेत...सुलोकार यांनी, कोकणात सर्पदंश होण्याचे प्रमाण मोठे आहे. सर्पदंश झाल्यानंतर कशाप्रकारे प्रथमोपचार करावेत, याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली.