शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

आपद्ग्रस्त कुटुंबियांची शासनाकडून फरफटच

By admin | Updated: June 27, 2015 00:17 IST

हर्णै दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण : दुर्घटनाग्रस्त अद्याप भाड्याच्याच घरात

दापोली : तालुक्यातील हर्णै राजवाडी येथे जून २०१० साली घरावर दरड कोसळून कुटुंबातील आठ सदस्य डोंगराच्या मलब्यात गाडले गेले होते. यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या पवार कुटुंबियांची घरासाठी सुरू असलेली परवड अद्याप पाठ सोडण्यास तयार नाही. या दुर्घटनेला ५ वर्षे झाली तरी अद्याप पवार कुटुंबियांच्या घराची प्रतिक्षा संपलेली नाही. शासनासह येथील राज्यकर्त्यांनी सध्यातरी या आपद्ग्रस्ताना वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र आहे. दाभोळ येथे भूस्खलन होऊन ५ जण ठार झाल्याने हर्णै - राजवाडीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.जून २०१०मध्ये हर्णै - राजवाडीत दरड कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी दुर्घटनेत रवी पवार, पार्वती पवार व सिध्दार्थ बोथरे या तिघांचा जीव वाचला होता. ही भयंकर घटना घडल्यानंतर मदतीचे अनेक हात पुढे सरसावले होते. मात्र, जसजसे दिवस सरले तसे साऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही आटले. या दुर्घटनेत पवार कुटुंबियांचे घरच नष्ट झाले होते. त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग दृष्टीपथात येत असतानाच धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या सर्वांना जागा मिळावी, असा आग्रह झाल्याने पवारांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. या घटनेचा पाठपुरावा केल्यावर तीन वर्षांपूर्वी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले यांनी तडक घटनास्थळी धाव घेऊन पवार कुटुंबियांना धीर दिला होता. त्यांना आर्थिक मदतही दिली होती. यावेळी त्यांनी पवार यांच्या नावे वेगळा व नूतन प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हर्णै ग्रामपंचायतीकडे अतिरिक्त जागा शिल्लक नसल्याने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवूनही पवार यांना भाड्याच्या घरात राहून आपला उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. जिल्हा परिषदेने पवार यांच्या घरासंदर्भात हालचाली करून त्यांचे स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी हर्णैतून होत आहे. याबाबत हर्णैचे सरपंच महेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली. या धोकादायक भागात राहणाऱ्या सर्वांकरिता शासनाने हर्णै बायपास रस्त्यावर जागा देऊ केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, ही जागा मुख्य गावापासून लांब असल्याने कुटुंबाच्या दृष्टिने ती गैरसोयीची आहेत. दरवर्षीर् या धोकादायक जागेत राहणाऱ्यांना शासनाच्यावतीने नोटीस बजावूनही काही उपयोग होत नाही. यामुळे या धोकादायक दरडींच्या टांगत्या तलवारीखाली राहणाऱ्यांना ग्रामपंचायतीने पावसाळ्यात नोटीस बजावणे यावर्षीपासून बंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे येथील लोकांच्या जागेचा प्रश्न या पावसाळ्यानंतरही निकाली निघण्याची आशा मावळली आहे. दापोली तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये समावेश असलेल्या अशा गावांमधील आपदग्रस्त कुटुंबांची चाललेली फरफट काही केल्या संपत नसल्याने अशा कुटुंबांच्या समोरील काळोख दूर कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)