शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

आपद्ग्रस्त कुटुंबियांची शासनाकडून फरफटच

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

हर्णै दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण : दुर्घटनाग्रस्त अद्याप भाड्याच्याच घरात

दापोली : तालुक्यातील हर्णै राजवाडी येथे जून २०१० साली घरावर दरड कोसळून कुटुंबातील आठ सदस्य डोंगराच्या मलब्यात गाडले गेले होते. यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या पवार कुटुंबियांची घरासाठी सुरू असलेली परवड अद्याप पाठ सोडण्यास तयार नाही. या दुर्घटनेला ५ वर्षे झाली तरी अद्याप पवार कुटुंबियांच्या घराची प्रतिक्षा संपलेली नाही. शासनासह येथील राज्यकर्त्यांनी सध्यातरी या आपद्ग्रस्ताना वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र आहे. दाभोळ येथे भूस्खलन होऊन ५ जण ठार झाल्याने हर्णै - राजवाडीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.जून २०१०मध्ये हर्णै - राजवाडीत दरड कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी दुर्घटनेत रवी पवार, पार्वती पवार व सिध्दार्थ बोथरे या तिघांचा जीव वाचला होता. ही भयंकर घटना घडल्यानंतर मदतीचे अनेक हात पुढे सरसावले होते. मात्र, जसजसे दिवस सरले तसे साऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही आटले. या दुर्घटनेत पवार कुटुंबियांचे घरच नष्ट झाले होते. त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग दृष्टीपथात येत असतानाच धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या सर्वांना जागा मिळावी, असा आग्रह झाल्याने पवारांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. या घटनेचा पाठपुरावा केल्यावर तीन वर्षांपूर्वी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले यांनी तडक घटनास्थळी धाव घेऊन पवार कुटुंबियांना धीर दिला होता. त्यांना आर्थिक मदतही दिली होती. यावेळी त्यांनी पवार यांच्या नावे वेगळा व नूतन प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हर्णै ग्रामपंचायतीकडे अतिरिक्त जागा शिल्लक नसल्याने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवूनही पवार यांना भाड्याच्या घरात राहून आपला उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. जिल्हा परिषदेने पवार यांच्या घरासंदर्भात हालचाली करून त्यांचे स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी हर्णैतून होत आहे. याबाबत हर्णैचे सरपंच महेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली. या धोकादायक भागात राहणाऱ्या सर्वांकरिता शासनाने हर्णै बायपास रस्त्यावर जागा देऊ केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, ही जागा मुख्य गावापासून लांब असल्याने कुटुंबाच्या दृष्टिने ती गैरसोयीची आहेत. दरवर्षीर् या धोकादायक जागेत राहणाऱ्यांना शासनाच्यावतीने नोटीस बजावूनही काही उपयोग होत नाही. यामुळे या धोकादायक दरडींच्या टांगत्या तलवारीखाली राहणाऱ्यांना ग्रामपंचायतीने पावसाळ्यात नोटीस बजावणे यावर्षीपासून बंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे येथील लोकांच्या जागेचा प्रश्न या पावसाळ्यानंतरही निकाली निघण्याची आशा मावळली आहे. दापोली तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये समावेश असलेल्या अशा गावांमधील आपदग्रस्त कुटुंबांची चाललेली फरफट काही केल्या संपत नसल्याने अशा कुटुंबांच्या समोरील काळोख दूर कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)